शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

सारस्वतांच्या स्वागतासाठी उदयगिरीचा मुलुख सज्ज! अजय-अतुलच्या कार्यक्रमाने वातावरणनिर्मिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 08:29 IST

या संमेलनाची धुरा महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाने आपल्या हीरकमहोत्सवी वर्षानिमित्त पेलली आहे. महाविद्यालयाच्या ३६ एकरांत व्यासपीठांसह विविध दालने उभारण्यात आली आहेत.

व्ही. एस. कुलकर्णी -

उदगीर (जि. लातूर) : ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी येणाऱ्या सारस्वतांच्या स्वागतासाठी मराठवाडा, महाराष्ट्रच नव्हे तर कर्नाटक, तेलंगणाचा सीमाप्रांतही सज्ज झाला आहे. बुधवारच्या अजय-अतुलच्या संगीत रजनीमुळे संमेलनाची वातावरण निर्मिती झाली आहे. भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर साहित्यनगरीत होणाऱ्या संमेलनाच्या स्वागतांच्या कमानी ठिकठिकाणी उभारण्यात आल्या आहेत. 

या संमेलनाची धुरा महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाने आपल्या हीरकमहोत्सवी वर्षानिमित्त पेलली आहे. महाविद्यालयाच्या ३६ एकरांत व्यासपीठांसह विविध दालने उभारण्यात आली आहेत. मुख्य मंडपाला छत्रपती शाहू महाराज सभागृह असे नाव आहे. येथील व्यासपीठाला उदयगिरी महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य डॉ. ना. य. डोळे व्यासपीठ म्हणून संबोधण्यात येणार आहे.

परिसंवादाचे दालन लोकनेते विलासराव देशमुख सभागृह आहे. याशिवाय, शांता शेळके कविकट्टा हा देवीसिंह चौहान सभागृहात, तर सुरेश भट गझलकट्टा हा सिकंदर अली वज्द सभागृहात रंगणार आहे. ग्रंथ प्रकाशनाची तीन स्वतंत्र दालने, चित्र-शिल्प कलादालन, अभिजात मराठी दालन, बालमेळाव्याचे स्वतंत्र दालन असे आहेत. साहित्यनगरीचे प्रवेशद्वार उदगीर किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या प्रतिकृतीने स्वागताला सुसज्ज झाले आहे. 

शब्दोत्सवाचा आनंद घ्यावा संमेलनासाठी तीन महिन्यांपासून अनेकांचे हात परिश्रम घेत आहेत. रसिकांनी संमेलनाला उपस्थित राहून शब्दोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन संमेलनाचे स्वागताध्यक्ष राज्यमंत्री संजय बनसोडे, कार्याध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, मुख्य कार्यवाह रामचंद्र तिरुके, कोषाध्यक्ष प्रा. मनोहर पटवारी, प्रभारी प्राचार्य डॉ. आर. आर. तांबोळी, उपप्राचार्य डॉ. राजकुमार मस्के यांनी केले आहे.

तीन प्रांतांना जोडणारी ग्रंथदिंडी - यंदाची ग्रंथदिंडी तीन वैशिष्ट्यांच्या पालखीतून मिरवणार आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या सीमांना एकसंध करणाऱ्या या ग्रंथदिंडीचे नेतृत्व महिलांचे पथक करणार आहे. 

- दुसरे वैशिष्ट्य ‘गुगलविधी’. कर्नाटकातील गुगल नृत्य प्रकारानुसार विवाहापूर्वी वाजतगाजत, नृत्य करीत देवतेची पूजा करण्याचा हा विधी अनुभवायला मिळणार आहे. - मराठी भाषेच्या नवरसांची समृद्धी दर्शविणारी नवरंगदिंडी तिसरे वैशिष्ट्य. यात ५०० शालेय विद्यार्थी नऊ रंगांच्या टोप्यांसह सहभागी होणार आहेत.  

 

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनlaturलातूर