मुंबई : मंत्रलयाला भीषण आग लागण्याच्या घटनेला शनिवारी दोन वर्षे पूर्ण होत आहेत. इतके दिवस उलटूनही मंत्रलय मेकओव्हरचे काम सुरूच आहे. सध्याची गती लक्षात घेता आणखी सहा महिने तरी काम पूर्ण होण्याची शक्यता दिसत नाही.
चार, पाच, सहा आणि सातव्या माळ्यांचे नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. तळमजला, पहिला, दुसरा आणि तिस:या माळ्याचे काम सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव श्यामलकुमार मुखर्जी म्हणाले, या माळ्यांवरील कार्यालये अन्यत्र हलविली जात नसल्याने बांधकाम पूर्ण करण्यात अडचणी येत आहेत.
जयंत पाटील, वर्षा गायकवाड, डी. पी. सावंत, राधाकृष्ण विखे -पाटील या मंत्र्यांची दालने अजूनही तेथेच आहेत. छगन भुजबळ यांचे दालन रिकामे करून देण्यात आले, पण त्या ठिकाणी नवे मंत्री जितेंद्र आव्हाड आले आहेत. सामान्य प्रशासन विभागाचे कार्यालयही हलायला तयार नाही. बांधकाम विभागाने वारंवार विनंती करूनही प्रतिसाद मिळत नसल्याने विभागाचे अधिकारी त्रस्त आहेत. मुखर्जी यांनी सांगितले की मंत्रलय मेकओव्हरबाबत माझी मुख्य सचिव जे. एस. सहारिया यांच्याशी चर्चा झाली. त्यांना मी अडचणी सांगितल्या आहेत. दालने आणि कार्यालये रिकामी करून मिळाली असती तर आमचे काम येत्या 15 ऑगस्टर्पयत पूर्ण झाले असते. डिसेंबर 12 मध्ये मंत्रलय मेकओव्हरचे काम अवरसेकर इन्फ्राप्रोजेक्टस लिमिटेडला देण्यात आले होते. (विशेष प्रतिनिधी)