शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

बृहन्मुंबईतील प्रदूषणाबाबत बेपर्वाई

By admin | Updated: January 31, 2015 05:33 IST

बृहन्मुंबईतील वायू, जल प्रदूषण, प्रक्रिया न करताच सांडपाणी समुद्रात सोडून देण्याची पद्धत, घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्यातील बेपर्वाई

मुंबई : बृहन्मुंबईतील वायू, जल प्रदूषण, प्रक्रिया न करताच सांडपाणी समुद्रात सोडून देण्याची पद्धत, घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्यातील बेपर्वाई याबाबत लोकसभेच्या स्थायी समितीने शुक्रवारी राज्य सरकारची हजेरी घेतली. बृहन्मुंबईत पर्यावरणविषयक नियमांचे उल्लंघन होत असल्याबाबत नाराजी प्रकट करण्यात आली. मात्र त्याचवेळी बृहन्मुंबईतील लोंढे हे या समस्यांचे एक प्रमुख कारण असल्याचेही समितीचे अध्यक्ष अश्विनीकुमार यांनी पत्रकार परिषदेत कबूल केले.विज्ञान, तंत्रज्ञान, पर्यावरण आणि वने याबाबतची लोकसभेची स्थायी समिती दोन दिवसांच्या मुंबई भेटीवर आली असून, त्यांनी पर्यावरणविषयक सामाजिक संस्था, मच्छीमार संघटना, उद्योगांचे प्रतिनिधी, शहरनियोजन तज्ज्ञ आदींशी चर्चा केली. त्यानंतर राज्य सरकार व मुंबई महापालिकेच्या उच्चाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. स्थायी समितीच्या काही सदस्यांनी सांगितले की, बृहन्मुंबईत वायू, जल प्रदूषणाचे काही गंभीर प्रश्न आहेत. मिठी नदीचे प्रदूषण, समुद्रात कुठलीही प्रक्रिया न करता सोडले जाणारे मैलापाणी तसेच घनकचऱ्याची प्रक्रिया न करता विल्हेवाट लावणे यामुळे लोकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम झालेले आहेत. समुद्रातील जलचरांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. राज्यात पर्यावरणविषयक नियमांची पायमल्ली होत असल्याबाबत राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांकडे समितीने स्पष्टीकरण मागवले. तिवरांची होणारी कत्तल ही अत्यंत चिंताजनक बाब असल्याचेही समितीने नमूद केल्याचे काही सदस्यांनी सांगितले. समितीचे अध्यक्ष अश्विनीकुमार म्हणाले की, देशातील प्रमुख शहरांच्या लोकसंख्येत येत्या काही वर्षांत ३० कोटी लोकांची भर पडणार आहे. (विशेष प्रतिनिधी)