शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

शिवसेनेची अवस्था बघून वाईट वाटत पण सांगणार कोणाला, याला उद्धव ठाकरेच जबाबदार- नारायण राणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2022 20:21 IST

शिवसेनेचे नाव आणि चिन्ह गेलं यांचे जरूर शल्य आहे पण सांगणार कोणाला काही गोष्टी बोलता येत नाही असे म्हणत केंद्रीय मंत्री नारायण राणे शिवसेनेच्या होत असलेल्या पडझडीवर थोडे भावनाविवश झाले.

सावंतवाडी :

शिवसेनेचे नाव आणि चिन्ह गेलं यांचे जरूर शल्य आहे पण सांगणार कोणाला काही गोष्टी बोलता येत नाही असे म्हणत केंद्रीय मंत्री नारायण राणे शिवसेनेच्या होत असलेल्या पडझडीवर थोडे भावनाविवश झाले. पण या सगळ्याला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना जबाबदार धरत त्यांनी स्वतःच ही राजकीय आत्महत्या केली आहे अशी टिका ही केली.

ते सावंतवाडीत पत्रकारांशी बोलत होते.यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली, संजू परब, संदीप कुडतरकर, शहर अध्यक्ष अजय गोंदावळे, तालुकाध्यक्ष महेश धुरी, विनोद सावंत, राजू बेग,जावेद खतीब,गुरूनाथ सावंत,रविद्र मडगावकर,मोहिनी मडगावकर,केतनआजगावकर,अमित परब, आनंद नेवगी आदि उपस्थित होते.

राणे म्हणाले, मी शिवसेनेतून त्यावेळी एकटा बाहेर पडलो होतो त्याचा परिणाम शिवसेनेवर नक्कीच झाला माझे  त्यावेळचे बंड आणि आता चाळीस आमदारांनी केलेला बंड यांच्यामध्ये  मोठा फरक आहे आणि विषयही वेगवेगळे आहेत. त्यामुळे शिवसेनेची पडझड होत असल्याचे शल्य जरूर आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात भात कापणीच्या हंगामामध्ये पाऊस कोसळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून मी लक्ष देणार आहे. भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना यांची युती करू पण सोयीच्या ठिकाणी करू जिल्हा परिषद, पंचायत समिती , नगरपरिषद सहकार क्षेत्रातील निवडणुकीमध्ये स्थानिक विचाराने ठरवले जाईल. 

मनसेचे अध्यक्ष राजे ठाकरे यांनी अंधेरी पोट निवडणुकीमध्ये भाजपने उमेदवारी मागे घ्यावी आणि रमेश लटके यांच्या पत्नीला पाठिंबा द्यावा असे पत्र दिले आहे मी त्यावर काही बोलणार नाही. असे सांगत विषय टाळला मात्र राणे यांनी शिवसेना नेते  विनायक राऊत, भास्कर जाधव व उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या टिकेचा समाचार घेतला.या तिघांनी पुढ्यात येऊन बोलावे यातील कोणाला रोजगार तरी दिला काय मी अनेकांची घरे बांधून दिली कोणाला उध्वस्त केले नाही जर मी बोलायला लागलो तर हे सर्व जण वाहून जातील, अशी टिका ही राणे यांनी केली.आमदार वैभव नाईक यांनी गौरमार्गाने संपत्ती मिळवली असेल तर त्यांची चौकशी होईल. सरकारला पाठिंबा देण्यासाठी त्यांना यात गुंतवले जाते हा आरोप पूर्ण पणे खोटा असून सरकार पूर्ण बहुमत असताना नाईक यांची सरकारला गरज तरी काय असा सवाल ही मंत्री राणे यांनी उपस्थित केलाआमच्या काळामध्ये अडीचशे कोटीचा नियोजन आराखडा होता पण आता तो 170 कोटी झाला याला जबाबदार कोण असा सवाल करत आता आमचे सरकार आहे त्यामुळेच विकास ही जलद होईल असे सांगितले.तसेच प्रकल्प ही मोठ्याप्रमाणात जिल्ह्यात येतील असे सांगितले.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे