शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

आधुनिक 'गोकूळ' नगरीची अनोखी सखूमाय

By admin | Updated: October 2, 2014 12:40 IST

पायपुसणेनिर्मितीचे प्रशिक्षण ते वस्तीशाळेचा प्रवास

आठवी माळ - कला : पायपुसणेनिर्मितीचे प्रशिक्षण ते वस्तीशाळेचा प्रवास

गजानन दिवाण■ औरंगाबाद
अनसरवाडा. ७४0 जणांचे हे एक गावच. भीक मागायची. त्याच पैशातून दारू प्यायची. मिळालेले तुकडे खायचे. यात बायकाही मागे नसत. आंघोळ त्यांना ठाऊकच नव्हती. पिण्याचे पाणी प्रातर्विधीला वापरणे ते पाप समजायचे. घरात स्वयंपाक करून जेवण करतात, हे त्यांच्या गावीही नव्हते. सखूबाईने समाजाचा विरोध पत्करत पायपुसणे तयार करण्याची कला अवगत केली. त्याचे प्रशिक्षण इतर महिलांनाही दिले. आज प्रत्येक घरात चूल पेटते. भीक मागण्याचे प्रमाण ४0टक्क्यांवर आले आहे. आता त्यांची पोरं शाळेतही जाऊ लागली आहेत. एखाद्या जादूगाराने करावा, असा हा बदल सखूबाईच्या एका बंडाने झाला. 
सखूबाई बंडीधनगर. वय वर्षे ६३. जन्म कुठला ठाऊक नाही. कर्नाटक वा आंध्र प्रदेशातला असावा. ३१व्या वर्षीच नवर्‍याचा मृत्यू झाला. एकूण १0 मुले. तीन गेली. सात मुले आणि एक मुलगी. मुले लहान असल्याने समाजाने कसरतीचा खेळही शिकविला नाही. मुलांचे आणि आपले पोट कसे भरणार? या समाजात पोटभर अन्न कोणालाच मिळायचे नाही. तारेवरच्या कसरती करून पैसा किती मिळणार? पोट भरेल एवढी भीक तरी कोण देणार? मग ही भूक मारण्यासाठी स्पिरीट प्यायचे. बायकांपासून पोरांपर्यंत, लहानथोर सार्‍यांनाच हे व्यसन. कोणी गावठी दारू पिऊन, तर कोणी स्पिरीट पिऊन भूक मारायचे. सखूबाईने आपले आणि पोराचे पोट भागविण्यासाठी हाच व्यवसाय सुरू केला. या विक्रीतून कसेबसे पोट भरायचे. गोपाळ गडकरी (पहिलवान) नावाने हा समाज ओळखला जातो. काही जण त्याला डोंबारीही म्हणतात. 
१९ वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. भटकत भटकत हा समाज लातूर जिल्ह्यातील अनसरवाडा (ता. निलंगा) येथे पोचला. शाळेच्या कडेलाच त्यांचा तंबू होता. याच गावातला तरुण नरसिंग झरे हा या शाळेत शिकवणी घ्यायचा. ती सुरू असताना त्यांची मुले दंगा करायची आणि पळून जायची. यामुळे त्रासलेल्या नरसिंगने या मुलांचा पाठलाग करीत त्यांचा तंबू गाठला. आईबाप आणि मुलेही दारू प्यायलेले. तक्रार कुणाकडे करायची? हे चित्र पाहून अस्वस्थ झालेल्या नरसिंगला या समाजासाठी काहीतरी करायचे, या विचाराने झपाटले. याकामी सखूबाईने त्याला मोलाची साथ दिली. कसरतीचे खेळ करताना या समाजातील काही तरुण सनई-ढोल वाजवायचे. यातील सुदाम नावाच्या तरुणाला नरसिंगने बँडचे प्रशिक्षण घेण्यासाठी हैदराबादला पाठविले. पुढे २0 जणांना त्याने प्रशिक्षण दिले. वर्षभराचा काळ गेला. गोकूळ बँजो नावाची बँड पार्टी स्थापन झाली. आता असे अनेक ग्रुप स्थापन केले आहेत. पुरुषांच्या रोजगाराचा प्रश्न मिटला, पण महिलांचे काय करायचे? सखूबाईला पुण्याला खादी ग्रामोद्योगमध्ये प्रशिक्षणासाठी पाठविण्याचे ठरले. मात्र आपली एकटी महिला समाज सोडून कुठे जाणे, या जातपंचायतीला मान्य नव्हते. हा नियम सखूबाईने मोडला. सखूबाई सहा महिने पुण्यात राहिल्या. सारे काही शिकून परतल्या. संतापलेल्या पंचायतीने सखूबाईला जातीबाहेर काढले. दीडशे रुपये दंड भरून नंतर त्यांना जातीत घेण्यात आले. सखूबाईंनी नंतर प्रत्येक महिलेला प्रशिक्षण दिले. पायपुसणे बनवण्यासह इतर कामांत या सार्‍या महिला गुंतल्या. त्यांनाही रोजगार मिळू लागला. वेरूळ महोत्सवात या उद्योगाला पुरस्कारही मिळाला. तयार माल मुंबई, पुणे, औरंगाबाद, हैदराबादला पाठविला जाऊ लागला. 
कॉ. माणिकराव जाधव यांच्या मदतीतून येथे आठ घरे बांधण्यात आली. 'गोकूळ नगरी' असे या वस्तीला नाव देण्यात आले. पुढे मुंबईच्या एका बिल्डरने सार्‍यांनाच घरे बांधून दिली. १९९९मध्ये भटके विमुक्त विकास परिषदद्वारा संचलित गोविंद महाराज गोपाळ समाज विकास परिषद स्थापन करण्यात आली. सखूबाई आता या परिषदेच्या अध्यक्षा आहेत. गोपाळसमाजाच्या राज्य पंचायतीच्या त्या एक सदस्य आहेत. भटके विमुक्त विकास परिषदेच्या महिला विभागाच्याही त्या सदस्य आहेत. गोकूळ नगरीतील उद्योग, शाळा, वसतिगृह हा मोठा पसारा सखूबाईच पाहतात. २00१ मध्ये पहिली ते चौथी वस्तीशाळा सुरू करण्यात आली. या समाजातील ३0 मुलांनी सर्वात आधी शाळा पाहिली. आता या शाळेत ३३ मुले शिकतात, तर बालवाडीत ३७ मुले शिकतात. सखूबाईला शिक्षणाची ही गंगा आणखी वाहती करायची आहे. मिशन सखूबाई : भीक मागितल्यानंतर सर्व एकत्र यायचे. सारे तुकडे एकत्र करायचे. एक डोके एक हिस्सा. डोके मग ते प्राण्याचेही. घरात कुत्रे असेल तर त्याचाही वेगळा हिस्सा. गरोदर महिलेच्या पोटातील बाळालाही वेगळा हिस्सा, अशी त्यांची पद्धत. आता भीक मागण्याचे प्रमाण ४0 टक्क्यांवर आले आहे. सखूबाईला ते झीरो टक्क्यावर आणायचे आहे. 
मुलांची नावे खोकल्या, गांजा.. : जागा मिळाली. नागरिकत्व मिळाले. रेशनकार्डवर नाव आले. एकेकाची तीन-तीन नावे. शाहरूख, सलमान, अमिताभ. एकाचीच ही सारी नावे. स्वत:ला नाव नाही, मग पोरांची काय ठेवायची? गांजा पिणार्‍याचे नाव गांजा, सतत खोकणार्‍याला खोकल्या. पुढे मात्र नाव ठेवण्याची पद्धतही सुरू झाली.