शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
2
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
3
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
4
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
5
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
6
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!
7
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
8
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
9
दहावीतील विद्यार्थ्याची नववीतील विद्यार्थ्याने केली हत्या, चाकूने सपासप वार केले आणि...  
10
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
11
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
12
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
13
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
14
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
15
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
16
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
17
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
18
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
19
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
20
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...

नामर्द राज्यकर्त्यांमुळेच मराठी भाषिकांवर अन्याय - उद्धव ठाकरे

By admin | Updated: July 28, 2014 10:27 IST

विद्यमान राज्यकर्ते नामर्द आणि शेळपट असल्यानेच बेळगावमधील सीमावासीयांना कर्नाटक सरकारचा अन्याय सोसावा लागतो अशा तिखट शब्दांत शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

ऑनलाइन टीम
मुंबई, दि. २८ - राज्यातील विद्यमान राज्यकर्ते नामर्द आणि शेळपट असल्यानेच बेळगावमधील सीमावासीयांना कर्नाटक सरकारचा अन्याय सोसावा लागतो अशा तिखट शब्दांत शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी सीमावादावर टीकास्त्र सोडले आहे. महाराष्ट्र सदनातील चपाती प्रकरणावरुन लोकसभेत निवेदन करुन 'कार्यतत्परता' दाखवणा-या केंद्र सरकारने कानडी दहशतवादावरही कार्यतत्परता दाखवून त्यावर लगाम घालावा अशी मागणीही ठाकरेंनी केंद्र सरकारकडे केली आहे. 
येळ्ळुरमधील महाराष्ट्र राज्याचा फलक कर्नाटक पोलिसांनी उद्धवस्त केला होता. तसेच फलक लावणा-या येळ्ळुरमधील ग्रामस्थांवर अमानूष लाठीमार करण्यात आला होता. यापार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून सीमावासीयांच्या प्रश्नावर भाष्य केले आहे. यात उद्धव ठाकरे म्हणतात, महाराष्ट्र - कर्नाटक सीमारेषेवरील मराठी कुटुंबांचा 'रोजा' नसला तरी त्यांना दररोज कानडी अत्याचार सोसावा लागतो. मात्र दुर्दैवाने याविरोधात कोणीही आवाज उठवत नाही. बेळगावात मराठी अस्मितेची पुसटशी खूणही कर्नाटकच्या मस्तवाल सरकारला नको असून या कर्नाटकी अरेरावीला महाराष्ट्राच्या मर्द जनतेने उत्तर दिल्यास काय होईल याचा विचार त्यांनी करावा असा इशाराच त्यांनी दिला आहे. 
मुंबईत कर्नाटक संघ आणि कर्नाटक भवनाच्या इमारती दिमाखात उभ्या असतानाच कर्नाटकमध्ये महाराष्ट्राचा फलकही चालत नाही असे ठाकरेंनी निदर्शनास आणून दिले. राज्यातील जनतेने मुंबईत हॉटेल्स, उद्योग चालवणा-या कानडी मंडळींच्या केसालाही धक्का लावला नसतानाच कर्नाटकात मराठी भाषिकांना पोलिस पायदळी तुडवतात. हे कृत्य हाफीज सईदच्या दहशतवादाप्रमाणे असून न्यायप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी व कणखर गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी या प्रकरणात सीमावासीयांना न्याय मिळवून द्यावा असे ठाकरेंनी म्हटले आहे.