शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

सदाभाऊंबद्दलच्या नाराजीने ‘स्वाभिमानी’त अस्वस्थता

By admin | Updated: February 13, 2017 22:27 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मुलूखमैदान तोफ अशी ख्याती असलेल्या कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या मुलाच्या उमेदवारीवरून संघटनेचे

 विश्वास पाटील/ ऑनलाइन लोकमतकोल्हापूर, दि. 13 - स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मुलूखमैदान तोफ अशी ख्याती असलेल्या कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या मुलाच्या उमेदवारीवरून संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केल्याने संघटनेतील कार्यकर्त्यांत सोमवारी सायंकाळनंतर अस्वस्थता पसरली. या दोन नेत्यांतील दुही संघटनेली परवडणारी नाही अशी भावना कार्यकर्त्यांतून व्यक्त झाली. अगोदरच शेतकऱ्यांची बाजू घेवून लढणारे कमी आहेत त्यात आणखी असलेल्यांच्यात दुही निर्माण झाली तर त्यातून नुकसान चळवळीचेच होईल अशीही प्रतिक्रिया कांहीनी व्यक्त केली.शेतकरी चळवळीचे लढाऊ नेते दिवंगत शरद जोशी यांच्यापासून फारकत घेवून शेट्टी यांनी २००२ मध्ये स्वाभिमानी संघटना स्थापन केली. त्यानंतर पुढे नाशिकच्या मोटारसायकल रॅलीवेळी २००८ मध्ये सदाभाऊ खोत यांनी बिंदू चौकात झालेल्या कार्यक्रमावेळी संघटनेत प्रवेश केला. रांगड्या भाषेत अत्यंत आक्रमकपणे सरकारवर तुटून पडणारा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख. त्यांना संघटनेने २०१४ च्या निवडणूकीत माढा मतदार संघातून लोकसभेला उभे केले. चांगली लढत देवूनही त्यांचा पराभव झाला. त्यावेळी हातकणंगले मतदारसंघातून खासदार शेट्टी हे दुसऱ्यांदा विजयी झाले. स्वाभिमानी हा भाजप आघाडीतील मित्रपक्ष असल्याने शेट्टी यांनीच सदाभाऊंना मंत्री करणार असल्याची पहिल्यांदा घोषणा केली. संघटनेमुळेच आपल्याला खासदारकी मिळाली, त्याच संघटनेच्या वाटचालीत सदाभाऊंचाही योगदान असल्यामुळे त्यांनाही सत्तेची सावली कधीतरी मिळावी या भावनेने त्यांनी त्यांच्या मंत्रीपदासाठी आग्रह धरला. भाजपने त्यांना त्यांच्या कोट्यातून विधानपरिषदेवर घेवून कृषी राज्यमंत्री केले. पुढच्या टप्प्यात जानेवारीत स्वच्छता व पाणी पुरवठा राज्यमंत्रीपदाचा अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडे देण्यात आला. त्याचवेळी शेट्टी यांच्या नाकावर टिच्चून भाजपने सदाभाऊंना वजनदार केल्याची चर्चा सुरु झाली होती. त्याचदरम्यान शेट्टी हे देखील भाजपवर शेलक्या भाषेत टीका करु लागले होते. सदाभाऊंना बळ देवून भाजप संघटनेत वात लावत असल्याची भावना त्यांच्याही मनांत तयार झाली होती परंतू जाहीर व्यासपीठावरून ते आपल्यात कोणताही वाद नसल्याचे सांगत होते. चार दिवसांपूर्वीच नृसिंहवाडी येथे झालेल्या पक्षाच्या प्रचार प्रारंभासही हे दोघे नेते एकत्र होते.मी स्वाभिमानीचाच आहे परंतू भाजपसोबत असल्याचे सदाभाऊ सांगत होते. राज्यमंत्रीमंडळात असल्याने त्यांना तसे सांगणे भाग होते. त्यात कोल्हापूर जिल्हा परिषदेत भाजपने स्वाभिमानी सोबत आघाडी केली नाही. तेवढेच करून भाजप गप्प बसलेला नाही. शिरोळमध्येच संघटनेला कसे रोखायचे अशी मोहिम भाजपकडून राबवली जात असल्याचे शेट्टी यांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्या उद्वेगातूनच त्यांनी सदाभाऊंच्या घराणेशाहीबद्दलची भावना बोलून दाखवली असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. संघटना आहे म्हणून दोघांचेही अस्तित्व आहे. त्यातून बाजूला गेले त्यांची अवस्था आता ना घरका ना घाटका...अशी झाली आहे. त्यामुळे वाद असले तरी हे दोन्ही नेते तो विकोपाला जावू देणार नाहीत व संघटनेच्या व्यापक हिताला, शेतकरी चळवळीला प्राधान्य देतील असा विश्र्वासही कार्यकर्त्यांतून व्यक्त झाला.