शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आदेशानंतरही दिघ्यात अनधिकृत इमारती

By admin | Updated: December 22, 2016 04:10 IST

नवी मुंबईतील बेकायदेशीर बांधकामांची पाहणी करून ती तोडण्याचे आदेश देऊनही दिघामध्ये सुमारे ५०० बांधकामे अनधिकृतरीत्या

मुंबई : नवी मुंबईतील बेकायदेशीर बांधकामांची पाहणी करून ती तोडण्याचे आदेश देऊनही दिघामध्ये सुमारे ५०० बांधकामे अनधिकृतरीत्या बांधण्यात आली असल्याची माहिती बुधवारी याचिकाकर्ते राजीव मिश्रा यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे उच्च न्यायालयाला दिली. उच्च न्यायालयाने यासंदर्भात ४ जानेवारी रोजी सुनावणी ठेवली आहे. दिघ्यामध्ये खासगी, तसेच राज्य आणि केंद्र सरकारच्या जागेवर बेकायदेशीर बांधकामे उभारण्यात आल्याबद्दल नवी मुंबईचे सामाजिक कार्यकर्ते राजीव मिश्रा यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठापुढे होती.३० जुलै २०१५ रोजी उच्च न्यायालयाने अस्तित्वात असलेल्या बेकायदेशीर बांधकामांवर हातोडा चालवण्याचा आदेश नवी मुंबई महापालिका, सिडको आणि एमआयडीसीला दिला, तसेच यापुढे बेकायदेशीर बांधकाम उभारण्यात येऊ नयेत, यासाठी वारंवार पाहणी करण्याची व तक्रार करण्यासाठी संकेतस्थळ आणि व्हॉट्स अ‍ॅप नंबरही नागरिकांना उपलब्ध करण्याचे निर्देश दिले. मात्र, उच्च न्यायालयाचे आदेश धाब्यावर बसवून ३० जून २०१५ नंतर नवी मुंबईच्या हद्दीत सुमारे ५०० बेकायदेशीर बांधकामे उभी करण्यात आली. राज्य सरकारने ३१ डिसेंबर २०१५ पर्यंतच्या सर्व बेकायदेशीर बांधकामांना नियमित करण्यासंदर्भात धोरण काढल्याने विकासकांनी चांगलीच संधी घेतली.मिश्रा यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, नवी मुंबईच्या अधिकृत संकेतस्थळावर पालिकेच्या हद्दीतील बेकायदेशीर बांधकामांची आकडेवारी सादर करण्यात आली आहे. त्यानुसार, महापालिकेच्या हद्दीत ३०३ बेकायदेशीर बांधकामे ३० जून २०१५ नंतर उभारण्यात आली आहेत, तर सिडकोने सादर केलेल्या यादीनुसार, महापालिकेच्या हद्दीत ११५ बेकायदेशीर बांधकामे बांधण्यात आली आहेत. याचिकाकर्त्याला आरटीआयद्वारे मिळालेल्या माहितीनुसार, आणखी ११ बेकायदेशीर बांधकामांची भर पडली आहे.उच्च न्यायालयाने याची दखल घेत, याबाबत ४ जानेवारी रोजी सुनावणी ठेवली आहे. (प्रतिनिधी)सरकारच्या नव्या धोरणावर निर्णय?च्सरकारने ३१ डिसेंबर २०१५ पर्यंत बेकायदेशीर बांधकामे नियमित करण्यासंदर्भात धोरण आखले आहे. मात्र हे धोरण उच्च न्यायालयाच्या मंजुरीशिवाय अंतिम केले जाऊ शकत नाही.च्बुधवारच्या सुनावणीत सरकारी वकिलांनी खंडपीठाने यापूर्वी उपस्थित केलेल्या शंका विचारात घेऊन राज्य सरकारने धोरणात सुधारणा केल्याची माहिती खंडपीठाला दिलॅ. त्यावर खंडपीठाने या धोरणावर ४ जानेवारी रोजी निर्णय घेऊ, असे स्पष्ट केले.