शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

दोन ध्येयवेड्यांनी शोधल्या लुप्त २०० बारव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2020 02:45 IST

पर्यटन विकसित करण्याचा मानस

-  पोपट पवारकोल्हापूर : कधी काळी गावगाड्याची तहान भागवणाऱ्या अन्‌ नैसर्गिक जलस्रोत असणाऱ्या बारव (बांधीव ऐतिहासिक विहीर) आता लुप्त होत आहेत. मात्र, त्याच्या संवर्धनासाठी दोन ध्येयवेड्या तरुणांनी पायाला भिंगरी बांधली आहे. मुंबईचा राेहन अशोक काळे आणि लोणावळ्याचा मनोज सिनकर हे ते ध्येयवेडे तरुण. दोघेही उच्चशिक्षित.  राजस्थान आणि गुजरातमधील स्वच्छ, सुंदर बारव पाहिल्यानंतर झपाटलेल्या रोहनने महाराष्ट्रातल्या बारव संवर्धनाचा ध्यास घेतला.  त्यासाठी त्याने नोकरीत एक वर्षाचा ब्रेक घेऊन बारव शोधण्यासाठी गावे पालथी घालायला सुरुवात केली. लोणावळ्यात स्वत:चा कापड व्यवसाय सांभाळणारा मनोजही रोहनच्या या मोहिमेत सामील झाला. आतापर्यंत या दोघांनी अनेक गावांत झाडा-झुडपांत लुप्त पावलेल्या जवळपास २०० बारव शोधल्या असून, त्याच्या संवर्धनासाठी  ग्रामस्थांना ते आवाहन करत आहेत.एक पर्यटनस्थळ अन्‌ वारसाहीमहाराष्ट्रातील अनेक बारवांचे बांधकाम हे स्थापत्यकलेचा एक उत्तम नमुना मानला जातो. पांडवकालीन, शिवकालीन, पेशवेकालीन आणि अहिल्याबाई होळकर यांच्या काळात बारव बांधल्या गेल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक बारवचे बांधकाम हे वेगवेगळ्या शैलीत आहे. बारवभोवती झाडेझुडपे वाढल्याने त्या दुर्लक्षित आहेत. मात्र, ज्या बारव सुस्थितीत आहेत, अशा बारव पर्यटनस्थळ म्हणून विकसित करता येऊ शकतात.