शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
2
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
3
१२ वर्षं वय... ३ महिन्यांत 200 जणांनी केलं 'वाईट कृत्य'! तुम्हालाही हादरवून टाकेल मुंबईतून रेस्क्यू करण्यात आलेल्या चिमुकलीची कहाणी
4
पठ्ठ्याने एकहाती सामना फिरवला! तब्बल ८ षटकार ठोकून टीम डेव्हिडने केली गोलंदाजांची धुलाई
5
ना अमेरिकन F-35, ना रशियन Su-57...; या मित्र देशाकडून लढाऊ विमाने खरेदी करून आणखी ताकद वाढवणार भारत! IAF ची मोठी मागणी
6
Viral Video : भर रस्त्यात हाय वोल्टेज ड्रामा! पत्नीने पतीच्या कानशिलात लगावल्या, कशावरून सुरू झालेला वाद?
7
आमिर खानच्या कुटुंबियांनी जारी केलं स्टेटमेंट, भाऊ फैजल खानचे सर्व आरोप फेटाळले
8
FD-RD सर्व विसराल; हा आहे LIC चा ‘तरुण’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल The End
9
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!
10
Video: अल्लू अर्जुनने विमानतळावर अधिकाऱ्यासमोर दाखवला माज; अखेर काढावाच लागला मास्क
11
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
12
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
13
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
14
१८७७ गावांमध्ये पूर, घराघरांत शिरलं पाणी, ६ लाख बाधित; 'या' राज्यात पावसाचा कहर सुरूच!
15
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
16
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस
17
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
18
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
19
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
20
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार

दोन हजार पुनर्वसित आदिवासी मेळघाटात धडकले, मुलाबाळांसह परतले मूळगावी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2017 19:52 IST

पाच वर्षांपूर्वी तालुक्यांतून पुनर्वसित झालेले आठ गावांमधील दोन हजारांवर आदिवासी शनिवारी दुपारी ३ वाजता मुलाबाळांसह मूळगावी परतले.

चिखलदरा, दि. 9 -  पाच वर्षांपूर्वी तालुक्यांतून पुनर्वसित झालेले आठ गावांमधील दोन हजारांवर आदिवासी शनिवारी दुपारी ३ वाजता मुलाबाळांसह मूळगावी परतले. संबंधित अधिका-यांसोबत झालेली चर्चा निष्फळ ठरल्याने व कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्याने संतप्त आदिवासींनी शेकडो पोलीस, कमांडो आणि वनकर्मचा-यांचा ताफा भेदत कूच केले. 

तालुक्यातील सोमठाणा खुर्द, अमोना नागरतास, गुल्लरघाट, केलपाणी, धारगढ व बारूखेडा येथील आदिवासींचे व्याघ्र प्रकल्पाच्या अतीसंरक्षित क्षेत्रातून सन २०११ ते २०१५ मध्ये टप्प्याटप्प्याने पुनर्वसन करण्यात आले होते. पुनर्वसित वस्ती सोयी-सुविधांचा प्रचंड अभाव असल्याने शिवाय वैद्यकीय सुविधादेखील न मिळाल्याने तब्बल २२८ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे भयावह आकडे आहेत. आदिवासींच्या मागण्यांकडे सतत दुर्लक्ष करण्यात आले. यामुळे संतप्त आदिवासींनी ९ सप्टेंबर रोजी मूळ गावी परतण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार शनिवारी त्यांनी मूळ गावांकडे धाव घेतली. 

पोपटखेडा-खटकाली गेटवर या आदिवासींना अडवून माजी आमदार राजकुमार पटेल, प्रकाश घाडगे, प्रवीण तेलगोटे, विकास खंडेझोड, रवि जावरकर, बाबूलाल बेठेकर आदींसह अकोटचे उपविभागीय अधिकारी उदय राजपूत, उपवनसंरक्षक विशाल माळी आदींनी आदिवासींचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना अपयश आले. खटकाली नाक्याचे कुलूप फोडल्यानंतर आदिवासी विरूद्ध प्रशासन असा संघर्ष उदभवण्याची चिन्हे होती. मात्र, प्रशासनाने मवाळ भूमिका घेतल्याने ती स्थिती टळली. 

दुपारी ३ वाजता तोडले गेटचे कुलूप आदिवासींनी मेळघाटात परतण्याचा इशारा दिल्याने शनिवारी व्याघ्र प्रकल्पात अलर्ट जारी करण्यात आला होता. खटकाली, झरी, तलई, अमोना, ढाकणा हे सर्व गेट सील करण्यात आले होते. व्याघ्र प्रकल्पाचे अतीजलद दल, कमांडो, पोलीस, वनकर्मचाºयांचा मोठा ताफा तैनात होता. तरीही हा चक्रव्यूह भेदून आदिवासी महिलांनी गेटचे कुलूप फोडून दुपारी ३ वाजता आत प्रवेश केला. सोमवारी बैठकीचा प्रयत्न मूळगावी परतलेल्या हजारो आदिवासींना परत पुनर्वसित गावांमध्ये आणून व त्यांची समजूत काढून सर्व सुविधा देण्याचा प्रयत्न प्रशासनातर्फे सुरू आहे. सोमवारी यासंदर्भात बैठक बोलविण्याबाबत अकोटचे उपविभागीय अधिकारी उदय राजपूत यांनी मेळघाटचे माजी आमदार राजकुमार पटेल यांच्याशी चर्चा केली. 

पुनर्वसितांच्या या आक्रोशासाठी प्रशासनच जबाबदार आहे. आता आदिवासींचे मन वळविण्यासाठी सोमवारी बैठक बोलविली आहे. त्यात तोडगा काढू.- राजकुमार पटेल, माजी आमदार, मेळघाट

वरिष्ठांसोबत चर्चा करून पुनर्वसित आदिवासींच्या सर्व समस्या निकाली काढण्याबाबत बैठक बोलविण्यात येईल. - उदय राजपूत, उपविभागीय अधिकारी, अकोट

व्याघ्र प्रकल्पांत विनापरवाना शिरणाºयांविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल. त्यांना यापूर्वीसुद्धा सूचना दिल्या आहेत.- सुनील शर्मा, उपवनसंरक्षक, अकोट वन्यजीव विभाग