शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

उद्धव-राज भेटीच्या बातम्यांवर सेनेचा संताप

By admin | Updated: July 31, 2016 04:46 IST

उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे या दोघा बंधुंमधील शुक्रवारच्या भेटीविषयी आलेल्या बातम्यांवर शनिवारी शिवसेनेने संताप व्यक्त केला

मुंबई : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे या दोघा बंधुंमधील शुक्रवारच्या भेटीविषयी आलेल्या बातम्यांवर शनिवारी शिवसेनेने संताप व्यक्त केला. दोघा भावांनी बंदद्वार चर्चा एकांतात नाही करायची, तर काय शिवाजी पार्कात करायची? असा सवाल शिवसेनेचे प्रवक्ते खा.संजय राऊत यांनी केला आहे. या दोघांच्या भेटीत राजकीयदृष्ट्या एकत्र येण्याबाबत चर्चा झाल्याचे वृत्त माध्यमांनी दिले होते. राऊत यांनी या बाबीचा इन्कार केला आहे. उद्धव यांचे बंधू जयदेव यांनी संपत्तीच्या वादावर केलेल्या आरोपांसंदर्भात दोघांमध्ये चर्चा झाल्याचेही राऊत यांनी नाकारले. ‘संपत्तीच्या वादाचे प्रकरण हाताळण्यासाठी उद्धव ठाकरे सक्षम आहेत,’ अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली. राऊत यांनी म्हटले आहे की, ‘दोघा भावांची भेट ही कौटुंबिक स्वरूपाची होती. राहुल गांधी आणि वरुण गांधी हे दिल्लीत रोज भेटतात, म्हणून काय रोज वातावरण ढवळून काढायचे का? राज ठाकरे मातोश्रीवर गेले. उद्धव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आदरातिथ्य करण्याची मातोश्रीची परंपरा आहे आणि राज तर घरातलेच आहेत.’ ‘महापालिका निवडणुकीच्या संदर्भात शिवसेना पक्षप्रमुखांची ‘मन की बात’ लवकरच समोर येईल. निवडणूक फार लांब नाही. शिवसेनेच्या मोठ्या विजयासाठी निर्णय घेण्याचे सर्वाधिकार उद्धव ठाकरे यांना आहेत. राज-उद्धव हे भाऊ आहेत. भाऊ किंवा दोन नेते भेटतात, तेव्हा चर्चा ही बंद खोलीतच होते. उद्धव हे राज यांचे मोठे भाऊ असून, कुटुंबाचे कर्ते आहेत,’ असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. (विशेष प्रतिनिधी)>सेना-मनसे युतीबाबत इन्कार मात्र नाहीशिवसेना आणि मनसे आगामी महापालिका निवडणुकीत एकत्र येणार असल्याचा कोणताही इन्कार राऊत यांनी केला नाही. उलट, उद्धव ठाकरे हे ‘मन की बात’ लवकरच सांगतील, असे म्हणत ‘सस्पेन्स’ कायम ठेवला आहे.