शहरं
Join us  
Trending Stories
1
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex १६६ आणि निफ्टी ३१ अंकांच्या तेजीसह खुला, 'हे' शेअर्स वधारले
4
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
5
भारताबाबत ट्रम्प यांनी मोठी चूक केली, दिग्गज अर्थतज्ज्ञानं साधला निशाणा; म्हणाले, "हे म्हणणं एकदम..."
6
Video : ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच! भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक; रशियाच्या कामचटकाचा धोका अजूनही टळेना
7
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
8
पुत्रदा एकादशी-बुध प्रदोष: ८ राशींना सर्वोत्तम काळ, शुभ-लाभ; हाती पैसा राहील, कल्याण होईल!
9
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
10
वसईची भयंकर घटना, मुंबईला धोक्याची घंटा!
11
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
12
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
13
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
14
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
15
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
16
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
17
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
18
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
19
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
20
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ

शिवसेनेची अवस्था बघून वाईट वाटत पण सांगणार कोणाला, याला उद्धव ठाकरेच जबाबदार- नारायण राणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2022 20:21 IST

शिवसेनेचे नाव आणि चिन्ह गेलं यांचे जरूर शल्य आहे पण सांगणार कोणाला काही गोष्टी बोलता येत नाही असे म्हणत केंद्रीय मंत्री नारायण राणे शिवसेनेच्या होत असलेल्या पडझडीवर थोडे भावनाविवश झाले.

सावंतवाडी :

शिवसेनेचे नाव आणि चिन्ह गेलं यांचे जरूर शल्य आहे पण सांगणार कोणाला काही गोष्टी बोलता येत नाही असे म्हणत केंद्रीय मंत्री नारायण राणे शिवसेनेच्या होत असलेल्या पडझडीवर थोडे भावनाविवश झाले. पण या सगळ्याला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना जबाबदार धरत त्यांनी स्वतःच ही राजकीय आत्महत्या केली आहे अशी टिका ही केली.

ते सावंतवाडीत पत्रकारांशी बोलत होते.यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली, संजू परब, संदीप कुडतरकर, शहर अध्यक्ष अजय गोंदावळे, तालुकाध्यक्ष महेश धुरी, विनोद सावंत, राजू बेग,जावेद खतीब,गुरूनाथ सावंत,रविद्र मडगावकर,मोहिनी मडगावकर,केतनआजगावकर,अमित परब, आनंद नेवगी आदि उपस्थित होते.

राणे म्हणाले, मी शिवसेनेतून त्यावेळी एकटा बाहेर पडलो होतो त्याचा परिणाम शिवसेनेवर नक्कीच झाला माझे  त्यावेळचे बंड आणि आता चाळीस आमदारांनी केलेला बंड यांच्यामध्ये  मोठा फरक आहे आणि विषयही वेगवेगळे आहेत. त्यामुळे शिवसेनेची पडझड होत असल्याचे शल्य जरूर आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात भात कापणीच्या हंगामामध्ये पाऊस कोसळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून मी लक्ष देणार आहे. भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना यांची युती करू पण सोयीच्या ठिकाणी करू जिल्हा परिषद, पंचायत समिती , नगरपरिषद सहकार क्षेत्रातील निवडणुकीमध्ये स्थानिक विचाराने ठरवले जाईल. 

मनसेचे अध्यक्ष राजे ठाकरे यांनी अंधेरी पोट निवडणुकीमध्ये भाजपने उमेदवारी मागे घ्यावी आणि रमेश लटके यांच्या पत्नीला पाठिंबा द्यावा असे पत्र दिले आहे मी त्यावर काही बोलणार नाही. असे सांगत विषय टाळला मात्र राणे यांनी शिवसेना नेते  विनायक राऊत, भास्कर जाधव व उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या टिकेचा समाचार घेतला.या तिघांनी पुढ्यात येऊन बोलावे यातील कोणाला रोजगार तरी दिला काय मी अनेकांची घरे बांधून दिली कोणाला उध्वस्त केले नाही जर मी बोलायला लागलो तर हे सर्व जण वाहून जातील, अशी टिका ही राणे यांनी केली.आमदार वैभव नाईक यांनी गौरमार्गाने संपत्ती मिळवली असेल तर त्यांची चौकशी होईल. सरकारला पाठिंबा देण्यासाठी त्यांना यात गुंतवले जाते हा आरोप पूर्ण पणे खोटा असून सरकार पूर्ण बहुमत असताना नाईक यांची सरकारला गरज तरी काय असा सवाल ही मंत्री राणे यांनी उपस्थित केलाआमच्या काळामध्ये अडीचशे कोटीचा नियोजन आराखडा होता पण आता तो 170 कोटी झाला याला जबाबदार कोण असा सवाल करत आता आमचे सरकार आहे त्यामुळेच विकास ही जलद होईल असे सांगितले.तसेच प्रकल्प ही मोठ्याप्रमाणात जिल्ह्यात येतील असे सांगितले.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे