शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

पाकच्या घशातील जमीन आधी सोडवावी, उद्धव ठाकरेंचा संरक्षण दलाला टोला

By admin | Updated: June 24, 2017 07:52 IST

शेतक-यांचे प्रश्न मार्गी लागण्यासाठी सत्तेत असलेल्या शिवसेनेनं वेळोवेळी मित्रपक्ष भाजपाविरोधात कठोर भूमिका घेतली आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 24 - शेतक-यांचे प्रश्न मार्गी  लागण्यासाठी सत्तेत असलेल्या शिवसेनेनं वेळोवेळी मित्रपक्ष भाजपाविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. अलीकडेच संपूर्ण कर्जमाफीसाठी राज्यातील शेतक-यांनी पुकारलेल्या संपामध्ये शिवसेनेनं सहभाग नोंदवला होता. तर दुसरीकडे कल्याणमधील नेवाळी येथे हक्काच्या जमिनींसाठी उग्र आंदोलन छेडणा-या शेतक-यांच्या भूमिकेचंही शिवसेनेनं समर्थन केले आहे.   
 
कश्मीर खो-यात दंगलखोर अतिरेक्यांवर चालविल्या जाणा-या पॅलेट गनचा वापर महाराष्ट्रातील शेतक-यांवर व्हावा यासारखे दुर्दैव ते कोणते!, अशी भावना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सामना संपादकीयमधून व्यक्त केली आहे. 
 
एकदा हस्तांतरित झालेली जमीन पुन्हा मूळ मालकाला देण्याची तरतूद भूसंपादन कायद्यात नसल्याचा खुलासा संरक्षण दलातर्फे करण्यात आला. संरक्षण दलास कश्मीरच्या सीमेवर भरपूर काम बाकी आहे. संरक्षण दलाने पाकच्या घशातील जमीन आधी सोडवून घ्यावी, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी हाणला आहे. नेवाळीत जे घडले ते योग्य नाही. जवानही मरत आहे व किसानही मारला जात आहे आणि तोदेखील आपल्याच भूमीवर! हे बरे नाही,   असेही ते म्हणालेत. 
 
काय आहे नेमके सामना संपादकीयमध्ये ?
मुंबईजवळ कल्याण येथे शेतक-यांवर गोळीबार झाला आहे. कश्मीर खो-यात दंगलखोर अतिरेक्यांवर चालविल्या जाणाऱया पॅलेट गनचा वापर महाराष्ट्रातील शेतकऱयांवर व्हावा यासारखे दुर्दैव ते कोणते! कर्जमाफीच्या प्रश्नावर शेतकऱयांचा संघर्ष संपलेला नाही. त्या आंदोलनाची आग विझली असली तरी धूर निघत आहे. अशा वेळी कल्याणच्या नेवाळी येथील शेतकरी त्यांच्या हक्काच्या जमिनी परत मिळवण्यासाठी रस्त्यावर उतरला व पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार केला. संरक्षण विभाग विरुद्ध भूमिपुत्र असा हा संघर्ष १९४२ सालापासून म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू आहे, हे इथे लक्षात घेतले पाहिजे. १९४२ साली दुसऱया महायुद्धाच्या वेळी नेवाळी येथे ब्रिटिश सैन्याने शेतकऱयांच्या जमिनी संपादित करून नौदलाच्या ताब्यात दिल्या. हा जमिनीचा करार कायमस्वरूपी नव्हता. युद्धपरिस्थितीसाठी केलेली ती सोय होती, पण ब्रिटिशांचे राज्य जाऊन जमाना लोटला तरी शेतकऱयांना त्यांच्या जमिनी परत मिळत नाहीत. त्या जमिनीवर शेतकरी शेती करतोय, पीक काढतोय, पण
 
जमिनींचा हक्क
मिळत नाही व सातबाऱयावर त्याचे नाव येत नाही. यासाठी शेतकऱयांच्या तीन पिढय़ा तिथे संघर्ष करीत आहेत. आता त्या जमिनीवरूनही शेतकऱयांना हटविण्याचा प्रयत्न झाला व तिथे भिंत बांधण्याचे काम सुरू झाले तेव्हा शेतकरी लढण्यासाठी उभा राहिला. त्या शेतकऱयांवर गोळय़ा झाडणे हे पाप आहे. जमाव हिंसक झाला व पोलिसांवर हल्ले झाले हे मान्य आहे, पण शांतपणे जमिनीचा हक्क मागणारा शेतकरी हिंसक का झाला व त्याने जिवावर उदार होऊन कायदा हातात का घेतला? याचे उत्तर गृहखात्यास द्यावेच लागेल. संबंधित जमीन स्वातंत्र्यपूर्व काळापासून नौदलाच्या ताब्यात आहे, असे सांगितल्याने शेतकऱयांचे हक्क संपत नाहीत. ज्या कामासाठी व प्रकल्पासाठी जमिनी ताब्यात घेतल्या त्या योजना त्या जमिनीवर पूर्ण झाल्या काय? नसतील तर त्या जमिनी परत करा. महाराष्ट्रातील सर्वच प्रकल्पग्रस्तांची वेदना नेवाळीच्या रस्त्यावर ज्वालामुखीसारखी बाहेर पडली आहे. कोयना प्रकल्पापासून आताच्या समृद्धी प्रकल्पापर्यंत शेवटी
 
शेतक–यांचेच बळी
गेले. त्यांच्याच शेतजमिनी संपल्या. हे प्रकल्पही पूर्ण झाले नाहीत आणि शेतकऱयांना त्यांच्या जमिनीही परत मिळाल्या नाहीत. हा सरळ सरळ अन्याय आहे. नेवाळीतील जमिनीचा वाद संरक्षण दल व स्थानिक शेतकऱयांतील असेलही, पण शेतकऱयांवर गोळय़ा झाडणारे पोलीस महाराष्ट्र सरकारचे होते. एकदा हस्तांतरित झालेली जमीन पुन्हा मूळ मालकाला देण्याची तरतूद भूसंपादन कायद्यात नसल्याचा खुलासा संरक्षण दलातर्फे करण्यात आला. संरक्षण दलास कश्मीरच्या सीमेवर भरपूर काम बाकी आहे. महाराष्ट्राचे दोन जवान संदीप सर्जेराव जाधव व श्रावण बाळकू माने हे कालच दुश्मनांशी लढताना शहीद झाले आहेत. संरक्षण दलाने पाकच्या घशातील जमीन आधी सोडवून घ्यावी. देशाच्या सीमांवर कुंपण नाही व नेवाळीतील शेतजमिनीवर भिंती उभारण्याचे काम नौदल करते. पुन्हा त्यासाठी शेतकऱयांना मारले जाते. नेवाळीत जे घडले ते योग्य नाही. जवानही मरत आहे व किसानही मारला जात आहे आणि तोदेखील आपल्याच भूमीवर! हे बरे नाही!!