शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
4
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
5
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
6
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
7
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
8
World Cup FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
9
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
10
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
11
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
12
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
13
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
14
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
15
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
16
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
17
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
18
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
19
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर
20
Prabodhini Ekadashi 2025: विष्णूंची योगनिद्रा संपताच सलग २१ दिवस करा ही 'प्रभावी उपासना

पहिला डाव भूताचा...; दीपाली सय्यद यांच्या टीकेवर शिवसेनेच्या ठाकरे गटाची खिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2022 13:37 IST

प्रत्येकाने टीका करताना आत्मपरिक्षण करणे गरजेचे आहे. प्रवेश होण्याआधी त्या बोलत आहेत. जर उद्या प्रवेश झाला नाही तर त्या शब्दांवरून पलटीही मारू शकतात असा टोला सुषमा अंधारे यांनी सय्यद यांना लगावला आहे.

मुंबई - शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या दीपाली सय्यद शनिवारपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. तत्पूर्वी सय्यद यांनी ठाकरे गटातील निलम गोऱ्हे, सुषमा अंधारे यांच्यासह उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरेंवर थेट हल्लाबोल केला. मातोश्रीवरील खोक्यामागचे सूत्रधार रश्मी ठाकरे आहेत असा आरोप सय्यद यांनी केला. त्यावर आता शिवसेनेकडून पहिली प्रतिक्रिया आली असून पहिला डाव भूताचा म्हणून सोडून द्या अशा शब्दात दीपाली सय्यद यांच्या विधानाची खिल्ली उडवली आहे. 

याबाबत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या की, दीपाली सय्यद यांची प्रतिक्रिया ऐकून हसायला येते. शिवतीर्थावरील माझे भाषण झाल्यानंतर आपुलकीने दीपाली सय्यद यांनी माझं अभिनंदन केले. कौतुक केले. नारायण राणे, एकनाथ शिंदे यांना विचारलेले प्रश्न योग्य होते असं त्या म्हणाल्या होत्या. कदाचित ४-५ दिवसांत दीपाली सय्यद यांची भूमिका बदललेली असू शकते. गुवाहाटीला आमदार गेल्यानंतर त्यांच्यावर अगदी कडाडून आगपाखड टीका करत होत्या. जर काही कारणं घडली असतील, नवीन वाट चोखाळायची असेल. करिअर घडवण्यासाठी अशी विधाने करावी लागतात असं त्यांनी म्हटलं आहे. 

तसेच प्रत्येकाला करिअर करायचं आहे. कुणासोबत काय वक्तव्य करणं तर बऱ्याचदा माणसं आरशासमोर उभं राहून बोलत असतात. दीपाली सय्यद या त्यातल्या असून पहिला डाव भूताचा म्हणून सोडून दिले पाहिजे. प्रत्येकाने टीका करताना आत्मपरिक्षण करणे गरजेचे आहे. प्रवेश होण्याआधी त्या बोलत आहेत. जर उद्या प्रवेश झाला नाही तर त्या शब्दांवरून पलटीही मारू शकतात असा टोला सुषमा अंधारे यांनी दीपाली सय्यद यांना लगावला आहे. 

काय म्हणाल्या दीपाली सय्यद?मुंबई महानगरपालिकेतील खोके येणं बंद झाल्याची खंत रश्मी वहिनींना वाटत आहे. निलम गोऱ्हे म्हणा किंवा सुषमा अंधारे म्हणा या सगळ्या चिल्लर आहेत. यांच्यापेक्षा सगळ्या महत्त्वाचा दुवा आहे, सूत्रधार आहेत त्या रश्मी वहिनी आहेत,” असा आरोप दीपाली सय्यद यांनी केला. वाद हा मोठ्या पातळीवर होतो, मुंबई पालिका जेव्हा आपल्याकडे कशी येईल, सातत्यानं खोके खोके म्हटलं जातं खोके कोणाकडे आहेत, मुख्य सूत्रधार कोण आहे हे कळलं पाहिजे, कुठे कोणत्या गोष्टी पोहोचल्या जातात हे कळलं पाहिजे असं सय्यद यांनी म्हटलं. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेdeepali sayedदीपाली सय्यदSushma Andhareसुषमा अंधारेShiv Senaशिवसेना