शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

अनधिकृत धार्मिक स्थळे लपवली

By admin | Updated: April 26, 2016 04:20 IST

सर्वोच्च व उच्च न्यायालयांच्या आदेशानुसार राज्य शासनाने शहरातील अनधिकृत धार्मिकस्थळांवर कारवाई करण्यास सांगूनदेखील मीरा-भार्इंदर महापालिका टोलवाटोलवी करीत आहे.

धीरज परब,

मीरा रोड- सर्वोच्च व उच्च न्यायालयांच्या आदेशानुसार राज्य शासनाने शहरातील अनधिकृत धार्मिकस्थळांवर कारवाई करण्यास सांगूनदेखील मीरा-भार्इंदर महापालिका टोलवाटोलवी करीत आहे. पालिकेच्या यादीतून सुविधा भूखंडांवरील (आरजी) अनधिकृत धार्मिक स्थळांना सोयीस्करपणे वगळले असून बिल्डरांना पाठीशी घालण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप होत आहे. सार्वजनिक ठिकाणी असलेल्या अनेक बेकायदा धार्मिक स्थळांची नावे आणि क्षेत्रफळ याचा तपशील व्यवस्थित गोळा केला नाही.राज्य शासनाच्या २००१ मधील एका आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी धार्मिक स्थळे उभारू नये. शिवाय, खाजगी जागेत धार्मिक स्थळ उभारण्यासाठी काटेकोर नियमांची अंमलबजावणी करण्यास सांगितले होते. पालिका, पोलीस व महसूल विभागाने स्थानिक स्तरावर नियमांचे काटेकोर पालन न केल्याने शहरातील रस्ते, पदपथ, आरक्षणे, सार्वजनिक जागा, सीआरझेड आदी ठिकाणी सर्रास अनधिकृत धार्मिक स्थळे उभी राहिली आहेत. २००६ साली ‘पिटीशन फॉर लिव्ह टू सिव्हील’ यांनी अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाईकरिता सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन होत नसल्याबद्दल २०१० साली सोसायटी फॉर जस्टीस व इतर संस्था यांनी मुंबई उच्च न्यायालयातील जनहित याचिका दाखल केली. २०११ साली राज्य शासनाने सार्वजनिक व शासकीय जागेवरील अनधिकृत धार्मिक स्थळे तोडण्यासाठी आदेश जारी केले. मीरा-भार्इंदर महापालिकेने शासन आदेशानंतर शहरातील ७८ अनधिकृत धार्मिक स्थळांची यादी प्रभाग समितीनिहाय तयार केली. त्यामध्ये पालिकेने केवळ ‘अ’ व ‘ब’, अशी दोनच वर्गवारी केली आहे. ‘अ’ वर्गातील म्हणजेच नियमित करण्याजोगी ३४ तर ‘ब’ म्हणजेच अनधिकृत तथा हटवण्यायोग्य अशा ४४ धार्मिक स्थळांची यादी जाहीर केली होती. अनधिकृत धार्मिक स्थळे सात दिवसांत हटवा, अशा नोटिसा पालिकेने बजावल्या होत्या. पण, नेहमीप्रमाणेच त्या कुचकामी ठरल्या. ८ आॅक्टोबर २०१५ रोजी न्यायालयाने शासन यंत्रणांची चांगलीच कानउघाडणी करीत अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाईसाठी कालबद्ध कार्यक्र म आखण्याचे आदेश दिले होते. भाजपा-शिवसेना युती शासनाने त्यानुसार नोव्हेंबर २०१५ मध्ये नवीन आदेश काढत २९ सप्टेंबर २००९ पूर्वीची निष्कासित करण्याजोगी धार्मिक स्थळे दोन वर्षांत तोडावी, असे आदेश दिले. स्थलांतरित होऊ शकणारी धार्मिक स्थळे ६ ते ९ महिन्यांत स्थलांतरित करावीत तसेच नियमित करण्याजोगी धार्मिक स्थळे ६ महिन्यांत नियमित करून घ्यावी, असे स्पष्ट कळवले आहे. तर, २९ सप्टेंबर २००९ नंतरची सर्वच धार्मिक स्थळे नऊ महिन्यांत तोडण्याचे आदेशदेखील राज्य शासनाने दिले. परंतु, मीरा-भार्इंदर महापालिकेने न्यायालय व शासन आदेशाला हरताळ फासून पूर्वी जाहीर केलेली अनधिकृत धार्मिक स्थळांची जुनी यादीच ६ एप्रिल रोजी जाहीर केली आहे. ‘ब’ वर्गातील ४४ पैकी ५ धार्मिक स्थळे पालिकेने तोडल्याचा दावा केला, तर १७ धार्मिक स्थळे एमएमआरडीएच्या हद्दीत गेल्याने ‘ब’ वर्गातील धार्मिक स्थळांची संख्या आता २२ इतकीच राहिली आहे. ‘अ’ वर्गातील धार्मिक स्थळांची संख्या मात्र ३४ इतकी कायम आहे. परंतु, नव्याने यादी जाहीर करताना पालिकेने शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांचे फेरसर्वेक्षण केलेच नाही. असंख्य धार्मिक स्थळांचा यादीत समावेशच नाही. इतकेच नव्हे तर यादीत जाहीर केलेल्या धार्मिक स्थळांचे क्षेत्रफळदेखील तद्दन खोटे नमूद केले आहे. अनेक धार्मिक स्थळांबद्दल लोकांनी तक्र ारी करूनदेखील पालिका व पोलीस प्रशासनाने केवळ वेळकाढूपणाच केला,जेणेकरून धार्मिक वाद चिघळत ठेवण्याचे काम या यंत्रणांनी केले. सुविधा भूखंडांमध्ये (आरजी) मोठ्या प्रमाणात अनधिकृत धार्मिक स्थळे बांधली असताना पालिकेच्या यादीत मात्र एकाही आरजी भूखंडावर अनधिकृत धार्मिक स्थळाचा साधा उल्लेखही नाही. आरजीच्या जागा गृहसंकुलात सदनिका खरेदी करणाऱ्या रहिवाशांच्या करमणुकीकरिता वापरात आणणे बंधनकारक आहे. परंतु शहरातील शांतीनगर, शांती पार्क, शीतलनगर, जांगीड कॉम्प्लेक्स, तिरु पती-बालाजी कॉम्प्लेक्स, पद्मावती गोल्डन नेस्ट आदी लहानमोठ्या वसाहतींमध्ये सर्रास आरजी व मोकळ्या जागांत बिल्डरांच्या कृपेने अनधिकृत धार्मिक स्थळे न्यायालय व शासन आदेशाला वाकुल्या दाखवत उभी आहेत.