शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत बांधकामे आता होणार अधिकृत

By admin | Updated: March 12, 2016 04:46 IST

राज्याच्या नागरी भागात ३१ डिसेंबर २०१५पूर्वी झालेली अनधिकृत बांधकामे काही अटींसह नियमित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून, या निर्णयाचा राज्यातील लाखो नागरिकांना होणार आहे.

मुंबई : राज्याच्या नागरी भागात ३१ डिसेंबर २०१५पूर्वी झालेली अनधिकृत बांधकामे काही अटींसह नियमित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून, या निर्णयाचा फायदा मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे, दिघासह राज्यातील लाखो नागरिकांना होणार आहे. सुमारे अडीच लाख अनधिकृत बांधकामे नियमित होणार आहेत.पिंपरी-चिंचवड आणि ठाणे जिल्ह्यातील हजारो अनधिकृत बांधकामे तोडण्याची कारवाई सुरू झाल्यानंतर हा प्रश्न ऐरणीवर आला होता. दिघा येथील काही रहिवाशांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन बांधकाम पाडण्याच्या कारवाईला स्थगिती मिळविली होती. राज्यातील अवैध बांधकामे नियमित करण्यासाठी शासनाने सनदी अधिकारी सीताराम कुंटे यांची समिती नियुक्त केली होती. या समितीने सादर केलेल्या अहवालानुसार बांधकामे नियमित करण्याचा निर्णय घेण्यात आला, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले. (विशेष प्रतिनिधी)विकास योजनेतील रहिवास क्षेत्रामध्ये केलेली अनधिकृत बांधकामे ज्यामध्ये भूखंडाचे क्षेत्र, इमारतीची उंची, तळव्याप्त क्षेत्र, बांधकाम क्षेत्र, इमारतीचा वापर बदल, सामासिक अंतराचे उल्लंघन आदी प्रकारची अनधिकृत बांधकामे शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार व प्रशमन शुल्क आकारून नियमित करण्यात येतील. ती नियमित करताना संबंधित नियोजन प्राधिकरणाच्या नियमावली असलेले टीडीआर, पेड एफएसआय, फंजीबल एफएसआय आदींच्या महत्तम मर्यादेपर्यंतच्या चटई क्षेत्र निर्देशांकापर्यंतची अनधिकृत बांधकामे नियमित करण्यात येतील. प्रतिबंधित क्षेत्राबाबत नियम : राज्य शासनाच्या वा केंद्र सरकारच्या किंवा इतर कोणत्याही स्थानिक प्राधिकरणाच्या जागेवर केलेली किंवा त्यांनी घोषित केलेल्या कोणत्याही प्रतिबंधित क्षेत्रामध्ये (सीआरझेड व अन्य) केलेली तसेच महसूल विभागाच्या इनाम व वर्ग २च्या जमिनीवरील अनधिकृत बांधकामे संबंधित प्राधिकरणांच्या संमतीविना नियमित करण्यात येणार नाहीत. विकास योजनेतील रहिवास क्षेत्राव्यतिरिक्त असलेल्या ना विकास/औद्योगिक/वाणिज्य विभागात असलेली अनधिकृत बांधकामे नियमित करण्यापूर्वी, अशा क्षेत्राचा वापर बदल करून रहिवास विभागात समाविष्ट केल्यानंतर मार्गदर्शक तत्त्वांनुसार नियमित करण्यात येतील. नियोजन प्राधिकरणाने ३१ डिसेंबर २०१५ या तारखेपूर्वी झालेल्या अनधिकृत बांधकामांची सॅटेलाईट इमेजेस व इतर आवश्यक कागदपत्रांनुसार खात्री करून निर्णय घेणे आवश्यक राहील. अशा असतील अटीअनधिकृत बांधकामे नियमित करताना काही अटींचे पालन करावे लागणार आहे. त्यासाठी काही दंडात्मक शुल्क आकारले जाईल. राज्य शासनाने अधिसूचना जारी केल्यानंतर तीन महिन्यांच्या आत बांधकाम नियमित करण्यासंबंधीचा अर्ज स्थानिक प्राधिकरणाकडे करावा लागेल.