शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पावसाअभावी अघोषित भारनियमन

By admin | Updated: July 14, 2015 01:35 IST

पाऊस लांबल्याने कृषीपंपाचा वाढलेला वापर, हवामानात बदलामुळे वाढलेल्या उष्णतेने १५ दिवसांत विजेच्या मागणीत सुमारे ३ हजार ते ३ हजार ५०० मेगावॅटने वाढ झाली.

मुंबई : पाऊस लांबल्याने कृषीपंपाचा वाढलेला वापर, हवामानात बदलामुळे वाढलेल्या उष्णतेने १५ दिवसांत विजेच्या मागणीत सुमारे ३ हजार ते ३ हजार ५०० मेगावॅटने वाढ झाली. मागणी व पुरवठ्यातील तूट भरून काढण्यासाठी सोमवारी महावितरणकडून राज्यात काही प्रमाणात अघोषित भारनियमन करण्यात आले.राज्यात गेल्या तीन आठवड्यांपासून पावसाने दडी मारली आहे. परिणामी, कृषीपंपाचा वापर वाढला आहे. त्यामुळे १५ दिवसांपूर्वी राज्याची असलेली १३ हजार ५०० ते १४ हजार मेगावॅट विजेची मागणी अचानक वाढून ती १६ हजार ते १६ हजार ५०० मेगावॅटपर्यंत गेली. महानिर्मितीचे परळीमधील सर्व संच पाण्याअभावी बंद आहेत. महानिर्मितीकडून ४ हजार ५०० मेगावॅट अपेक्षित असलेली वीज केवळ ३ हजार ८०० मेगावॅटपर्यंत उपलब्ध होत आहे. शिवाय पवन ऊर्जेतूनही १ हजार ८०० ते २ हजार २०० मेगावॅट अपेक्षित असलेली वीज केवळ १ हजार मेगावॅटपर्यंत उपलब्ध होत आहे. तिरोडामधील अदानी पॉवरचा संच क्रमांक ४ आणि अमरावतीमधील रतन इंडिया प्रकल्पातून अपेक्षित वीज उपलब्ध झाली नाही. त्यामुळे राज्यात सकाळी पावणे दहा वाजता काही ठिकाणी भारनियमन करण्यात आले. कोयनामधील २५० मेगावॅटचा संचही सुरू झाल्याने विजेची उपलब्धता वाढल्याने सायंकाळी उशिरापर्यंत भारनियमनाचे प्रमाण कमी झाले. या सर्व बाबी लक्षात घेता महावितरणने कृषीपंपाचे भारनियमन करण्यात येणार नाही, अशी दक्षता घेतली आहे. त्यांना निश्चित असलेला वीजपुरवठा सुरूच राहणार आहे. (प्रतिनिधी)मागणीत मोठी वाढकेंद्रीय ग्रीडमधून वीज घेऊनही तीव्रतेत तफावत दिसून आली. परिणामी, भारनियमनाचे प्रमाण वाढले. हे भारनियमन आटोक्यात आणण्यासाठी पॉवर एक्सचेंजमधून १ हजार ते १ हजार २०० मेगावॅट वीज काही तासांसाठी विकत घेण्यात आली. आणखी काही दिवस अशीच स्थिती राहिल्यास भारनियमन वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.