शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
6
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
7
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
8
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
9
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
10
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
11
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
12
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
13
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
14
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
15
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
16
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
17
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
18
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
19
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
20
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय

दोन महिन्यांनंतरही चर्मकार आयोग कागदावरच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 05:59 IST

अध्यक्षही कर्मचाऱ्यांच्या प्रतीक्षेत : कार्यालयाअभावी अडकले आयोगाचे कामकाज

चेतन ननावरे ।

मुंबई : राज्यातील चर्मकार समाजाचा सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक स्थितीचा अभ्यास करून त्यांच्या विकासासाठी उपाययोजना सुचविण्यासाठी राज्य सरकारने मोठ्या थाटामाटात संत रोहिदास चर्मकार कल्याण आयोगाची स्थापना केली. मात्र शासन निर्णयाच्या दोन महिन्यांनंतरही आयोगाला कार्यालय मिळत नसल्याने अद्याप आयोगाच्या कामकाजास सुरुवात झाली नसल्याचे समोर आले आहे. आयोगाचे अध्यक्ष व माजी पोलीस महानिरीक्षक वाय.सी. पवार यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला.

वाय.सी. पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, चर्मकार आयोगाची स्थापना जरी झाली असली, तरी अद्याप मला कार्यालय मिळालेले नाही. यासंदर्भात लिडकॉमसोबत समन्वयस सुरू असून एक जागा मित्तल टॉवर येथे पाहिली आहे. मात्र तिथेही इंटेरियरचे काम करण्याची गरज आहे. त्यामुळे कार्यालयाचा ताबा कधी मिळणार याची कल्पना नाही. शिवाय कर्मचारीही नेमले नाहीत. परिणामी, कार्यालयाचा ताबा मिळताच गतीमान कारभार पाहायला मिळेल.

याआधी सरकारने संत रोहिदास चर्मोद्योग विकास महामंडळ असूनही स्वतंत्र आयोग स्थापन करत चर्मकार समाजाला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. आयोग चर्मकार समाजावर होणारा सामाजिक अन्याय व शोषणापासूनही त्यांचे संरक्षण करेल, अशी ग्वाही खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिली होती. त्यासाठीच आयोगाच्या अध्यक्षपदी वाय. सी. पवार यांची नेमणूक करत पवार यांना राज्य मंत्र्यांचा दर्जाही दिला. सरकारच्या अनुसूचित जातींसाठी (एससी) राबविण्यात येणाºया धोरणांचा लाभ चर्मकार समाजाला पोहोचविण्याचे काम आयोगाला दिले. मात्र आयोग स्थापन करून दोन महिन्यांनंतर कामकाजच सुरू झाले नसल्याने चर्मकार समाजात नाराजी आहे. विशेषत: गटई कामगारांच्या प्रश्नांपासून विविध प्रश्न शासन स्तरावर प्रलंबित असल्याचे एका संघटनेने सांगितले. तसेच यानिमित्ताने समाजाबाबतची शासन स्तरावरील उदासीनता पुन्हा एकदा समोर आल्याची टीकाही संबंधित संघटनेच्या पदाधिकाºयाने केली आहे....या कामांचा खोळंबा!चर्मकार समाजाचे सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकास करण्यासाठी त्यांचे सर्वेक्षण करण्याचे काम खोळंबले आहे.च्समाजाच्या प्रश्नांसाठी जनसुनावण्या घेणे व चर्मकार समाजाच्या विकासासाठी प्रयत्न करण्याचे कामही कार्यालयाअभावी ठप्प आहे.च्राज्य सरकारला विविध प्रश्नांबाबत शिफारस करण्यासाठी कर्मचारीच नाहीत.च्आयोगाच्या शिफारशीअभावी चर्मकार समाजासाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यासही विलंब होत आहे.सरकारने आयोगासाठी कार्यालय सुुरू करण्याची जबाबदारी लिडकॉमवर सोपविली आहे. त्यानंतर तातडीने मित्तल टॉवर येथील जागा निश्चित झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जागा हस्तांतराची कार्यवाही सुरू आहे. लवकरच काम पूर्ण करून कर्मचाºयांची तत्काळ भरती करण्यात येईल. तसेच आयोगाच्या कामासदेखील सुरूवात करण्यात येईल.- राजेश ढाबरे,व्यवस्थापकीय संचालक- लिडकॉम