शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

पावसाअभावी अघोषित भारनियमन

By admin | Updated: July 14, 2015 01:35 IST

पाऊस लांबल्याने कृषीपंपाचा वाढलेला वापर, हवामानात बदलामुळे वाढलेल्या उष्णतेने १५ दिवसांत विजेच्या मागणीत सुमारे ३ हजार ते ३ हजार ५०० मेगावॅटने वाढ झाली.

मुंबई : पाऊस लांबल्याने कृषीपंपाचा वाढलेला वापर, हवामानात बदलामुळे वाढलेल्या उष्णतेने १५ दिवसांत विजेच्या मागणीत सुमारे ३ हजार ते ३ हजार ५०० मेगावॅटने वाढ झाली. मागणी व पुरवठ्यातील तूट भरून काढण्यासाठी सोमवारी महावितरणकडून राज्यात काही प्रमाणात अघोषित भारनियमन करण्यात आले.राज्यात गेल्या तीन आठवड्यांपासून पावसाने दडी मारली आहे. परिणामी, कृषीपंपाचा वापर वाढला आहे. त्यामुळे १५ दिवसांपूर्वी राज्याची असलेली १३ हजार ५०० ते १४ हजार मेगावॅट विजेची मागणी अचानक वाढून ती १६ हजार ते १६ हजार ५०० मेगावॅटपर्यंत गेली. महानिर्मितीचे परळीमधील सर्व संच पाण्याअभावी बंद आहेत. महानिर्मितीकडून ४ हजार ५०० मेगावॅट अपेक्षित असलेली वीज केवळ ३ हजार ८०० मेगावॅटपर्यंत उपलब्ध होत आहे. शिवाय पवन ऊर्जेतूनही १ हजार ८०० ते २ हजार २०० मेगावॅट अपेक्षित असलेली वीज केवळ १ हजार मेगावॅटपर्यंत उपलब्ध होत आहे. तिरोडामधील अदानी पॉवरचा संच क्रमांक ४ आणि अमरावतीमधील रतन इंडिया प्रकल्पातून अपेक्षित वीज उपलब्ध झाली नाही. त्यामुळे राज्यात सकाळी पावणे दहा वाजता काही ठिकाणी भारनियमन करण्यात आले. कोयनामधील २५० मेगावॅटचा संचही सुरू झाल्याने विजेची उपलब्धता वाढल्याने सायंकाळी उशिरापर्यंत भारनियमनाचे प्रमाण कमी झाले. या सर्व बाबी लक्षात घेता महावितरणने कृषीपंपाचे भारनियमन करण्यात येणार नाही, अशी दक्षता घेतली आहे. त्यांना निश्चित असलेला वीजपुरवठा सुरूच राहणार आहे. (प्रतिनिधी)मागणीत मोठी वाढकेंद्रीय ग्रीडमधून वीज घेऊनही तीव्रतेत तफावत दिसून आली. परिणामी, भारनियमनाचे प्रमाण वाढले. हे भारनियमन आटोक्यात आणण्यासाठी पॉवर एक्सचेंजमधून १ हजार ते १ हजार २०० मेगावॅट वीज काही तासांसाठी विकत घेण्यात आली. आणखी काही दिवस अशीच स्थिती राहिल्यास भारनियमन वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.