शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
4
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
5
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
6
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
7
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
8
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
9
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
10
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
11
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
12
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
13
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
14
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
15
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
16
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
17
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
18
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
19
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
20
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!

अपघातांचे खापर वाहनचालकांवर, सरकारचा अजब तर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 04:00 IST

राज्यात मोठ्या प्रमाणावर होणारे रस्ते अपघात आणि त्यातील मृत्यूंबाबत सरकारने सारे खापर वाहनचालकांवरच फोडले आहे.

नागपूर : राज्यात मोठ्या प्रमाणावर होणारे रस्ते अपघात आणि त्यातील मृत्यूंबाबत सरकारने सारे खापर वाहनचालकांवरच फोडले आहे. मुंबई-पुणे महामार्ग, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर २०१४ पासून झालेल्या अपघातात ९३८ जणांचा बळी गेला असून २,३२२ जण जबर जखमी झाले आहेत.मात्र, हे अपघात पोलिसांच्या दुर्लक्षामुळे झाले नसून वाहनचालकांच्या निष्काळजीपणामुळे, धोकादायक ओव्हरटेक व अविचाराने, हयगयीने वाहन चालविल्यामुळे झाल्याचे अजब तर्क राज्य सरकारने मांडले आहे.रस्ते अपघाताबाबत भाजपाच्या अतुल भातखळकर यांच्यासह २० सदस्यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. देशातील अपघाती मृत्यूंबाबत महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर असून अपघात रोखण्यासाठी सरकारने काय कार्यवाही केली असा प्रश्न या सदस्यांनी उपस्थित केला होता. या प्रश्नाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी उत्तर दिले. २०१७ मध्ये ३५,८५३ अपघातात १२,२६४ जणांचा मृत्यू झाला. तर, २०,४६५ लोक गंभीर जखमी झाल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या लेखी उत्तरात नमूद केले. २०१८ च्या जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात राज्यात ९,२४३ अपघात झाले असून त्यात ३३६१ लोकांचा मृत्यू झाला. शहरी भागातील अपघातांचे प्रमाण २७ टक्के असून मृत्यूचे प्रमाण १७ टक्के आहे. तर, ग्रामीण भागातील अपघातांचे प्रमाण ७३ टक्के आणि मृत्यूचे प्रमाण ८३ टक्के आहे. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या २०१५ च्या अहवालानुसार रस्ते अपघातात महाराष्ट्राचा देशात तिसरा क्रमांक लागतो असेही या उत्तरात नमूद करण्यात आले आहे.मुंबई-पुणे, मुंबई-गोवा आणि राष्ट्रीय महामार्ग १६६ वर तीन वर्षात ९३८ जणांचा मृत्यू झाला असून २३२२ जबर जखमी तर ९३२ जण किरकोळ जखमी झाले आहेत. मात्र, हे अपघात केवल वाहनचालकांच्या अविचारीपणामुळे झाल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी उत्तरात केला आहे. तर, केंद्र सरकारच्या निकषानुसार राज्यात १३२४ अपघातप्रवण क्षेत्र असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.>पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट पूर्णमुंबई महापालिकेच्या अखत्यारीतील ३०४ पुलांच्या स्ट्रक्चरल आॅडिटचे काम पूर्ण झाले आहे. ३०४ पैकी ११४ पूल सुस्थितीत असून १११ पुलांची किरकोळ दुरुस्ती करावी लागणार आहे. १८ पुलांची पुनर्बांधणी आवश्यक असून ६१ पुलांना मोठ्या दुरुस्तीची गरज असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. काँग्रेसचे वर्षा गायकवाड आणि अमिन पटेल यांनी मुंबई महापालिकेच्या अखत्यारीतील पुलांबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या लेखी उत्तरात मुख्यमंत्र्यांनी आॅडिटचे काम पूर्ण झाल्याचे स्पष्ट केले. याशिवाय, अहवालानुसार पुलांच्या दुरुस्ती व पुनर्बांधणीच्या कामासाठी महापालिकेने निविदा प्रक्रियाही सुरू केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

टॅग्स :Accidentअपघात