शहरं
Join us  
Trending Stories
1
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
2
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; समोर आला थरकाप उडवणारा VIDEO
3
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
4
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
5
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
6
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
7
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
8
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
9
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
10
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
11
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
12
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
13
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
14
धैर्याला सॅल्यूट! देशातील पहिली ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट; आता मागते भीक पण स्वप्न आहेत मोठी
15
Reels बनवण्यासाठी अस्वलाला पाजलं कोल्ड ड्रिंक, VIDEO व्हायरल झाल्यावर जे घडलं ते पाहून...
16
१० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे
17
Sade Sati Upay: एकच रास, तरी साडेसातीचा काळ प्रत्येकाचा वेगळा; ३ महिन्यापूर्वी लागते चाहूल!
18
GST कपातीनंतर 4 लाखांपेक्षाही स्वस्तात मिळतेय ही मारुती SUV; देते 34 km पर्यंत मायलेज; बघा, व्हेरिअँट निहाय सूट...
19
अर्शद वारसी नव्हे, तर 'जॉली एलएलबी'साठी या मराठमोळ्या अभिनेत्याला होती पहिली पसंती, आता होतोय त्याला पश्चाताप
20
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका

ट्रॅव्हल्स-दुचाकी अपघातात दोन ठार

By admin | Updated: May 12, 2014 00:07 IST

संतप्त जमावाकडून ट्रॅव्हल्सची तोडफोड

चिखली : भावाच्या लग्नपत्रिका वाटून चिखली येथून देऊळगावराजाकडे दुचाकीने निघालेल्या दोन युवकांना खासगी कंपनीच्या ट्रॅव्हल्सने समोरून दिलेल्या जबर धडकेत एक जण जागीच ठार, तर एकास गंभीर अवस्थेत औरंगाबादकडे उपचारार्थ नेत असताना रस्त्यातच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना ११ मे रोजी शहरापासून जवळच असलेल्या भानखेड फाट्याजवळ सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. याबाबत सविस्तर असे, की जाफ्राबाद तालुक्यातील वरूड येथील रहिवासी अनंथा साळुबा काळे (२९) याच्या भावाचे १५ मे रोजी लग्न असल्याने तो त्याचा चुलत भाऊ योगेश अंबादास काळे याच्यासह चिखली शहरातील आपल्या नातेवाइकांकडे लग्नपत्रिका वाटण्यासाठी एम.एच.२८ यू ६७७४ क्रमांकाच्या दुचाकीने आला होता. लग्नपत्रिका वाटून झाल्यानंतर चिखलीवरून देऊळगावराजाकडे जात असताना शहरापासून जवळच असलेल्या भानखेड फाट्यानजीक विरुद्ध दिशेने येणार्‍या चिंतामणी ट्रॅव्हल्स क्रमांक एम.एच.२९ टी.७२७३ मुंबई-बुलडाणा या गाडीचे अँक्सल तुटल्याने गाडी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले व समोरून येणार्‍या दुचाकीस ट्रॅव्हल्सने जबर धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील अनंथा काळे याचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर योगेश काळे यास गंभीर जखमी अवस्थेत उपचारासाठी औरंगाबादकडे नेत असताना रस्त्यातच त्याची प्राणज्योत मालवली. अपघातानंतर रस्त्यावरची वाहतूक विस्कळीत झाली होती. वाहतूक शाखेचे पीएसआय भोई, नेमणार, पाटील, बनसोडे, नागरे, लोंढे यांनी तातडीने उपाययोजना करून वाहतूक सुरळीत केली. अपघाताची माहिती कळताच घटनास्थळी दाखल झालेल्या मनसेचे प्रदीप भवर, पंकज सुरडकर, दत्ता सुरडकर यांनी अपघातातील जखमी व मृतकाला ग्रामीण रुग्णालयात हलविण्यासाठी मदत केली. याप्रकरणी सखराम संपत शेळके रा. वरुड, ता. जाफ्राबाद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चिखली पोलिसांनी कलम २७९, ३३७, ३३८, ३0४ (अ) भादंविनुसार गुन्हा दाखल केला असून, अपघातास कारणीभूत ट्रॅव्हल्स चालकाला अटक केली आहे. चौपदरीकरणाच्या दुष्टचक्रात अडकलेला व मृत्यूचा सापळा बनलेल्या जालना-खामगाव महामार्गाने अपघाताच्या घटनेत दिवसेंदिवस वाढच होत आहे. या महामार्गाने चौपदरीकरणाचे काम गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित आहे. यामुळे मार्गावर जगोजागी खड्डे आणि बांधकामे साहित्य पडून असल्यामुळे वाहनचालकांना प्रवास करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे आज या महामार्गाने आणखी दोन बळी घेतले. ** संतप्त जमावाची गाडीवर दगडफेक गत अनेक वर्षांपासून रखडलेल्या जालना-खामगाव रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामामुळे या रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली असून, अपघातांची मालिका सुरूच आहे. यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष असून, अशातच रस्त्याच्या या दुरवस्थेमुळे आणखी दोन निष्पाप जीवांना आपला जीव गमवावा लागल्याचे वृत्त कळताच परिसरातील नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेतली. घटनास्थळी जमा झालेल्या संतप्त जमावाने आपला रोष व्यक्त करीत गाडीवर दगडफेक केली व काचा फोडल्या, तर काहींनी गाडी पेटवून देण्याचा प्रयत्न केला; मात्र वेळीच पोहचलेल्या पोलिसांनी जमावाला शांततेचे आवाहन करून पुढील परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.