शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
3
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
4
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
5
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
7
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
8
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
9
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

Udayanraje Bhosale: "इस्लामिक देशांमध्ये आजही राजेशाही, शिवाजी महाराजांना वाटलं असतं तर.."; उदयनराजेंचं मोठं विधान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2022 12:30 IST

वैयक्तिक स्वार्थासाठी जाती-पातीचं तेढ निर्माण केलं जात आहे, असं खासदार उदयनराजे भोसले म्हणाले.

सातारा-

सध्या छत्रपती शिवाजी महाराजांची विविध मार्गांनी बदनामी करण्याचं काम केलं जात आहे. या विकृतीला वेळीच आवरलं पाहिजे. वैयक्तिक स्वार्थासाठी जाती-पातीचं तेढ निर्माण केलं जात आहे, असं खासदार उदयनराजे भोसले म्हणाले. ते सातऱ्यात एका कार्यक्रमात बोलत होते. छत्रपती शिवरायांचं लोकशाहीतील योगदान पटवून देताना उदयनराजे यांनी यावेळी इस्लामिक देशांचं उदाहरण दिलं. 

"जगात आज जर इस्लामिक देश पाहिले तर तिथं आजही राजेशाही आहे. तसं जर शिवाजी महाराजांना वाटलं असतं तर आज देशात लोकशाही असती का? आपलीही त्याच देशांसारखी परिस्थिती असती हे समजून घेतलं पाहिजे. जगाच्या पाठिवर छत्रपती शिवराय हे असे एकमेव राजे होते की त्यांना लोकांचा सहभाग राज्यकारभारात असला पाहिजे असलं वाटलं. पण आज इथं प्रत्येकजण वैयक्तिक स्वार्थाचा विचार करतोय", असं उदयनराजे म्हणाले. 

...तर महासत्ता नव्हे, महातुकडे होतील"जग इतक्या वेगानं पुढे जातंय लोकांनी आमचा विचार करायचं बंद केलं आहे. त्यामुळे महाराजांचा विचार अस्तित्वात राहिलेला नाही असंच सध्या दिसून येत आहे. शिवाजी महाराजांचा विचार नसता तर देश अखंड राहिला असता का? हे समजून घेतलं पाहिजे. देशाला महासत्ता बनवायचं प्रत्येकजण बोलतोय. पण छत्रपतींचा विचार पुढे नेला नाही. त्या विचारानं वागलं नाही तर महासत्ता काय देशाचे महातुकडे होतील. सर्वत्र वाताहत होईल", असं उदयनराजे म्हणाले.

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसले