शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

अपघातांचे खापर वाहनचालकांवर, सरकारचा अजब तर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 04:00 IST

राज्यात मोठ्या प्रमाणावर होणारे रस्ते अपघात आणि त्यातील मृत्यूंबाबत सरकारने सारे खापर वाहनचालकांवरच फोडले आहे.

नागपूर : राज्यात मोठ्या प्रमाणावर होणारे रस्ते अपघात आणि त्यातील मृत्यूंबाबत सरकारने सारे खापर वाहनचालकांवरच फोडले आहे. मुंबई-पुणे महामार्ग, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर २०१४ पासून झालेल्या अपघातात ९३८ जणांचा बळी गेला असून २,३२२ जण जबर जखमी झाले आहेत.मात्र, हे अपघात पोलिसांच्या दुर्लक्षामुळे झाले नसून वाहनचालकांच्या निष्काळजीपणामुळे, धोकादायक ओव्हरटेक व अविचाराने, हयगयीने वाहन चालविल्यामुळे झाल्याचे अजब तर्क राज्य सरकारने मांडले आहे.रस्ते अपघाताबाबत भाजपाच्या अतुल भातखळकर यांच्यासह २० सदस्यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. देशातील अपघाती मृत्यूंबाबत महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर असून अपघात रोखण्यासाठी सरकारने काय कार्यवाही केली असा प्रश्न या सदस्यांनी उपस्थित केला होता. या प्रश्नाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी उत्तर दिले. २०१७ मध्ये ३५,८५३ अपघातात १२,२६४ जणांचा मृत्यू झाला. तर, २०,४६५ लोक गंभीर जखमी झाल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या लेखी उत्तरात नमूद केले. २०१८ च्या जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात राज्यात ९,२४३ अपघात झाले असून त्यात ३३६१ लोकांचा मृत्यू झाला. शहरी भागातील अपघातांचे प्रमाण २७ टक्के असून मृत्यूचे प्रमाण १७ टक्के आहे. तर, ग्रामीण भागातील अपघातांचे प्रमाण ७३ टक्के आणि मृत्यूचे प्रमाण ८३ टक्के आहे. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या २०१५ च्या अहवालानुसार रस्ते अपघातात महाराष्ट्राचा देशात तिसरा क्रमांक लागतो असेही या उत्तरात नमूद करण्यात आले आहे.मुंबई-पुणे, मुंबई-गोवा आणि राष्ट्रीय महामार्ग १६६ वर तीन वर्षात ९३८ जणांचा मृत्यू झाला असून २३२२ जबर जखमी तर ९३२ जण किरकोळ जखमी झाले आहेत. मात्र, हे अपघात केवल वाहनचालकांच्या अविचारीपणामुळे झाल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी उत्तरात केला आहे. तर, केंद्र सरकारच्या निकषानुसार राज्यात १३२४ अपघातप्रवण क्षेत्र असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.>पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट पूर्णमुंबई महापालिकेच्या अखत्यारीतील ३०४ पुलांच्या स्ट्रक्चरल आॅडिटचे काम पूर्ण झाले आहे. ३०४ पैकी ११४ पूल सुस्थितीत असून १११ पुलांची किरकोळ दुरुस्ती करावी लागणार आहे. १८ पुलांची पुनर्बांधणी आवश्यक असून ६१ पुलांना मोठ्या दुरुस्तीची गरज असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. काँग्रेसचे वर्षा गायकवाड आणि अमिन पटेल यांनी मुंबई महापालिकेच्या अखत्यारीतील पुलांबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या लेखी उत्तरात मुख्यमंत्र्यांनी आॅडिटचे काम पूर्ण झाल्याचे स्पष्ट केले. याशिवाय, अहवालानुसार पुलांच्या दुरुस्ती व पुनर्बांधणीच्या कामासाठी महापालिकेने निविदा प्रक्रियाही सुरू केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

टॅग्स :Accidentअपघात