शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

विद्यापीठाचे परिपत्रक : अनुपस्थित विद्यार्थ्यांची ६ जानेवारीला विशेष परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 04:34 IST

महाराष्ट्र बंदमध्ये बुधवारी, ३ जानेवारीला परीक्षेला अनुपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांची ६ जानेवारीला विशेष परीक्षा घेण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाने गुरूवारी जाहीर केला आहे. बंददरम्यान झालेल्या रास्ता रोको आणि रेल रोकोमुळे बहुतेक विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांपर्यंत पोहचता आले नव्हते.

मुंबई - महाराष्ट्र बंदमध्ये बुधवारी, ३ जानेवारीला परीक्षेला अनुपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांची ६ जानेवारीला विशेष परीक्षा घेण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाने गुरूवारी जाहीर केला आहे. बंददरम्यान झालेल्या रास्ता रोको आणि रेल रोकोमुळे बहुतेक विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांपर्यंत पोहचता आले नव्हते. अशा विद्यार्थ्यांसाठी हीविशेष परीक्षा होणार असून परीक्षेची वेळ आणि ठिकाण यामध्ये कोणताही बदल केलेला नसल्याचे परिपत्रक विद्यापीठाने निर्गमित केले आहे.संबंधित परिपत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती विद्यापीठाचे जनसंपर्क उपकुलसचिव लीलाधर बन्सोड यांनी दिली. ३ जानेवारीला सकाळच्या सत्रात ४ परीक्षा, तर दुपारच्या सत्रात ९ अशा एकुण १३ परीक्षांचे आयोजन केले होते. ज्यामध्ये सकाळच्या सत्रात तृतीय वर्ष बीकॉम (आयडॉल), एमएस्सी फॉरेन्सिक सायन्स (सत्र १), एमएस्सी पार्ट-२ आणि एमसीए (आयडॉल) सत्र-२ या परीक्षांचे आयोजन केले होते.दुपारच्या सत्रात म्हणजेच ३ वाजता सुरू होणाºया परीक्षांमध्ये तृतीय वर्ष बीए (वार्षिक), एमएड (स्पेशल एज्युकेशन) (हीअरिंग इम्पेअरड) सत्र-१, एम.ए. पार्ट-१, पार्ट-२ (वार्षिक), बीकॉम सत्र-६, एम.कॉम (पार्ट-एक) वार्षिक, तृतीय वर्ष बीएस्सी (वार्षिक) (आयडॉल), बीएस्सी (आयटी) सत्र-पाच, एमसीए (सत्र-४) (आयडॉल) आणि द्वितीय एलएलबी/सामान्य एलएलबी(सत्र-३) (तीन वर्षीय अभ्यासक्रम) चतुर्थ वर्ष एलएलबी( पाच वर्षीय अभ्यासक्रम) (सत्र -७) या परीक्षांचा समावेश होता.वाहतुकीच्या व अन्य कारणांमुळे या परीक्षांना ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहचता आले नाही, अशा विद्यार्थ्यांना पुनर्परीक्षेची संधी देण्यात येणार असल्याचे विद्यापीठाने जाहीर केले होते. त्या अनुषंगाने विद्यापीठाने अशा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देत या परीक्षा आता ६ जानेवारीला घेण्याचे जाहीर केले आहे. विशेष म्हणजे या परीक्षांच्या वेळेत आणि ठिकाणांत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.वाहतुकीच्या व अन्य कारणांमुळे या परीक्षांना ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहचता आले नाही, अशा विद्यार्थ्यांना पुनर्परीक्षेची संधी देण्यात येणार असल्याचे विद्यापीठाने जाहीर केले होते. त्या अनुषंगाने विद्यापीठाने अशा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देत या परीक्षा आता ६ जानेवारीला घेण्याचे जाहीर केले आहे.

टॅग्स :examपरीक्षाMumbaiमुंबई