शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

अपघातांचे खापर वाहनचालकांवर, सरकारचा अजब तर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 04:00 IST

राज्यात मोठ्या प्रमाणावर होणारे रस्ते अपघात आणि त्यातील मृत्यूंबाबत सरकारने सारे खापर वाहनचालकांवरच फोडले आहे.

नागपूर : राज्यात मोठ्या प्रमाणावर होणारे रस्ते अपघात आणि त्यातील मृत्यूंबाबत सरकारने सारे खापर वाहनचालकांवरच फोडले आहे. मुंबई-पुणे महामार्ग, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर २०१४ पासून झालेल्या अपघातात ९३८ जणांचा बळी गेला असून २,३२२ जण जबर जखमी झाले आहेत.मात्र, हे अपघात पोलिसांच्या दुर्लक्षामुळे झाले नसून वाहनचालकांच्या निष्काळजीपणामुळे, धोकादायक ओव्हरटेक व अविचाराने, हयगयीने वाहन चालविल्यामुळे झाल्याचे अजब तर्क राज्य सरकारने मांडले आहे.रस्ते अपघाताबाबत भाजपाच्या अतुल भातखळकर यांच्यासह २० सदस्यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. देशातील अपघाती मृत्यूंबाबत महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर असून अपघात रोखण्यासाठी सरकारने काय कार्यवाही केली असा प्रश्न या सदस्यांनी उपस्थित केला होता. या प्रश्नाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी उत्तर दिले. २०१७ मध्ये ३५,८५३ अपघातात १२,२६४ जणांचा मृत्यू झाला. तर, २०,४६५ लोक गंभीर जखमी झाल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या लेखी उत्तरात नमूद केले. २०१८ च्या जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात राज्यात ९,२४३ अपघात झाले असून त्यात ३३६१ लोकांचा मृत्यू झाला. शहरी भागातील अपघातांचे प्रमाण २७ टक्के असून मृत्यूचे प्रमाण १७ टक्के आहे. तर, ग्रामीण भागातील अपघातांचे प्रमाण ७३ टक्के आणि मृत्यूचे प्रमाण ८३ टक्के आहे. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या २०१५ च्या अहवालानुसार रस्ते अपघातात महाराष्ट्राचा देशात तिसरा क्रमांक लागतो असेही या उत्तरात नमूद करण्यात आले आहे.मुंबई-पुणे, मुंबई-गोवा आणि राष्ट्रीय महामार्ग १६६ वर तीन वर्षात ९३८ जणांचा मृत्यू झाला असून २३२२ जबर जखमी तर ९३२ जण किरकोळ जखमी झाले आहेत. मात्र, हे अपघात केवल वाहनचालकांच्या अविचारीपणामुळे झाल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी उत्तरात केला आहे. तर, केंद्र सरकारच्या निकषानुसार राज्यात १३२४ अपघातप्रवण क्षेत्र असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.>पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट पूर्णमुंबई महापालिकेच्या अखत्यारीतील ३०४ पुलांच्या स्ट्रक्चरल आॅडिटचे काम पूर्ण झाले आहे. ३०४ पैकी ११४ पूल सुस्थितीत असून १११ पुलांची किरकोळ दुरुस्ती करावी लागणार आहे. १८ पुलांची पुनर्बांधणी आवश्यक असून ६१ पुलांना मोठ्या दुरुस्तीची गरज असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. काँग्रेसचे वर्षा गायकवाड आणि अमिन पटेल यांनी मुंबई महापालिकेच्या अखत्यारीतील पुलांबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या लेखी उत्तरात मुख्यमंत्र्यांनी आॅडिटचे काम पूर्ण झाल्याचे स्पष्ट केले. याशिवाय, अहवालानुसार पुलांच्या दुरुस्ती व पुनर्बांधणीच्या कामासाठी महापालिकेने निविदा प्रक्रियाही सुरू केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

टॅग्स :Accidentअपघात