शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

नापिकीला कंटाळून दोन शेतक-यांच्या आत्महत्या

By admin | Updated: July 18, 2015 01:24 IST

महिला शेतक-याने जाळून घेतले.

वाशिम : कर्जाचा वाढता डोंगर आणि नापिकीला कंटाळून वाशिम जिल्ह्यातील आणखी दोन शेतकर्‍यांनी मृत्यूला कवटाळले. एका युवा शेतकर्‍याने गळफास घेतला, तर एका महिला शेतकरीने जाळून घेऊन आत्महत्या केली. मालेगाव तालुक्यातील मुंगळा येथील २२ वर्षीय युवा शेतकर्‍याने आत्महत्या केली. संदीप दुर्योधन शेळके असे मृताचे नाव आहे. तो १६ जुलै रोजी शेतात जात असल्याचे सांगून घरून गेला; मात्र तो दुसर्‍या दिवशीही घरी परत न आल्याने, कुटुंबियांनी शोध सुरू केला. शुक्रवारी सकाळी गावातील एका शेतामध्ये निंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत तो आढळला. दुसर्‍या एका घटनेत, वाशिम तालुक्यातील काटा येथील ५५ वर्षीय महिलेने शेतातील पिकं सुकल्याने आणि कर्ज परतफेडीच्या चिंतेतून शुक्रवारी दुपारी स्वत:ला जाळून घेऊन आत्महत्या केली. दुर्गाबाई पंडीतराव देशमुख हे मृताचे नाव आहे. त्या शुक्रवारी नेहमीप्रमाणे शेतामध्ये गेल्या असता, करपलेली पिकं पाहून त्यांना चिंतेने ग्रासले. शेतातून घरी परतल्यानंतर दुपारी ३.३0 वाजताच्या सुमारास त्यांनी जाळून घेऊन जीवनयात्रा संपविली. त्यांच्यावर बँकेचे आणि खासगी सावकाराचे मिळून दोन लाखाचे कर्ज असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली. वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.