शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

दोन हजार पुनर्वसित आदिवासी मेळघाटात धडकले, मुलाबाळांसह परतले मूळगावी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2017 19:52 IST

पाच वर्षांपूर्वी तालुक्यांतून पुनर्वसित झालेले आठ गावांमधील दोन हजारांवर आदिवासी शनिवारी दुपारी ३ वाजता मुलाबाळांसह मूळगावी परतले.

चिखलदरा, दि. 9 -  पाच वर्षांपूर्वी तालुक्यांतून पुनर्वसित झालेले आठ गावांमधील दोन हजारांवर आदिवासी शनिवारी दुपारी ३ वाजता मुलाबाळांसह मूळगावी परतले. संबंधित अधिका-यांसोबत झालेली चर्चा निष्फळ ठरल्याने व कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्याने संतप्त आदिवासींनी शेकडो पोलीस, कमांडो आणि वनकर्मचा-यांचा ताफा भेदत कूच केले. 

तालुक्यातील सोमठाणा खुर्द, अमोना नागरतास, गुल्लरघाट, केलपाणी, धारगढ व बारूखेडा येथील आदिवासींचे व्याघ्र प्रकल्पाच्या अतीसंरक्षित क्षेत्रातून सन २०११ ते २०१५ मध्ये टप्प्याटप्प्याने पुनर्वसन करण्यात आले होते. पुनर्वसित वस्ती सोयी-सुविधांचा प्रचंड अभाव असल्याने शिवाय वैद्यकीय सुविधादेखील न मिळाल्याने तब्बल २२८ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे भयावह आकडे आहेत. आदिवासींच्या मागण्यांकडे सतत दुर्लक्ष करण्यात आले. यामुळे संतप्त आदिवासींनी ९ सप्टेंबर रोजी मूळ गावी परतण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार शनिवारी त्यांनी मूळ गावांकडे धाव घेतली. 

पोपटखेडा-खटकाली गेटवर या आदिवासींना अडवून माजी आमदार राजकुमार पटेल, प्रकाश घाडगे, प्रवीण तेलगोटे, विकास खंडेझोड, रवि जावरकर, बाबूलाल बेठेकर आदींसह अकोटचे उपविभागीय अधिकारी उदय राजपूत, उपवनसंरक्षक विशाल माळी आदींनी आदिवासींचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना अपयश आले. खटकाली नाक्याचे कुलूप फोडल्यानंतर आदिवासी विरूद्ध प्रशासन असा संघर्ष उदभवण्याची चिन्हे होती. मात्र, प्रशासनाने मवाळ भूमिका घेतल्याने ती स्थिती टळली. 

दुपारी ३ वाजता तोडले गेटचे कुलूप आदिवासींनी मेळघाटात परतण्याचा इशारा दिल्याने शनिवारी व्याघ्र प्रकल्पात अलर्ट जारी करण्यात आला होता. खटकाली, झरी, तलई, अमोना, ढाकणा हे सर्व गेट सील करण्यात आले होते. व्याघ्र प्रकल्पाचे अतीजलद दल, कमांडो, पोलीस, वनकर्मचाºयांचा मोठा ताफा तैनात होता. तरीही हा चक्रव्यूह भेदून आदिवासी महिलांनी गेटचे कुलूप फोडून दुपारी ३ वाजता आत प्रवेश केला. सोमवारी बैठकीचा प्रयत्न मूळगावी परतलेल्या हजारो आदिवासींना परत पुनर्वसित गावांमध्ये आणून व त्यांची समजूत काढून सर्व सुविधा देण्याचा प्रयत्न प्रशासनातर्फे सुरू आहे. सोमवारी यासंदर्भात बैठक बोलविण्याबाबत अकोटचे उपविभागीय अधिकारी उदय राजपूत यांनी मेळघाटचे माजी आमदार राजकुमार पटेल यांच्याशी चर्चा केली. 

पुनर्वसितांच्या या आक्रोशासाठी प्रशासनच जबाबदार आहे. आता आदिवासींचे मन वळविण्यासाठी सोमवारी बैठक बोलविली आहे. त्यात तोडगा काढू.- राजकुमार पटेल, माजी आमदार, मेळघाट

वरिष्ठांसोबत चर्चा करून पुनर्वसित आदिवासींच्या सर्व समस्या निकाली काढण्याबाबत बैठक बोलविण्यात येईल. - उदय राजपूत, उपविभागीय अधिकारी, अकोट

व्याघ्र प्रकल्पांत विनापरवाना शिरणाºयांविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल. त्यांना यापूर्वीसुद्धा सूचना दिल्या आहेत.- सुनील शर्मा, उपवनसंरक्षक, अकोट वन्यजीव विभाग