शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
2
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
3
अयोध्येत होणार आता भव्य राम मंदिर संग्रहालय; सरकारने दिली ५२ एकर जमीन, TATA कंपनी बांधणार
4
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
5
भाजपचे उमेदवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
6
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
7
“नगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेची पायमल्ली, महायुतीविरोधात हजारो तक्रारी”; काँग्रेसची टीका
8
दिल्लीच्या CM रेखा गुप्ता यांच्या हस्ते पिकलबॉल लीग ट्रॉफीचे अनावरण; मुंबई-चेन्नईसह ६ फ्रँचायझी संघात रंगणार स्पर्धा
9
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
10
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
11
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
12
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
13
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
14
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
15
Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
16
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
17
१.१७ कोटींची बोली लावली, प्रसिद्धी मिळविली, आता म्हणतोय...'नको'; HR 88 B 8888 नंबर प्लेटचा पुन्हा लिलाव होणार
18
IPL 2026 Auction: भारताच्या 'या' Top 10 स्टार क्रिकेटपटूंनी लिलावासाठी केली 'रजिस्ट्रेशन'
19
इथे मतदान करा, तिकडचे बटन दाबा...! आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदान केंद्रातच महिलेला सूचना, गुन्हा दाखल...
20
आधी फिरून येऊ म्हणाला, मग भांडण उकरून काढलं; संतापलेल्या रिक्षा चालकानं गर्लफ्रेंडला काचेच्या बाटलीनं मारलं!
Daily Top 2Weekly Top 5

"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 20:02 IST

"सगळीकडून दारुण पराभव झाल्यानंतर, अस्तित्व संपल्यानंतर, त्यांना वाटतेय एकत्र येऊन बघा. पण लोकांसाठी काय केलं? हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी माणसाच्या जीवनात परिवर्तन कोणते? सांगावे ना."

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणातशिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र निवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन भाऊ एकत्र येण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. ये दोघेही भाऊ मराठीच्या मुद्द्यावर येकत्र येताना दिसत आहेत. यासंदर्भात आता, पूर्वीचे बाळासाहेबांचे कट्ट्रर शिवसैनिक आणि आताचे भाजपचे ज्येष्ठ नेते तथा खासदार नारायण राणे यांनी थेट भाष्य केले आहे. "हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी माणसाच्या जीवनात परिवर्तन कोणते? सांगावे ना. फक्त यांच्या स्वार्थासाठी एकत्र येत आहेत," असे नारायण राणे यांनी म्हटले आहे. ते एका महाठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

मुलाखतीवेळी, तुम्ही जर बाळासाहेबांना दैवत मानता, तर दोन भाऊ एकत्र येण्याचा तुम्हालाही आनंद वाटायला हवा? असा प्रश्न विचारला असता, राणे उपरोधिकपणे म्हणाले, "केवढा आनंद होतोय, मी शब्दात सांगू शकत नाही, एवढा आनंद होतोय. आनंद म्हणजे काय...? अशक्य गोष्ट शक्य झाली, बाकी काही नाही झालं. अजून झाले नाही, एक होतील, एकत्र येतील तेव्हा आणि एकत्र येऊदे नांदू देना. नांदू दे...," असे राणे म्हणाले. एवढेच नाही तर, मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुका. आता मुंबईत किती टक्के मराठी राहिलेत? किती मराठी लोकं ठेवलीत? मराठी माणसाठी जन्माला आलेली शिवसेना आज काय स्थिती आहे?" असे प्रश्नही त्यांनी केले. ते एबीपी माझासोबत बोलत होते.

50-60 वर्षे झाली. 59 वर्ष तुम्ही बाळासाहेबांसोबत काम केले. आजही या पक्षाला मराठी माणसासाठी झगडावे लागत आहे, भांडावे लागत आहे, याला काय म्हणायचे? यावर बोलताना राणे म्हणाले, "सत्तेवर येणारे अथवा आलेले, यांनी खऱ्या अर्थाने मराठी माणसासाठी असा काही ठसा उमटवला नाही. सोयीचे राजकारण, आपल्या फायद्याचे, आपल्या कुटुंबाचे, एवढेच केले."

आता दोन भाऊ एकत्र येत आहेत, त्यालाही सोयीचेच राजकारण म्हणावे का? असे विचारले असता राणे म्हणाले, "म्हणजे काय? सगळीकडून दारुण पराभव झाल्यानंतर, अस्तित्व संपल्यानंतर, त्यांना वाटतेय एकत्र येऊन बघा. पण लोकांसाठी काय केलं? हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी माणसाच्या जीवनात परिवर्तन कोणते? सांगावे ना. एक-एक मिठाईचा पुडा तरी पाठवणार का प्रत्येक कुटुंबाला? फक्त यांच्या स्वार्थासाठी एकत्र येत आहेत. यांनी बाळासाहेबानंतरची सत्ता वैयक्तिक स्वार्थ, पैसा आणि पदासाठीच, हिंदूत्वचा त्याग करून शरद पवार आणि काँग्रेसबरोबर गेले आणि मुख्यमंत्री झाले." असा टोलाही राणे यांनी यावेळी लगावला.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Uddhav Thackerayउद्धव ठाकरेRaj Thackerayराज ठाकरेShiv SenaशिवसेनाMaharashtra Navnirman Senaमहाराष्ट्र नवनिर्माण सेनाPoliticsराजकारण