शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅव्हल्स-दुचाकी अपघातात दोन ठार

By admin | Updated: May 12, 2014 00:07 IST

संतप्त जमावाकडून ट्रॅव्हल्सची तोडफोड

चिखली : भावाच्या लग्नपत्रिका वाटून चिखली येथून देऊळगावराजाकडे दुचाकीने निघालेल्या दोन युवकांना खासगी कंपनीच्या ट्रॅव्हल्सने समोरून दिलेल्या जबर धडकेत एक जण जागीच ठार, तर एकास गंभीर अवस्थेत औरंगाबादकडे उपचारार्थ नेत असताना रस्त्यातच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना ११ मे रोजी शहरापासून जवळच असलेल्या भानखेड फाट्याजवळ सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. याबाबत सविस्तर असे, की जाफ्राबाद तालुक्यातील वरूड येथील रहिवासी अनंथा साळुबा काळे (२९) याच्या भावाचे १५ मे रोजी लग्न असल्याने तो त्याचा चुलत भाऊ योगेश अंबादास काळे याच्यासह चिखली शहरातील आपल्या नातेवाइकांकडे लग्नपत्रिका वाटण्यासाठी एम.एच.२८ यू ६७७४ क्रमांकाच्या दुचाकीने आला होता. लग्नपत्रिका वाटून झाल्यानंतर चिखलीवरून देऊळगावराजाकडे जात असताना शहरापासून जवळच असलेल्या भानखेड फाट्यानजीक विरुद्ध दिशेने येणार्‍या चिंतामणी ट्रॅव्हल्स क्रमांक एम.एच.२९ टी.७२७३ मुंबई-बुलडाणा या गाडीचे अँक्सल तुटल्याने गाडी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले व समोरून येणार्‍या दुचाकीस ट्रॅव्हल्सने जबर धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील अनंथा काळे याचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर योगेश काळे यास गंभीर जखमी अवस्थेत उपचारासाठी औरंगाबादकडे नेत असताना रस्त्यातच त्याची प्राणज्योत मालवली. अपघातानंतर रस्त्यावरची वाहतूक विस्कळीत झाली होती. वाहतूक शाखेचे पीएसआय भोई, नेमणार, पाटील, बनसोडे, नागरे, लोंढे यांनी तातडीने उपाययोजना करून वाहतूक सुरळीत केली. अपघाताची माहिती कळताच घटनास्थळी दाखल झालेल्या मनसेचे प्रदीप भवर, पंकज सुरडकर, दत्ता सुरडकर यांनी अपघातातील जखमी व मृतकाला ग्रामीण रुग्णालयात हलविण्यासाठी मदत केली. याप्रकरणी सखराम संपत शेळके रा. वरुड, ता. जाफ्राबाद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चिखली पोलिसांनी कलम २७९, ३३७, ३३८, ३0४ (अ) भादंविनुसार गुन्हा दाखल केला असून, अपघातास कारणीभूत ट्रॅव्हल्स चालकाला अटक केली आहे. चौपदरीकरणाच्या दुष्टचक्रात अडकलेला व मृत्यूचा सापळा बनलेल्या जालना-खामगाव महामार्गाने अपघाताच्या घटनेत दिवसेंदिवस वाढच होत आहे. या महामार्गाने चौपदरीकरणाचे काम गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित आहे. यामुळे मार्गावर जगोजागी खड्डे आणि बांधकामे साहित्य पडून असल्यामुळे वाहनचालकांना प्रवास करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे आज या महामार्गाने आणखी दोन बळी घेतले. ** संतप्त जमावाची गाडीवर दगडफेक गत अनेक वर्षांपासून रखडलेल्या जालना-खामगाव रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामामुळे या रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली असून, अपघातांची मालिका सुरूच आहे. यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष असून, अशातच रस्त्याच्या या दुरवस्थेमुळे आणखी दोन निष्पाप जीवांना आपला जीव गमवावा लागल्याचे वृत्त कळताच परिसरातील नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेतली. घटनास्थळी जमा झालेल्या संतप्त जमावाने आपला रोष व्यक्त करीत गाडीवर दगडफेक केली व काचा फोडल्या, तर काहींनी गाडी पेटवून देण्याचा प्रयत्न केला; मात्र वेळीच पोहचलेल्या पोलिसांनी जमावाला शांततेचे आवाहन करून पुढील परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.