शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

विद्यापीठाचे परिपत्रक : अनुपस्थित विद्यार्थ्यांची ६ जानेवारीला विशेष परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 04:34 IST

महाराष्ट्र बंदमध्ये बुधवारी, ३ जानेवारीला परीक्षेला अनुपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांची ६ जानेवारीला विशेष परीक्षा घेण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाने गुरूवारी जाहीर केला आहे. बंददरम्यान झालेल्या रास्ता रोको आणि रेल रोकोमुळे बहुतेक विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांपर्यंत पोहचता आले नव्हते.

मुंबई - महाराष्ट्र बंदमध्ये बुधवारी, ३ जानेवारीला परीक्षेला अनुपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांची ६ जानेवारीला विशेष परीक्षा घेण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाने गुरूवारी जाहीर केला आहे. बंददरम्यान झालेल्या रास्ता रोको आणि रेल रोकोमुळे बहुतेक विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांपर्यंत पोहचता आले नव्हते. अशा विद्यार्थ्यांसाठी हीविशेष परीक्षा होणार असून परीक्षेची वेळ आणि ठिकाण यामध्ये कोणताही बदल केलेला नसल्याचे परिपत्रक विद्यापीठाने निर्गमित केले आहे.संबंधित परिपत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती विद्यापीठाचे जनसंपर्क उपकुलसचिव लीलाधर बन्सोड यांनी दिली. ३ जानेवारीला सकाळच्या सत्रात ४ परीक्षा, तर दुपारच्या सत्रात ९ अशा एकुण १३ परीक्षांचे आयोजन केले होते. ज्यामध्ये सकाळच्या सत्रात तृतीय वर्ष बीकॉम (आयडॉल), एमएस्सी फॉरेन्सिक सायन्स (सत्र १), एमएस्सी पार्ट-२ आणि एमसीए (आयडॉल) सत्र-२ या परीक्षांचे आयोजन केले होते.दुपारच्या सत्रात म्हणजेच ३ वाजता सुरू होणाºया परीक्षांमध्ये तृतीय वर्ष बीए (वार्षिक), एमएड (स्पेशल एज्युकेशन) (हीअरिंग इम्पेअरड) सत्र-१, एम.ए. पार्ट-१, पार्ट-२ (वार्षिक), बीकॉम सत्र-६, एम.कॉम (पार्ट-एक) वार्षिक, तृतीय वर्ष बीएस्सी (वार्षिक) (आयडॉल), बीएस्सी (आयटी) सत्र-पाच, एमसीए (सत्र-४) (आयडॉल) आणि द्वितीय एलएलबी/सामान्य एलएलबी(सत्र-३) (तीन वर्षीय अभ्यासक्रम) चतुर्थ वर्ष एलएलबी( पाच वर्षीय अभ्यासक्रम) (सत्र -७) या परीक्षांचा समावेश होता.वाहतुकीच्या व अन्य कारणांमुळे या परीक्षांना ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहचता आले नाही, अशा विद्यार्थ्यांना पुनर्परीक्षेची संधी देण्यात येणार असल्याचे विद्यापीठाने जाहीर केले होते. त्या अनुषंगाने विद्यापीठाने अशा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देत या परीक्षा आता ६ जानेवारीला घेण्याचे जाहीर केले आहे. विशेष म्हणजे या परीक्षांच्या वेळेत आणि ठिकाणांत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.वाहतुकीच्या व अन्य कारणांमुळे या परीक्षांना ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहचता आले नाही, अशा विद्यार्थ्यांना पुनर्परीक्षेची संधी देण्यात येणार असल्याचे विद्यापीठाने जाहीर केले होते. त्या अनुषंगाने विद्यापीठाने अशा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देत या परीक्षा आता ६ जानेवारीला घेण्याचे जाहीर केले आहे.

टॅग्स :examपरीक्षाMumbaiमुंबई