शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं टम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
5
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
6
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
7
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
8
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
9
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
10
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
12
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
13
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
14
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
15
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
16
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
17
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
18
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
19
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
20
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल

"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 20:02 IST

"सगळीकडून दारुण पराभव झाल्यानंतर, अस्तित्व संपल्यानंतर, त्यांना वाटतेय एकत्र येऊन बघा. पण लोकांसाठी काय केलं? हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी माणसाच्या जीवनात परिवर्तन कोणते? सांगावे ना."

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणातशिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र निवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन भाऊ एकत्र येण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. ये दोघेही भाऊ मराठीच्या मुद्द्यावर येकत्र येताना दिसत आहेत. यासंदर्भात आता, पूर्वीचे बाळासाहेबांचे कट्ट्रर शिवसैनिक आणि आताचे भाजपचे ज्येष्ठ नेते तथा खासदार नारायण राणे यांनी थेट भाष्य केले आहे. "हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी माणसाच्या जीवनात परिवर्तन कोणते? सांगावे ना. फक्त यांच्या स्वार्थासाठी एकत्र येत आहेत," असे नारायण राणे यांनी म्हटले आहे. ते एका महाठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

मुलाखतीवेळी, तुम्ही जर बाळासाहेबांना दैवत मानता, तर दोन भाऊ एकत्र येण्याचा तुम्हालाही आनंद वाटायला हवा? असा प्रश्न विचारला असता, राणे उपरोधिकपणे म्हणाले, "केवढा आनंद होतोय, मी शब्दात सांगू शकत नाही, एवढा आनंद होतोय. आनंद म्हणजे काय...? अशक्य गोष्ट शक्य झाली, बाकी काही नाही झालं. अजून झाले नाही, एक होतील, एकत्र येतील तेव्हा आणि एकत्र येऊदे नांदू देना. नांदू दे...," असे राणे म्हणाले. एवढेच नाही तर, मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुका. आता मुंबईत किती टक्के मराठी राहिलेत? किती मराठी लोकं ठेवलीत? मराठी माणसाठी जन्माला आलेली शिवसेना आज काय स्थिती आहे?" असे प्रश्नही त्यांनी केले. ते एबीपी माझासोबत बोलत होते.

50-60 वर्षे झाली. 59 वर्ष तुम्ही बाळासाहेबांसोबत काम केले. आजही या पक्षाला मराठी माणसासाठी झगडावे लागत आहे, भांडावे लागत आहे, याला काय म्हणायचे? यावर बोलताना राणे म्हणाले, "सत्तेवर येणारे अथवा आलेले, यांनी खऱ्या अर्थाने मराठी माणसासाठी असा काही ठसा उमटवला नाही. सोयीचे राजकारण, आपल्या फायद्याचे, आपल्या कुटुंबाचे, एवढेच केले."

आता दोन भाऊ एकत्र येत आहेत, त्यालाही सोयीचेच राजकारण म्हणावे का? असे विचारले असता राणे म्हणाले, "म्हणजे काय? सगळीकडून दारुण पराभव झाल्यानंतर, अस्तित्व संपल्यानंतर, त्यांना वाटतेय एकत्र येऊन बघा. पण लोकांसाठी काय केलं? हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी माणसाच्या जीवनात परिवर्तन कोणते? सांगावे ना. एक-एक मिठाईचा पुडा तरी पाठवणार का प्रत्येक कुटुंबाला? फक्त यांच्या स्वार्थासाठी एकत्र येत आहेत. यांनी बाळासाहेबानंतरची सत्ता वैयक्तिक स्वार्थ, पैसा आणि पदासाठीच, हिंदूत्वचा त्याग करून शरद पवार आणि काँग्रेसबरोबर गेले आणि मुख्यमंत्री झाले." असा टोलाही राणे यांनी यावेळी लगावला.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Uddhav Thackerayउद्धव ठाकरेRaj Thackerayराज ठाकरेShiv SenaशिवसेनाMaharashtra Navnirman Senaमहाराष्ट्र नवनिर्माण सेनाPoliticsराजकारण