शहरं
Join us  
Trending Stories
1
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
2
"कमी जागा मिळो अथवा जास्त, मुख्यमंत्री नितीश कुमारच होणार", जदयूचा भाजपला स्पष्ट मेसेज, एनडीएमध्ये पेच
3
पाकिस्तान समर्थक जमात ए इस्लामीने बांगलादेशात दाखवली ताकद; देशात इस्लामिक राजवटीचे संकेत?
4
तेल ते टेलिकॉमपर्यंत... उद्योगपती मुकेश अंबानींचं साम्राज्य किती मोठं? इतक्या कंपनीचे आहेत मालक
5
महाराष्ट्रातील ४-५ मंत्र्यांना मिळणार डच्चू?; संजय राऊतांचा दावा, एका मंत्र्याचं नावही सांगितले
6
लँडिंगची तयारी अन् अचानक उड्डाण; दोन विमानांच्या २५ मिनिटे आकाशात! इंडिगोच्या विमानांमध्ये प्रवाशांचा थरकाप
7
शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित, कृषीमंत्री ‘रमी’ खेळण्यात मग्न; रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला
8
"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?"
9
'स्लीपिंग प्रिन्स'ची २० वर्षांची लढाई संपली! वडिलांनी लाईफ सपोर्ट काढण्यास दिला होता नकार!
10
ओडिशात नराधमांनी किशोरवयीन मुलीला पेटवले, ७० टक्के भाजल्याने प्रकृती गंभीर
11
Live in Partner Murder: 'एएसआय' लिव्ह पार्टनरची हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण
12
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
13
विधानसभा विरोधी पक्षनेतेपद रिकामेच, आता नागपूर अधिवेशनापर्यंत प्रतीक्षा!
14
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
15
सभागृहाबाहेरच्या कारनाम्यांनी सरकारची अधिवेशनातील कामगिरी झाकोळली!
16
महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या निवडणुकीत 'सहकार पॅनेल'ची आघाडी: २१ पैकी ९ उमेदवार बिनविरोध
17
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार’ जाहीर
18
भारताची ताकद जग बघेल! शुभांशू शुक्लांच्या अनुभवातून गगनयानला बळ, स्वदेशी मोहिमेची तयारी
19
यूट्यूबवरून आयडिया मिळाली; क्यूआर कोड बदलून दुकानदारांची फसवणूक केली
20
ड्रग्ज विक्रीसाठी आलेले सहा जण अटकेत, ५४ लाख ४६ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त

विधानसभा निवडणुकीत मविआच्या चुका झाल्या, उद्धव ठाकरे यांचे मत; अहंकारावरही बोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2025 09:52 IST

विधानसभेच्या गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीत जागावाटपात आणि उमेदवारांची निवड करण्यातही विलंब झाला, असे मत उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.

मुंबई : विधानसभेच्या गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीत जागावाटपात आणि उमेदवारांची निवड करण्यातही विलंब झाला, असे मत उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. अशाच चुकांची पुनरावृत्ती झाली तर मग महाविकास आघाडीचे औचित्य काय उरेल, असा प्रश्नही त्यांनी केला. 

उद्धवसेनेच्या मुखपत्राला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मविआने जोरदार यश मिळविले होते, त्यावेळी असलेला उत्साह हा मोठ्या यशामुळे व्यक्तिगत अहंकारात बदलला, ज्यामुळे विधानसभा निवडणुकीत मविआचा पराभव झाला.

तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये घोषणा करण्याची स्पर्धा आमच्या पक्षाने ज्या जागा अनेकदा जिंकलेल्या होत्या त्यापैकी काही जागा या आम्हाला लोकसभा निवडणुकीत मित्रपक्षांना द्याव्या लागल्या. विधानसभा निवडणुकीत जागावाटपाचा घोळ शेवटपर्यंत चालला, ज्यामुळे जनतेत मविआबद्दल चुकीचा संदेश गेला. अशा चुकांची पुनरावृत्ती होता कामा नये, तरीही तसे घडले तर सोबत राहण्याचा काहीच अर्थ उरणार नाही. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मविआतील तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये जनतेसाठी घोषणा करण्याची स्पर्धा लागली होती, त्यामुळेही नुकसान झाले. 

ईव्हीएम घोटाळा, बनावट मतदार याद्या, मतदारांची अचानक वाढलेली संख्या हे विषय चर्चेत आहेतच. लाडकी बहीण सारखी भ्रामक योजना आणली गेली, त्याचाही आम्हाला फटका बसला पण चुका कबूल न करण्यातही अर्थ नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMahavikas Aghadiमहाविकास आघाडीElectionनिवडणूक 2024Mumbaiमुंबई