शहरं
Join us  
Trending Stories
1
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
2
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
3
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
4
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
5
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
6
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
7
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
8
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
9
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
10
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
11
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
12
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
13
भारताने तुर्कस्तानला धडा शिकवला! चॉकलेट, फळं, कपड्यांपासून ते पर्यटन; 'या' गोष्टी झाल्या बॉयकॉट
14
"आत्महत्या करण्यापूर्वी तिने सूरजला फोन करुन.."; जिया खानच्या मृत्यूनंतर १२ वर्षांनी झरीना वहाब यांचा मोठा खुलासा
15
भारत-पाक संघर्षात ड्रॅगनची खेळी, खरा विजय चीनचा झाल्याचा दावा; करणार तगडी कमाई, पण कशी?
16
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
17
बॉलिवूडकर गप्प, पण सई ताम्हणकरने थेट घेतलं पाकिस्तानचं नाव; म्हणाली, "ज्यांना सरळ भाषा..."
18
'तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर संपणार नाही...', भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर!
19
'अण्वस्त्रांचा मारा करू, असा इशारा पाकने दिला नव्हता; लढाई पारंपरिक पद्धतीनेच'
20
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."

बृहन्मुंबईतील प्रदूषणाबाबत बेपर्वाई

By admin | Updated: January 31, 2015 05:33 IST

बृहन्मुंबईतील वायू, जल प्रदूषण, प्रक्रिया न करताच सांडपाणी समुद्रात सोडून देण्याची पद्धत, घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्यातील बेपर्वाई

मुंबई : बृहन्मुंबईतील वायू, जल प्रदूषण, प्रक्रिया न करताच सांडपाणी समुद्रात सोडून देण्याची पद्धत, घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्यातील बेपर्वाई याबाबत लोकसभेच्या स्थायी समितीने शुक्रवारी राज्य सरकारची हजेरी घेतली. बृहन्मुंबईत पर्यावरणविषयक नियमांचे उल्लंघन होत असल्याबाबत नाराजी प्रकट करण्यात आली. मात्र त्याचवेळी बृहन्मुंबईतील लोंढे हे या समस्यांचे एक प्रमुख कारण असल्याचेही समितीचे अध्यक्ष अश्विनीकुमार यांनी पत्रकार परिषदेत कबूल केले.विज्ञान, तंत्रज्ञान, पर्यावरण आणि वने याबाबतची लोकसभेची स्थायी समिती दोन दिवसांच्या मुंबई भेटीवर आली असून, त्यांनी पर्यावरणविषयक सामाजिक संस्था, मच्छीमार संघटना, उद्योगांचे प्रतिनिधी, शहरनियोजन तज्ज्ञ आदींशी चर्चा केली. त्यानंतर राज्य सरकार व मुंबई महापालिकेच्या उच्चाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. स्थायी समितीच्या काही सदस्यांनी सांगितले की, बृहन्मुंबईत वायू, जल प्रदूषणाचे काही गंभीर प्रश्न आहेत. मिठी नदीचे प्रदूषण, समुद्रात कुठलीही प्रक्रिया न करता सोडले जाणारे मैलापाणी तसेच घनकचऱ्याची प्रक्रिया न करता विल्हेवाट लावणे यामुळे लोकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम झालेले आहेत. समुद्रातील जलचरांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. राज्यात पर्यावरणविषयक नियमांची पायमल्ली होत असल्याबाबत राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांकडे समितीने स्पष्टीकरण मागवले. तिवरांची होणारी कत्तल ही अत्यंत चिंताजनक बाब असल्याचेही समितीने नमूद केल्याचे काही सदस्यांनी सांगितले. समितीचे अध्यक्ष अश्विनीकुमार म्हणाले की, देशातील प्रमुख शहरांच्या लोकसंख्येत येत्या काही वर्षांत ३० कोटी लोकांची भर पडणार आहे. (विशेष प्रतिनिधी)