शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कारंजात दोन गटांत हाणामारी, एकाचा मृत्यू

By admin | Updated: July 15, 2015 00:26 IST

छेडछाडीचे निमित्त; संचारबंदी लागू, १२ जण जखमी

वाशिम : युवतीच्या छेडछाडीवरून दोन गटात दंगल उसळून, एका युवकाचा मृत्यू, तर १२ जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी वाशिम जिलतील कारंजा येथे घडली. शहरात तणावपूर्ण परिस्थिती असून, पोलिसांनी संचारबंदी लागू केली आहे. तसेच राज्य राखीव पोलिस दलाच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. कारंजा शहरातील शिवाजी नगर भागात राहणार्‍या एका युवतीची भारतीपूरा परिसरात राहणार्‍या सोहेल अब्दुल गफार या युवकाने मंगळवारी सकाळी छेड काढली. त्यामुळे परिसरातील तरुणांनी सोहेलला मारहाण करीत पोलिस स्टेशनमध्ये नेले. याप्रकरणी युवतीने दाखल केलेल्या तक्रारीवरून कारंजा पोलिसांनी कारवाई सुरू केली. या घटनेने संतप्त झालेल्या काही युवकांनी नेव्हीपुरा परिसरात जमाव क रून क ाही युवकांना मारहाण केली. भारतीपुरा परिसरातील युवकांना हा प्रकार कळल्यानंतर त्यांनी राम मंदीर परिसरात येऊन दगडफे क सुरू केली. त्यानंतर काही युवकांनी बाबू उर्फ सजाउद्दिन इस्लामोद्दिन आणि अस्लम नामक दोन युवकांना धारदार शस्त्रांनी गंभीर जखमी केले. पोलिसांनी दोघांनाही कारंजा ग्रामीण रुग्णालयात भरती केले; मात्र डॉक्टरांनी बाबूला मृत घोषित केले, तर अस्लमला पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविले. गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी ही घटना अत्यंत दुर्देवी असल्याचे म्हटले. यासंदर्भात जिल्हा पोलीस अधिक्षकांशी सतत संपर्कात असून, अतिरिक्त पोलीस कुमक तैनात करण्यात आली आहे. कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येऊ नये, यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगीतले. तर पोलिस अधीक्षक विनिता साहू यांनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलीस प्रशासन प्रयत्नशील आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्‍वास न ठेवता पोलीसांना सहकार्य करावे, असे अवाहन केले.