शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

सदाभाऊंबद्दलच्या नाराजीने ‘स्वाभिमानी’त अस्वस्थता

By admin | Updated: February 13, 2017 22:27 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मुलूखमैदान तोफ अशी ख्याती असलेल्या कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या मुलाच्या उमेदवारीवरून संघटनेचे

 विश्वास पाटील/ ऑनलाइन लोकमतकोल्हापूर, दि. 13 - स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मुलूखमैदान तोफ अशी ख्याती असलेल्या कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या मुलाच्या उमेदवारीवरून संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केल्याने संघटनेतील कार्यकर्त्यांत सोमवारी सायंकाळनंतर अस्वस्थता पसरली. या दोन नेत्यांतील दुही संघटनेली परवडणारी नाही अशी भावना कार्यकर्त्यांतून व्यक्त झाली. अगोदरच शेतकऱ्यांची बाजू घेवून लढणारे कमी आहेत त्यात आणखी असलेल्यांच्यात दुही निर्माण झाली तर त्यातून नुकसान चळवळीचेच होईल अशीही प्रतिक्रिया कांहीनी व्यक्त केली.शेतकरी चळवळीचे लढाऊ नेते दिवंगत शरद जोशी यांच्यापासून फारकत घेवून शेट्टी यांनी २००२ मध्ये स्वाभिमानी संघटना स्थापन केली. त्यानंतर पुढे नाशिकच्या मोटारसायकल रॅलीवेळी २००८ मध्ये सदाभाऊ खोत यांनी बिंदू चौकात झालेल्या कार्यक्रमावेळी संघटनेत प्रवेश केला. रांगड्या भाषेत अत्यंत आक्रमकपणे सरकारवर तुटून पडणारा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख. त्यांना संघटनेने २०१४ च्या निवडणूकीत माढा मतदार संघातून लोकसभेला उभे केले. चांगली लढत देवूनही त्यांचा पराभव झाला. त्यावेळी हातकणंगले मतदारसंघातून खासदार शेट्टी हे दुसऱ्यांदा विजयी झाले. स्वाभिमानी हा भाजप आघाडीतील मित्रपक्ष असल्याने शेट्टी यांनीच सदाभाऊंना मंत्री करणार असल्याची पहिल्यांदा घोषणा केली. संघटनेमुळेच आपल्याला खासदारकी मिळाली, त्याच संघटनेच्या वाटचालीत सदाभाऊंचाही योगदान असल्यामुळे त्यांनाही सत्तेची सावली कधीतरी मिळावी या भावनेने त्यांनी त्यांच्या मंत्रीपदासाठी आग्रह धरला. भाजपने त्यांना त्यांच्या कोट्यातून विधानपरिषदेवर घेवून कृषी राज्यमंत्री केले. पुढच्या टप्प्यात जानेवारीत स्वच्छता व पाणी पुरवठा राज्यमंत्रीपदाचा अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडे देण्यात आला. त्याचवेळी शेट्टी यांच्या नाकावर टिच्चून भाजपने सदाभाऊंना वजनदार केल्याची चर्चा सुरु झाली होती. त्याचदरम्यान शेट्टी हे देखील भाजपवर शेलक्या भाषेत टीका करु लागले होते. सदाभाऊंना बळ देवून भाजप संघटनेत वात लावत असल्याची भावना त्यांच्याही मनांत तयार झाली होती परंतू जाहीर व्यासपीठावरून ते आपल्यात कोणताही वाद नसल्याचे सांगत होते. चार दिवसांपूर्वीच नृसिंहवाडी येथे झालेल्या पक्षाच्या प्रचार प्रारंभासही हे दोघे नेते एकत्र होते.मी स्वाभिमानीचाच आहे परंतू भाजपसोबत असल्याचे सदाभाऊ सांगत होते. राज्यमंत्रीमंडळात असल्याने त्यांना तसे सांगणे भाग होते. त्यात कोल्हापूर जिल्हा परिषदेत भाजपने स्वाभिमानी सोबत आघाडी केली नाही. तेवढेच करून भाजप गप्प बसलेला नाही. शिरोळमध्येच संघटनेला कसे रोखायचे अशी मोहिम भाजपकडून राबवली जात असल्याचे शेट्टी यांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्या उद्वेगातूनच त्यांनी सदाभाऊंच्या घराणेशाहीबद्दलची भावना बोलून दाखवली असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. संघटना आहे म्हणून दोघांचेही अस्तित्व आहे. त्यातून बाजूला गेले त्यांची अवस्था आता ना घरका ना घाटका...अशी झाली आहे. त्यामुळे वाद असले तरी हे दोन्ही नेते तो विकोपाला जावू देणार नाहीत व संघटनेच्या व्यापक हिताला, शेतकरी चळवळीला प्राधान्य देतील असा विश्र्वासही कार्यकर्त्यांतून व्यक्त झाला.