शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
3
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
4
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
5
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
6
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
7
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
8
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
9
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
10
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
11
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
12
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
13
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
14
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
15
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
16
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
17
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
18
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली, आता 'चावी' इराणकडे!
20
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...

सदाभाऊंबद्दलच्या नाराजीने ‘स्वाभिमानी’त अस्वस्थता

By admin | Updated: February 13, 2017 22:27 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मुलूखमैदान तोफ अशी ख्याती असलेल्या कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या मुलाच्या उमेदवारीवरून संघटनेचे

 विश्वास पाटील/ ऑनलाइन लोकमतकोल्हापूर, दि. 13 - स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मुलूखमैदान तोफ अशी ख्याती असलेल्या कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या मुलाच्या उमेदवारीवरून संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केल्याने संघटनेतील कार्यकर्त्यांत सोमवारी सायंकाळनंतर अस्वस्थता पसरली. या दोन नेत्यांतील दुही संघटनेली परवडणारी नाही अशी भावना कार्यकर्त्यांतून व्यक्त झाली. अगोदरच शेतकऱ्यांची बाजू घेवून लढणारे कमी आहेत त्यात आणखी असलेल्यांच्यात दुही निर्माण झाली तर त्यातून नुकसान चळवळीचेच होईल अशीही प्रतिक्रिया कांहीनी व्यक्त केली.शेतकरी चळवळीचे लढाऊ नेते दिवंगत शरद जोशी यांच्यापासून फारकत घेवून शेट्टी यांनी २००२ मध्ये स्वाभिमानी संघटना स्थापन केली. त्यानंतर पुढे नाशिकच्या मोटारसायकल रॅलीवेळी २००८ मध्ये सदाभाऊ खोत यांनी बिंदू चौकात झालेल्या कार्यक्रमावेळी संघटनेत प्रवेश केला. रांगड्या भाषेत अत्यंत आक्रमकपणे सरकारवर तुटून पडणारा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख. त्यांना संघटनेने २०१४ च्या निवडणूकीत माढा मतदार संघातून लोकसभेला उभे केले. चांगली लढत देवूनही त्यांचा पराभव झाला. त्यावेळी हातकणंगले मतदारसंघातून खासदार शेट्टी हे दुसऱ्यांदा विजयी झाले. स्वाभिमानी हा भाजप आघाडीतील मित्रपक्ष असल्याने शेट्टी यांनीच सदाभाऊंना मंत्री करणार असल्याची पहिल्यांदा घोषणा केली. संघटनेमुळेच आपल्याला खासदारकी मिळाली, त्याच संघटनेच्या वाटचालीत सदाभाऊंचाही योगदान असल्यामुळे त्यांनाही सत्तेची सावली कधीतरी मिळावी या भावनेने त्यांनी त्यांच्या मंत्रीपदासाठी आग्रह धरला. भाजपने त्यांना त्यांच्या कोट्यातून विधानपरिषदेवर घेवून कृषी राज्यमंत्री केले. पुढच्या टप्प्यात जानेवारीत स्वच्छता व पाणी पुरवठा राज्यमंत्रीपदाचा अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडे देण्यात आला. त्याचवेळी शेट्टी यांच्या नाकावर टिच्चून भाजपने सदाभाऊंना वजनदार केल्याची चर्चा सुरु झाली होती. त्याचदरम्यान शेट्टी हे देखील भाजपवर शेलक्या भाषेत टीका करु लागले होते. सदाभाऊंना बळ देवून भाजप संघटनेत वात लावत असल्याची भावना त्यांच्याही मनांत तयार झाली होती परंतू जाहीर व्यासपीठावरून ते आपल्यात कोणताही वाद नसल्याचे सांगत होते. चार दिवसांपूर्वीच नृसिंहवाडी येथे झालेल्या पक्षाच्या प्रचार प्रारंभासही हे दोघे नेते एकत्र होते.मी स्वाभिमानीचाच आहे परंतू भाजपसोबत असल्याचे सदाभाऊ सांगत होते. राज्यमंत्रीमंडळात असल्याने त्यांना तसे सांगणे भाग होते. त्यात कोल्हापूर जिल्हा परिषदेत भाजपने स्वाभिमानी सोबत आघाडी केली नाही. तेवढेच करून भाजप गप्प बसलेला नाही. शिरोळमध्येच संघटनेला कसे रोखायचे अशी मोहिम भाजपकडून राबवली जात असल्याचे शेट्टी यांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्या उद्वेगातूनच त्यांनी सदाभाऊंच्या घराणेशाहीबद्दलची भावना बोलून दाखवली असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. संघटना आहे म्हणून दोघांचेही अस्तित्व आहे. त्यातून बाजूला गेले त्यांची अवस्था आता ना घरका ना घाटका...अशी झाली आहे. त्यामुळे वाद असले तरी हे दोन्ही नेते तो विकोपाला जावू देणार नाहीत व संघटनेच्या व्यापक हिताला, शेतकरी चळवळीला प्राधान्य देतील असा विश्र्वासही कार्यकर्त्यांतून व्यक्त झाला.