शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

पाणी वाचवण्याची अनोखी चळवळ

By admin | Updated: September 19, 2015 22:59 IST

‘आधी केले, मग सांगितले’ ही उक्ती प्रत्यक्षात आणणारे हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच असतात. कोल्हापुरातील शिक्षक मिलिंद यादव हे त्यापैकीच एक.

- संदीप आडनाईक,  कोल्हापूर

‘आधी केले, मग सांगितले’ ही उक्ती प्रत्यक्षात आणणारे हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच असतात. कोल्हापुरातील शिक्षक मिलिंद यादव हे त्यापैकीच एक. काही वर्षांपूर्वी शाळेच्या परिसरातील पाण्याचे वाहते नळ बंद करण्यास त्यांनी प्रारंभ केला आणि ते कार्य त्यांनी व्रत म्हणून स्वीकारले. प्रिन्स शिवाजी मराठा हायस्कूलमध्ये कलाशिक्षक असलेल्या मिलिंद यांनी जीवन बोडकेसारख्या अवघ्या सहा मित्रांच्या मदतीने मूर्तिदान, निर्माल्यदान या चळवळीला १९८५मध्ये प्रारंभ केला होता. ‘चिल्लर पार्टी’सारख्या उपक्रमातून लहान मुलांमध्ये चित्रपट चळवळ जोपासण्याचा ते प्रयत्न करीत आहेत. जुना बुधवार पेठेतून शाळेला जाता-येता या परिसरातील महिला आणि नागरिक घरासमोरील पाण्याचे नळ गरज नसताना सुरू ठेवत असल्याचे त्यांनी पाहिले. सुरुवातीला त्यांनी समजावून सांगितले; परंतु फारसा प्रतिसाद न मिळाल्यानंतर त्यांनी स्वत:च ते नळ बंद करण्यास सुरुवात केली. - अलीकडेच त्यांनी आपल्या शाळेत विद्यार्थी आणि पालकांना पाणी वाचविण्यासंदर्भात तसेच दुष्काळाची, विशेषत: मराठवाड्यातील गंभीर स्थिती दाखविण्यासाठी स्लाईड-शोचे आयोजन केले. - शाळेतील एका पाण्याच्या नळाून गळणारे पाणी किती वाया जाते, याचे मिलिंद यांनी एकदा चित्रीकरण केले, तेव्हा एका मिनिटात २५0 मिलिलीटर पाणी वाया गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. मग एका तासात वाया गेलेल्या १५ लीटर पाण्याच्या हिशेबात महानगरपालिकेला वर्षाला ५६२९ रुपये इतके विनाकारण भरावे लागल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी जनजागृती सुरू केली.