शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
3
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
4
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
5
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
6
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
7
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
8
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
9
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
10
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
11
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
12
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
13
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
14
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
15
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
16
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
17
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
18
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
19
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
20
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?

उंबर्डेवासीयांची न्यायालयात धाव

By admin | Updated: May 12, 2015 02:02 IST

केडीएमसी परिक्षेत्रातील घनकचऱ्याचा मुद्दा दिवसागणिक चिघळत चालला आहे. आता उंबर्डेवासीयांनीदेखील कचरा डम्पिंगच्या विरोधात उच्च

कल्याण : केडीएमसी परिक्षेत्रातील घनकचऱ्याचा मुद्दा दिवसागणिक चिघळत चालला आहे. आता उंबर्डेवासीयांनीदेखील कचरा डम्पिंगच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतल्याने घनकचऱ्याच्या भवितव्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.घनकचऱ्याच्या मुद्यावर कार्यवाहीचे आदेश देऊनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या केडीएमसीला फटकारताना उच्च न्यायालयाने नव्या बांधकामांना परवानगी देण्यास नकार दिला आहे. जोपर्यंत आधारवाडी डम्पिंग ग्राउंड बंद करत नाही तसेच घनकचऱ्याबाबत ठोस कार्यवाही होत नाही, तोपर्यंत नवीन बांधकामे करण्यास परवानगी नाही, असे पुनश्च सुनावण्यात आले आहे. यावर घनकचरा प्रक्रिया प्रकल्प उंबर्डे येथे उभारण्याचा निर्णय केडीएमसी प्रशासनाने घेतला आहे. तसेच हा प्रकल्प उभारण्यासाठी लागणारा १८ महिन्यांचा कालावधी पाहता तोपर्यंत मांडा आणि बारावे येथे कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात येणार आहे.दरम्यान, मांडावासीयांनी यास विरोध दर्शविला असताना उंबर्डेवासीयांनी तर आता न्यायालयात धाव घेतली आहे. आधारवाडी येथील डम्पिंग ग्राउंड बंद करून उंबर्डे येथे कचरा डम्प करण्याचा केडीएमसीच्या महासभेने २६ जून २०१३ रोजी केलेला ठराव रद्द करावा, या प्रमुख मागणीबरोबरच कचरा डम्प केल्यास १ लाख ७ हजार नागरिकांना याचा त्रास होणार आहे. उल्हास नदी नजीक असल्याने तीही यामुळे प्रदूषित होईल, तसेच घनकचरा प्रकल्प राबविण्यासंदर्भात महापालिकेचे कोणतेही नियोजन नाही. उंबर्डेआणि आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर निवासी संकुले आणि इमारती, शाळा उभ्या राहत आहेत. प्रदूषित वातावरणाचा त्यांनाही त्रास होणार असल्याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. (प्रतिनिधी)