शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आधुनिक 'गोकूळ' नगरीची अनोखी सखूमाय

By admin | Updated: October 2, 2014 12:40 IST

पायपुसणेनिर्मितीचे प्रशिक्षण ते वस्तीशाळेचा प्रवास

आठवी माळ - कला : पायपुसणेनिर्मितीचे प्रशिक्षण ते वस्तीशाळेचा प्रवास

गजानन दिवाण■ औरंगाबाद
अनसरवाडा. ७४0 जणांचे हे एक गावच. भीक मागायची. त्याच पैशातून दारू प्यायची. मिळालेले तुकडे खायचे. यात बायकाही मागे नसत. आंघोळ त्यांना ठाऊकच नव्हती. पिण्याचे पाणी प्रातर्विधीला वापरणे ते पाप समजायचे. घरात स्वयंपाक करून जेवण करतात, हे त्यांच्या गावीही नव्हते. सखूबाईने समाजाचा विरोध पत्करत पायपुसणे तयार करण्याची कला अवगत केली. त्याचे प्रशिक्षण इतर महिलांनाही दिले. आज प्रत्येक घरात चूल पेटते. भीक मागण्याचे प्रमाण ४0टक्क्यांवर आले आहे. आता त्यांची पोरं शाळेतही जाऊ लागली आहेत. एखाद्या जादूगाराने करावा, असा हा बदल सखूबाईच्या एका बंडाने झाला. 
सखूबाई बंडीधनगर. वय वर्षे ६३. जन्म कुठला ठाऊक नाही. कर्नाटक वा आंध्र प्रदेशातला असावा. ३१व्या वर्षीच नवर्‍याचा मृत्यू झाला. एकूण १0 मुले. तीन गेली. सात मुले आणि एक मुलगी. मुले लहान असल्याने समाजाने कसरतीचा खेळही शिकविला नाही. मुलांचे आणि आपले पोट कसे भरणार? या समाजात पोटभर अन्न कोणालाच मिळायचे नाही. तारेवरच्या कसरती करून पैसा किती मिळणार? पोट भरेल एवढी भीक तरी कोण देणार? मग ही भूक मारण्यासाठी स्पिरीट प्यायचे. बायकांपासून पोरांपर्यंत, लहानथोर सार्‍यांनाच हे व्यसन. कोणी गावठी दारू पिऊन, तर कोणी स्पिरीट पिऊन भूक मारायचे. सखूबाईने आपले आणि पोराचे पोट भागविण्यासाठी हाच व्यवसाय सुरू केला. या विक्रीतून कसेबसे पोट भरायचे. गोपाळ गडकरी (पहिलवान) नावाने हा समाज ओळखला जातो. काही जण त्याला डोंबारीही म्हणतात. 
१९ वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. भटकत भटकत हा समाज लातूर जिल्ह्यातील अनसरवाडा (ता. निलंगा) येथे पोचला. शाळेच्या कडेलाच त्यांचा तंबू होता. याच गावातला तरुण नरसिंग झरे हा या शाळेत शिकवणी घ्यायचा. ती सुरू असताना त्यांची मुले दंगा करायची आणि पळून जायची. यामुळे त्रासलेल्या नरसिंगने या मुलांचा पाठलाग करीत त्यांचा तंबू गाठला. आईबाप आणि मुलेही दारू प्यायलेले. तक्रार कुणाकडे करायची? हे चित्र पाहून अस्वस्थ झालेल्या नरसिंगला या समाजासाठी काहीतरी करायचे, या विचाराने झपाटले. याकामी सखूबाईने त्याला मोलाची साथ दिली. कसरतीचे खेळ करताना या समाजातील काही तरुण सनई-ढोल वाजवायचे. यातील सुदाम नावाच्या तरुणाला नरसिंगने बँडचे प्रशिक्षण घेण्यासाठी हैदराबादला पाठविले. पुढे २0 जणांना त्याने प्रशिक्षण दिले. वर्षभराचा काळ गेला. गोकूळ बँजो नावाची बँड पार्टी स्थापन झाली. आता असे अनेक ग्रुप स्थापन केले आहेत. पुरुषांच्या रोजगाराचा प्रश्न मिटला, पण महिलांचे काय करायचे? सखूबाईला पुण्याला खादी ग्रामोद्योगमध्ये प्रशिक्षणासाठी पाठविण्याचे ठरले. मात्र आपली एकटी महिला समाज सोडून कुठे जाणे, या जातपंचायतीला मान्य नव्हते. हा नियम सखूबाईने मोडला. सखूबाई सहा महिने पुण्यात राहिल्या. सारे काही शिकून परतल्या. संतापलेल्या पंचायतीने सखूबाईला जातीबाहेर काढले. दीडशे रुपये दंड भरून नंतर त्यांना जातीत घेण्यात आले. सखूबाईंनी नंतर प्रत्येक महिलेला प्रशिक्षण दिले. पायपुसणे बनवण्यासह इतर कामांत या सार्‍या महिला गुंतल्या. त्यांनाही रोजगार मिळू लागला. वेरूळ महोत्सवात या उद्योगाला पुरस्कारही मिळाला. तयार माल मुंबई, पुणे, औरंगाबाद, हैदराबादला पाठविला जाऊ लागला. 
कॉ. माणिकराव जाधव यांच्या मदतीतून येथे आठ घरे बांधण्यात आली. 'गोकूळ नगरी' असे या वस्तीला नाव देण्यात आले. पुढे मुंबईच्या एका बिल्डरने सार्‍यांनाच घरे बांधून दिली. १९९९मध्ये भटके विमुक्त विकास परिषदद्वारा संचलित गोविंद महाराज गोपाळ समाज विकास परिषद स्थापन करण्यात आली. सखूबाई आता या परिषदेच्या अध्यक्षा आहेत. गोपाळसमाजाच्या राज्य पंचायतीच्या त्या एक सदस्य आहेत. भटके विमुक्त विकास परिषदेच्या महिला विभागाच्याही त्या सदस्य आहेत. गोकूळ नगरीतील उद्योग, शाळा, वसतिगृह हा मोठा पसारा सखूबाईच पाहतात. २00१ मध्ये पहिली ते चौथी वस्तीशाळा सुरू करण्यात आली. या समाजातील ३0 मुलांनी सर्वात आधी शाळा पाहिली. आता या शाळेत ३३ मुले शिकतात, तर बालवाडीत ३७ मुले शिकतात. सखूबाईला शिक्षणाची ही गंगा आणखी वाहती करायची आहे. मिशन सखूबाई : भीक मागितल्यानंतर सर्व एकत्र यायचे. सारे तुकडे एकत्र करायचे. एक डोके एक हिस्सा. डोके मग ते प्राण्याचेही. घरात कुत्रे असेल तर त्याचाही वेगळा हिस्सा. गरोदर महिलेच्या पोटातील बाळालाही वेगळा हिस्सा, अशी त्यांची पद्धत. आता भीक मागण्याचे प्रमाण ४0 टक्क्यांवर आले आहे. सखूबाईला ते झीरो टक्क्यावर आणायचे आहे. 
मुलांची नावे खोकल्या, गांजा.. : जागा मिळाली. नागरिकत्व मिळाले. रेशनकार्डवर नाव आले. एकेकाची तीन-तीन नावे. शाहरूख, सलमान, अमिताभ. एकाचीच ही सारी नावे. स्वत:ला नाव नाही, मग पोरांची काय ठेवायची? गांजा पिणार्‍याचे नाव गांजा, सतत खोकणार्‍याला खोकल्या. पुढे मात्र नाव ठेवण्याची पद्धतही सुरू झाली.