शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

अनधिकृत बांधकामांचा धडाका सुरूच

By admin | Updated: January 16, 2017 02:55 IST

बेकायदा बांधकामांच्या विरोधात सिडको, महापालिका आणि एमआयडीसीने बेकायदा बांधकामांच्या विरोधात धडक मोहीम राबविली.

नवी मुंबई : गेल्या वर्षभरात बेकायदा बांधकामांच्या विरोधात सिडको, महापालिका आणि एमआयडीसीने बेकायदा बांधकामांच्या विरोधात धडक मोहीम राबविली. याअंतर्गत जवळपास साडेतीन हजार लहान-मोठी बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. मात्र, या कारवाईला न जुमानता भूमाफियांनी आपल्या कारवाया सुरूच ठेवल्या आहेत. याचा परिणाम म्हणून गेल्या वर्षात जवळपास साडेआठशे नवीन बांधकामे उभारल्याचे दिसून आले आहे. बेकायदा बांधकामांमुळे सायबर सिटीतील मूळ गावे व गावठाणांना बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. पायाभूत सुविधांचा बोजवारा उडाला आहे. फिफ्टी -फिफ्टीच्या नावाखाली रातोरात इमारती उभारण्यात आल्या आहेत. त्यातील घरे गरजूंच्या माथी मारून भूमाफिया परागंदा झाले आहेत. एकूणच माहिती व तंत्रज्ञानाच्या या सुनियोजित शहरात बेकायदा बांधकामांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. उच्च न्यायालयाने २0१२ पूर्वीच्या बांधकामांना अभय दिले आहे. त्यानंतर म्हणजेच जानेवारी २0१३नंतर उभारलेल्या बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश संबंधित प्राधिकरणांना दिले आहेत. त्यानुसार सिडको, महापालिका व एमआयडीसीने कारवाईचा बडगा उगारला आहे. गेल्या वर्षभरात या तिन्ही प्राधिकरणांनी आपापल्या क्षेत्रात कारवाई करून जवळपास साडेतीन हजार लहान-मोठी बांधकामे जमीनदोस्त केली आहेत. यात सर्वाधिक म्हणजेच २000 बांधकामांवर सिडकोच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे एकीकडे कारवाई सुरू असताना दुसरीकडे त्याच जोमाने नवीन बांधकामे उभारण्यात आली आहेत. गेल्या वर्षभरात महापालिका क्षेत्रातील विविध भागांत जवळपास साडेआठशे नवीन बांधकामे उभारली गेल्याचे दिसून आले आहे. यात सर्वाधिक बांधकामे विधानसभेच्या ऐरोली मतदार संघ क्षेत्रात उभारली गेली आहेत. यावरून बेकायदा बांधकामांवरील कारवाईला भूमाफियांनी सपशेल केराची टोपली दाखविल्याचे दिसून येते.>कारवाईचा तपशीलगेल्या वर्षभरात महापालिकेने जवळपास ३०० अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली.सिडकोने आपल्या कार्यक्षेत्रातील नवी मुंबई परिसरात पालिकेसोबत संयुक्त कारवाई करून सुमारे २००० लहान-मोठी बांधकामे जमीनदोस्त केली.एमआयडीसीनेही महापालिका व सिडकोसोबत कारवाई करून जवळपास १००० बांधकामांवर हातोडा चालविला.न्यायालयाच्या आदेशानुसार ४०० पैकी १०० धार्मिकस्थळांवर कारवाई झाली.>मुख्यमंत्र्यांच्या घोषणा भूमाफियांच्या पथ्यावरउच्च न्यायालयाने २0१२ पर्यंतच्या बांधकामांना अभय दिले आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २0१५ पर्यंतची सरसकट सर्वच बेकायदा बांधकामे नियमित करण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्र्यांची ही घोषणा भूमाफियांच्या चांगलीच पथ्यावर पडली आहे. २0१५ पर्यंतची बांधकामे नियमित होणार असतील, तर त्यानंतरचीसुद्धा नियमित होतील, असा अशावाद वाढल्याने भूमाफियांनी कारवाईला भीक न घालता बेकायदा बांधकामांचा धडाका सुरूच ठेवल्याचे दिसून आले आहे.