शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
3
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
4
"पाय खूप सुजतात, नीट जेवणही नशिबात नसतं"; केदारनाथच्या पिठ्ठूची डोळे पाणावणारी गोष्ट
5
Gold Price 6 May: लग्नसराईच्या हंगामापूर्वी सोन्याच्या दरात मोठी तेजी, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा लेटेस्ट दर
6
'या' ५८ देशांत भारतीयांना व्हिसा फ्री प्रवेश! विमान पकडा आणि थेट परदेशात उतरा, यादीत अनेक सुंदर देश
7
जम्मू-काश्मीरमध्ये भीषण अपघात; पूंछ जिल्ह्यात बस उलटली, दोघांचा मृत्यू तर 35 जखमी
8
हार्दिक पांड्या IPL मध्ये खेळतोय, दुसरीकडे त्याची Ex पत्नी नताशा काय करतेय? Photo Viral
9
तृतीयपंथीवर चौघांकडून लैंगिक अत्याचार; मोबाईलवर काढला व्हिडिओ, १ लाख मागितले
10
१०० वर्षांनी अद्भूत योग: ८ राशींना लॉटरी, सुख-सोयींचा काळ; पद-पैसा वृद्धी, शेअर बाजारात नफा!
11
पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मृतीस्थळ विकासासाठी ६८१ कोटींचा आराखडा; CM फडणवीसांची चौंडीत घोषणा
12
Soniya Bansal : "मला वास्तवासोबत..."; बिग बॉस फेम अभिनेत्रीने सोडली इंडस्ट्री, निवडला अध्यात्माचा मार्ग
13
CID Recruitment: परीक्षा न देता सरकारी नोकरी, सीआयडीमध्ये 'या' पदासाठी भरती, 'इतका' पगार मिळणार!
14
धाराशिव: 'बाहेर जाऊन येतो' म्हणून कार घेऊन गेले, नंतर पुलाखाली पाण्यात मिळाला मृतदेह
15
पुन्हा सुरु होणार जीवघेणा खेळ! 'Squid Game 3' चा टीझर आऊट; रिलीज डेटही समोर
16
भारताने दहशतवादाविरोधात लढा द्यावा, आम्ही सोबत आहोत; अमेरिकेचा भारताला पाठिंबा...
17
दरमहा ५००० रुपयांची SIP केली तर किती वर्षात १ कोटी रुपये जमा होतील? गणित समजून घ्या
18
Noida Dog Attack: वॉक करणाऱ्या महिलेवर पाळीव कुत्र्याचा हल्ला; जीव वाचवायला गेली आणि अन्...
19
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
20
७ मे रोजी देशभरात वॉर मॉक ड्रिल; सामान्य नागरिक म्हणून आपण करायच्या 'या' १० गोष्टी 

फडणवीस सरकारने जनतेला एप्रिल फूल बनवलं, वीज बिलावरून ठाकरे गटाची टीका

By मुरलीधर भवार | Updated: May 6, 2025 16:29 IST

फडणवीस सरकारने निवडणुकांमध्ये नागरिकांचे वीज बिल माफ करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, केवळ घोषणा ठरली, अशी टीका ठाकरे गटाकडून करण्यात आली.

राज्य सरकारने पहिल्या १०० दिवसांच्या प्रकल्पात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक घोषणा केली होती. १ एप्रिलपासून वीज बिले कमी होतील. ही केवळ घोषणाच ठरली आहे. तिची अंमलबजावणी केली गेली नाही. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊन नागरीकांना एप्रिल फूल बनवले असल्याचा आरोप उद्धव सेनेचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी केला आहे.

डोंबिवली वीज बिलाच्या वसूलीत अव्वल असताना डोंबिवली शहरातील वीज पुरवठा वारंवार खंडीत केला जातो. त्यामुळे नागरीक हैराण आहेत. त्याचबरोबर नागरिकांकडून भरमसाठ बिले आकारली जातात. या संदर्भात वीज वितरण कंपनीच्या कल्याण कार्यालयातील मुख्य कार्यकारी अभियंता चंद्रमणी मिश्रा यांची उद्धव सेनेच्या शिष्टमंडळाने आज भेट घेतली. यावेळी उद्धव सेनेचे पदाधिकारी तात्या माने, वैशाली दरेकर, अभिजीत सावंत, प्रमोद कांबळे, प्रकाश तेलगोटे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाबाबत म्हात्रे यांनी मिश्रा यांना विचारणा केली. त्यांच्याकडे यावर कोणतेही उत्तर नव्हते. डोंबिवली शहरात डीएफसी रेल्वे प्रकल्पाचे काम सुरु आहे. या प्रकल्पाच्या ठेकेदाराने वीज वितरण कंपनीची परवानगी न घेता वीजेच्या केबल वायर तोडल्या आहे. त्यामुळे डोंबिवली शहरातील वीज पुरवठा खंडीत होत आहे. १० तास वीज पुरवठा खंडीत होता. या प्रकरणी ठेकेदाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी उद्धव सेनेकडून करण्यात आली. त्याचबरोबर रस्ते विकासाची कामे आहे. रस्त्यावर असेलेली विद्युत रोहित्रे योग्य ठिकाणी हलविण्यात यावीत. शहरातील वीज पुरवठा सुरळित ठेवण्यात यावा. वीज पुरवठा खंडीत झाल्यास उद्धव सेनेकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागतचार महिन्यात निवडणूका घ्या असे आदेश सर्वेाच्च न्यायालयाने दिले आहे. या निर्णयाचे म्हात्रे यांनी स्वागत केले आहे. हा भारतीय लोकाशाहीचा विजय आहे. लोकशाही संपविण्याचे काम भाजपने गेल्या अडीच वर्षापासून राज्यात केले होते. सरकार फोडणे, आमदार फोडणे, निव्वळ आपल्या राजकीय स्वार्थासाठी निवडणूका घेतल्या नाहीत. त्यांना न्यायालयाने दणका दिला आहे असे म्हात्रे यांनी सांगितले.