शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

पहिला डाव भूताचा...; दीपाली सय्यद यांच्या टीकेवर शिवसेनेच्या ठाकरे गटाची खिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2022 13:37 IST

प्रत्येकाने टीका करताना आत्मपरिक्षण करणे गरजेचे आहे. प्रवेश होण्याआधी त्या बोलत आहेत. जर उद्या प्रवेश झाला नाही तर त्या शब्दांवरून पलटीही मारू शकतात असा टोला सुषमा अंधारे यांनी सय्यद यांना लगावला आहे.

मुंबई - शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या दीपाली सय्यद शनिवारपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. तत्पूर्वी सय्यद यांनी ठाकरे गटातील निलम गोऱ्हे, सुषमा अंधारे यांच्यासह उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरेंवर थेट हल्लाबोल केला. मातोश्रीवरील खोक्यामागचे सूत्रधार रश्मी ठाकरे आहेत असा आरोप सय्यद यांनी केला. त्यावर आता शिवसेनेकडून पहिली प्रतिक्रिया आली असून पहिला डाव भूताचा म्हणून सोडून द्या अशा शब्दात दीपाली सय्यद यांच्या विधानाची खिल्ली उडवली आहे. 

याबाबत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या की, दीपाली सय्यद यांची प्रतिक्रिया ऐकून हसायला येते. शिवतीर्थावरील माझे भाषण झाल्यानंतर आपुलकीने दीपाली सय्यद यांनी माझं अभिनंदन केले. कौतुक केले. नारायण राणे, एकनाथ शिंदे यांना विचारलेले प्रश्न योग्य होते असं त्या म्हणाल्या होत्या. कदाचित ४-५ दिवसांत दीपाली सय्यद यांची भूमिका बदललेली असू शकते. गुवाहाटीला आमदार गेल्यानंतर त्यांच्यावर अगदी कडाडून आगपाखड टीका करत होत्या. जर काही कारणं घडली असतील, नवीन वाट चोखाळायची असेल. करिअर घडवण्यासाठी अशी विधाने करावी लागतात असं त्यांनी म्हटलं आहे. 

तसेच प्रत्येकाला करिअर करायचं आहे. कुणासोबत काय वक्तव्य करणं तर बऱ्याचदा माणसं आरशासमोर उभं राहून बोलत असतात. दीपाली सय्यद या त्यातल्या असून पहिला डाव भूताचा म्हणून सोडून दिले पाहिजे. प्रत्येकाने टीका करताना आत्मपरिक्षण करणे गरजेचे आहे. प्रवेश होण्याआधी त्या बोलत आहेत. जर उद्या प्रवेश झाला नाही तर त्या शब्दांवरून पलटीही मारू शकतात असा टोला सुषमा अंधारे यांनी दीपाली सय्यद यांना लगावला आहे. 

काय म्हणाल्या दीपाली सय्यद?मुंबई महानगरपालिकेतील खोके येणं बंद झाल्याची खंत रश्मी वहिनींना वाटत आहे. निलम गोऱ्हे म्हणा किंवा सुषमा अंधारे म्हणा या सगळ्या चिल्लर आहेत. यांच्यापेक्षा सगळ्या महत्त्वाचा दुवा आहे, सूत्रधार आहेत त्या रश्मी वहिनी आहेत,” असा आरोप दीपाली सय्यद यांनी केला. वाद हा मोठ्या पातळीवर होतो, मुंबई पालिका जेव्हा आपल्याकडे कशी येईल, सातत्यानं खोके खोके म्हटलं जातं खोके कोणाकडे आहेत, मुख्य सूत्रधार कोण आहे हे कळलं पाहिजे, कुठे कोणत्या गोष्टी पोहोचल्या जातात हे कळलं पाहिजे असं सय्यद यांनी म्हटलं. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेdeepali sayedदीपाली सय्यदSushma Andhareसुषमा अंधारेShiv Senaशिवसेना