शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 20:02 IST

"सगळीकडून दारुण पराभव झाल्यानंतर, अस्तित्व संपल्यानंतर, त्यांना वाटतेय एकत्र येऊन बघा. पण लोकांसाठी काय केलं? हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी माणसाच्या जीवनात परिवर्तन कोणते? सांगावे ना."

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणातशिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र निवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन भाऊ एकत्र येण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. ये दोघेही भाऊ मराठीच्या मुद्द्यावर येकत्र येताना दिसत आहेत. यासंदर्भात आता, पूर्वीचे बाळासाहेबांचे कट्ट्रर शिवसैनिक आणि आताचे भाजपचे ज्येष्ठ नेते तथा खासदार नारायण राणे यांनी थेट भाष्य केले आहे. "हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी माणसाच्या जीवनात परिवर्तन कोणते? सांगावे ना. फक्त यांच्या स्वार्थासाठी एकत्र येत आहेत," असे नारायण राणे यांनी म्हटले आहे. ते एका महाठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

मुलाखतीवेळी, तुम्ही जर बाळासाहेबांना दैवत मानता, तर दोन भाऊ एकत्र येण्याचा तुम्हालाही आनंद वाटायला हवा? असा प्रश्न विचारला असता, राणे उपरोधिकपणे म्हणाले, "केवढा आनंद होतोय, मी शब्दात सांगू शकत नाही, एवढा आनंद होतोय. आनंद म्हणजे काय...? अशक्य गोष्ट शक्य झाली, बाकी काही नाही झालं. अजून झाले नाही, एक होतील, एकत्र येतील तेव्हा आणि एकत्र येऊदे नांदू देना. नांदू दे...," असे राणे म्हणाले. एवढेच नाही तर, मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुका. आता मुंबईत किती टक्के मराठी राहिलेत? किती मराठी लोकं ठेवलीत? मराठी माणसाठी जन्माला आलेली शिवसेना आज काय स्थिती आहे?" असे प्रश्नही त्यांनी केले. ते एबीपी माझासोबत बोलत होते.

50-60 वर्षे झाली. 59 वर्ष तुम्ही बाळासाहेबांसोबत काम केले. आजही या पक्षाला मराठी माणसासाठी झगडावे लागत आहे, भांडावे लागत आहे, याला काय म्हणायचे? यावर बोलताना राणे म्हणाले, "सत्तेवर येणारे अथवा आलेले, यांनी खऱ्या अर्थाने मराठी माणसासाठी असा काही ठसा उमटवला नाही. सोयीचे राजकारण, आपल्या फायद्याचे, आपल्या कुटुंबाचे, एवढेच केले."

आता दोन भाऊ एकत्र येत आहेत, त्यालाही सोयीचेच राजकारण म्हणावे का? असे विचारले असता राणे म्हणाले, "म्हणजे काय? सगळीकडून दारुण पराभव झाल्यानंतर, अस्तित्व संपल्यानंतर, त्यांना वाटतेय एकत्र येऊन बघा. पण लोकांसाठी काय केलं? हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी माणसाच्या जीवनात परिवर्तन कोणते? सांगावे ना. एक-एक मिठाईचा पुडा तरी पाठवणार का प्रत्येक कुटुंबाला? फक्त यांच्या स्वार्थासाठी एकत्र येत आहेत. यांनी बाळासाहेबानंतरची सत्ता वैयक्तिक स्वार्थ, पैसा आणि पदासाठीच, हिंदूत्वचा त्याग करून शरद पवार आणि काँग्रेसबरोबर गेले आणि मुख्यमंत्री झाले." असा टोलाही राणे यांनी यावेळी लगावला.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Uddhav Thackerayउद्धव ठाकरेRaj Thackerayराज ठाकरेShiv SenaशिवसेनाMaharashtra Navnirman Senaमहाराष्ट्र नवनिर्माण सेनाPoliticsराजकारण