शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

एकाच मुलावर दोन मुली फिदा, भरचौकात एकमेकींना भिडल्या; संधी पाहून बॉयफ्रेंड पळाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2022 17:51 IST

या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले. त्यांनी दोन्ही मुलींना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणलं.

औरंगाबाद - 'एक अनार और सौ बीमार' ही हिंदीतील म्हण सगळ्यांनी ऐकलीच असेल. एकाच्या मागे अनेकजण हात धुवून लागतात. अशीच एक घटना औरंगाबादेत घडली आहे. ज्याठिकाणी एका बॉयफ्रेंडसाठी २ मुलींमध्ये भररस्त्यात मारहाण झाल्याचा प्रकार घडला आहे. औरंगाबादच्या पैठण तालुक्यात ही घटना घडली आहे. ज्याची जिल्ह्यात सर्वत्र चर्चा आहे. 

पैठणमध्ये दोन मुली बस स्टँडजवळ एकमेकींना भिडल्या. या दोन्ही मुली एकाच मुलावर जीवापाड प्रेम करत होत्या. यातील एका मुलीने बॉयफ्रेंडसोबत दुसऱ्या मुलीला पाहिल तेव्हा तिचा राग अनावर झाला. सुरुवातीला दोन्ही मुलींमध्ये बाचाबाची झाली. हा वाद इतका टोकाला गेला की, दोन्ही मुली भररस्त्यात एकमेकींना भिडल्या. या मुलींमध्ये मारामारी झाली हे पाहताच बॉयफ्रेंडनं त्याठिकाणाहून काढता पाय घेतला. 

या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले. त्यांनी दोन्ही मुलींना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणलं. याठिकाणी मुलींची चौकशी करून त्यांना पुन्हा घरी पाठवलं. पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना गेल्या बुधवारी घडली. ज्यात सकाळी सकाळी बस स्टँडवर दोन मुलींमध्ये मारामारी होत असल्याचं पोलिसांना कळालं. या दोन्ही मुलीचा बॉयफ्रेंड एकच होता त्याचवरून दोन्ही मुली एकमेकींच्या अंगावर धावून गेल्या. 

सकाळी बॉयफ्रेंड दुसऱ्या मुलीसोबत बसस्टँडवर असल्याचं कळालं तेव्हा दुसरी मुलगी त्याठिकाणी पोहचली. बॉयफ्रेंडसमोरच त्या मुलींमध्ये वाद झाला. हा वाद सोडवण्याचा बॉयफ्रेंड प्रयत्न करत होता. परंतु दोघीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. वाद वाढतच गेला आणि दोन्ही एकमेकींना पकडून मारहाण करू लागल्या. वाढलेला प्रकार पाहून बॉयफ्रेंडनं घटनास्थळावरून पळ काढला. भरचौकात घडलेला प्रकार पाहून काहींना पोलिसांना कळवलं. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल होत मुलींना ताब्यात घेतले.