शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
3
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
4
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
5
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
6
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
7
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
8
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
9
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
11
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
12
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
13
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
14
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
15
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
16
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
17
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
18
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
19
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
20
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले

उद्धव विरुद्ध देवेंद्र राज्यभर घमासान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2017 04:32 IST

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाशी निवडणूक युती तोडल्याचे जाहीर केल्यानंतर आता महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत

यदु जोशी / मुंबईशिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाशी निवडणूक युती तोडल्याचे जाहीर केल्यानंतर आता महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत उद्धव विरुद्ध मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे राजकीय युद्ध पाहायला मिळणार आहे. संयमी, पण राजकीय लढाईत आक्रमकपणा दाखविणारे उद्धव व देवेंद्र यांचे ‘ट्युनिंग’ कालपर्यंत चांगले होते. मात्र, युती तुटल्याने ‘वर्षा’ व ‘मातोश्री’ दरम्यानची हॉटलाइन बंद पडली असून हे दोघे एकमेकांविरुद्ध दंड थोपटताना दिसतील. फडणवीस यांनीही मुंबईसह राज्यात परिवर्तनाचा निर्धार व्यक्त करून शिवसेनेचे आव्हान स्वीकारले आहे. हिंदुत्वाच्या विचारधारांमधील हा मुकाबला असेल. मुंबईवर वर्चस्व कोणाचे याचा फैसला यानिमित्ताने होणार असल्याने दोघांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. युती तुटल्याचा फायदा काँग्रेस व राष्ट्रवादी घेण्याचा निश्चितच प्रयत्न करेल. विशेषत: राज्यभर स्वत:ची व्होट बँक असलेली काँग्रेस या परिस्थितीचा फायदा घेण्यावर लक्ष केंद्रित करेल. पण गेली दोन वर्षे आरोपीच्या पिंजऱ्यात असलेल्या राष्ट्रवादीला कितपत फायदा उठवता येईल, हा प्रश्न आहे. मात्र जिल्हा परिषदांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचेच वर्चस्व आहे, हेही तितकेच महत्त्वाचे. जबड्यात घालुनी हात...‘जबड्यात घालुनी हात, मोजतो दात, जात ही आमुची,’ असे ठणकावून सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी कल्याण-डोंबिवली पालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला चुचकारले होते. आता त्यांचे (भाजपाचे) दात पाडायचेच काम मी करून दाखवतो, असा दणका उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.मुंबईत परिवर्तन - मुख्यमंत्री : जे येतील त्यांच्यासोबत, जे येणार नाहीत त्यांच्याशिवाय. पण परिवर्तन तर होणारच, असे टिष्ट्वट करीत फडणवीस म्हणाले, सत्ता हे साध्य नाही तर ते विकासाचे साधन आहे. पारदर्शी कारभार हा आमचा मूलमंत्र आहे.पवारांना दु:ख : ‘युती तुटल्याचं अतीव दु:ख आहे,’ अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली. शिवसेनेने राज्य सरकारचा पाठिंबा काढला तर राष्ट्रवादी सरकारला पाठिंबा देणार का, या पत्रकारांच्या प्रश्नावर ते उत्तरले, मी जर तरच्या प्रश्नांना उत्तर देत नाही. त्यांनी (भाजपा) काय तो निर्णय घ्यावा आणि मग चर्चेला यावं....तर मनसेचा फायदा झाला असतायुती झाली असती तर मुंबईत दोन्ही पक्षांचे बंडखोर मनसेच्या गळाला लागले असते आणि त्याचा फायदा मनसेला झाला असता. मात्र ती न झाल्याने राज ठाकरे यांना २०१२ च्या निवडणुकीतील यशाची पुनरावृत्ती करण्यासाठी प्रचंड कसरत करावी लागेल. सत्तेत मात्र कायम : युती तुटली असली तरी राज्य सरकारमधून शिवसेना बाहेर पडणार नाही, आम्हाला महाराष्ट्र अस्थिर करायचा नाही, असे खा. संजय राऊत म्हणाले.