शहरं
Join us  
Trending Stories
1
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
3
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
4
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
5
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
6
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
7
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
8
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
9
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
10
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
11
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
12
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा
13
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
14
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
15
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
16
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
17
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
18
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
19
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
20
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट

बृहन्मुंबईतील प्रदूषणाबाबत बेपर्वाई

By admin | Updated: January 31, 2015 05:33 IST

बृहन्मुंबईतील वायू, जल प्रदूषण, प्रक्रिया न करताच सांडपाणी समुद्रात सोडून देण्याची पद्धत, घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्यातील बेपर्वाई

मुंबई : बृहन्मुंबईतील वायू, जल प्रदूषण, प्रक्रिया न करताच सांडपाणी समुद्रात सोडून देण्याची पद्धत, घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्यातील बेपर्वाई याबाबत लोकसभेच्या स्थायी समितीने शुक्रवारी राज्य सरकारची हजेरी घेतली. बृहन्मुंबईत पर्यावरणविषयक नियमांचे उल्लंघन होत असल्याबाबत नाराजी प्रकट करण्यात आली. मात्र त्याचवेळी बृहन्मुंबईतील लोंढे हे या समस्यांचे एक प्रमुख कारण असल्याचेही समितीचे अध्यक्ष अश्विनीकुमार यांनी पत्रकार परिषदेत कबूल केले.विज्ञान, तंत्रज्ञान, पर्यावरण आणि वने याबाबतची लोकसभेची स्थायी समिती दोन दिवसांच्या मुंबई भेटीवर आली असून, त्यांनी पर्यावरणविषयक सामाजिक संस्था, मच्छीमार संघटना, उद्योगांचे प्रतिनिधी, शहरनियोजन तज्ज्ञ आदींशी चर्चा केली. त्यानंतर राज्य सरकार व मुंबई महापालिकेच्या उच्चाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. स्थायी समितीच्या काही सदस्यांनी सांगितले की, बृहन्मुंबईत वायू, जल प्रदूषणाचे काही गंभीर प्रश्न आहेत. मिठी नदीचे प्रदूषण, समुद्रात कुठलीही प्रक्रिया न करता सोडले जाणारे मैलापाणी तसेच घनकचऱ्याची प्रक्रिया न करता विल्हेवाट लावणे यामुळे लोकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम झालेले आहेत. समुद्रातील जलचरांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. राज्यात पर्यावरणविषयक नियमांची पायमल्ली होत असल्याबाबत राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांकडे समितीने स्पष्टीकरण मागवले. तिवरांची होणारी कत्तल ही अत्यंत चिंताजनक बाब असल्याचेही समितीने नमूद केल्याचे काही सदस्यांनी सांगितले. समितीचे अध्यक्ष अश्विनीकुमार म्हणाले की, देशातील प्रमुख शहरांच्या लोकसंख्येत येत्या काही वर्षांत ३० कोटी लोकांची भर पडणार आहे. (विशेष प्रतिनिधी)