शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

आरक्षणाच्या मुद्यावरून सर्वत्र अस्वस्थतता - शरद पवार

By admin | Updated: September 4, 2016 19:16 IST

आरक्षणाच्या मुद्यावरून सध्या सर्वत्र अस्वस्थतता आहे. त्यामुळे प्रत्येक समाजाच्या मूलभूत प्रश्नांची सोडवणूक करण्याची खबरदारी शासनाने घेतली पाहिजे.

ऑनलाइन लोकमत 
पंढरपूर, दि. ५ - आरक्षणाच्या मुद्यावरून सध्या सर्वत्र अस्वस्थतता आहे. त्यामुळे प्रत्येक समाजाच्या मूलभूत प्रश्नांची सोडवणूक करण्याची खबरदारी शासनाने घेतली, तरी ती अस्वस्थता दूर होईल, असे मला वाटते, असे माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी सांगितले.
 
शरद पवार यांनी रविवारी खासदार सुप्रियाताई सुळे, सदानंद सुळे यांच्यासह विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, मंदिर समितीचे माजी अध्यक्ष आण्णासाहेब डांगे, जिल्हाध्यक्ष दीपक साळुंके, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी संजय तेली, व्यवस्थापक विलास महाजन उपस्थित होते. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने शरद पवार यांचा संजय तेली यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
 
गेली ६० वर्षे मराठा समाजाच्या नेत्यांच्या हातात सत्ता असली तरी त्यांनी जातीची सत्ता अशा पद्धतीने कधी बघितली नसल्याचे सांगून शरद पवार म्हणाले, यशवंतराव चव्हाण यांच्यापासून ते आजपर्यंत सत्ता सांभाळताना आमचा व्यापक दृष्टीकोन होता. तो आजही आहे़ मात्र असे असताना कोणत्याही घटकाचे एखादे दुखणे असेल तर ते दुर्लक्षित करून चालणार नसल्याचे सांगत पूर्वी अशा घटकांकडे दुर्लक्ष झाल्याची कबुली त्यांनी दिली़ 
 
आरक्षणाची आजही तेवढीच गरज असल्याची ठाम भूमिका घेताना मराठा, धनगर, जाट, पटेल अशा विविध आरक्षण मागणाºया समाजाचे मूलभूत प्रश्न सोडविल्यास हा असंतोष कमी होईल, त्यामुळे त्यात अधिक लक्ष घालण्याची गरज आहे़ त्यामुळे राज्य व केंद्र शासनाने एकत्र बसून विचार करावा, असे शरद पवार यांनी सांगितले़ 
 
आपण गेली ५० वर्षे सार्वजनिक राजकारणात असून परिवर्तनाच्या प्रश्नावर कधी कोणतीच तडजोड केली नाही़ नामांतर असो, ओबीसी व इतर प्रश्न असो त्यासाठी वेळोवेळी त्याची किंमत मोजली आहे़ असे असले तरी आमची विचारधारा कधी सोडली नाही. असे असताना मला असा प्रश्न विचारायचा कितपत अधिकार त्यांना आहे, असा सवाल करीत उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. शिवसेना राज्यातील सत्ताधारी पक्षाचा घटक असल्याने अ‍ॅट्रॉसिटीसाठी विशेष अधिवेशन बोलावयाचा त्यांचा विचार दिसतोय, असे पवार यांनी सांगितले़ 
 
मंदिर सुधारणाचा घेतला आढावा
शरद पवार यांनी विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेतल्यानंतर मंदिरात चालू असलेल्या सुधारणाचा आढावा घेतला. तसेच मंदिर समितीमार्फत भाविकांसाठी जे भक्त निवास बांधण्यात येत आहे त्याची माहिती दिली असता भक्तनिवासाचे दर हे सामान्य भाविकांना परवडतील असे असावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शिवाय मंदिर समिती कर्मचा-यांना मिळणारे वेतन कमी आहे़ याबाबत प्रशासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, असे संजय तेली यांना शरद पवार सांगितले.