मिरजगाव (जि. अहमदनगर)/ पारोळा (जळगाव) : कर्जबाजारीपणाला कंटाळून अहमदनगर व जळगाव जिल्ह्यातील दोघा शेतक:यांनी आत्महत्या केली.
अहमदनगर जिल्ह्यातील मिरजगाव येथील शेतकरी रावसाहेब जगन्नाथ बनकर (45) यांनी सोसायटी, पतसंस्था व उसनवारीने घेतलेल्या पैशांची परतफेड वेळेत होत नसल्याने जीवन संपविले. त्यांनी पाणी नसलेल्या विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. दोन वर्षापूर्वी त्यांनी मुलीचा विवाह व स्वत:च्या आजारपणाच्या उपचारासाठी कर्ज घेतले होते. बँक, पतसंस्था व इतरांकडून पैशांचा तगादा सुरू झाल्याने ते चिंतेत होते, तर जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील तरवाडे येथील अभिमन माणिक पाटील (5क्) यांनीही कर्जबाजारीपणाला कंटाळून सोमवारी विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. (वार्ताहर)