शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

साहित्य संमेलनात राष्ट्रपती, पंतप्रधानांची दोनदा हजेरी; १९५४ साली पंतप्रधान पं. नेहरूंकडून उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 08:20 IST

१८७८ मध्ये पहिले साहित्य संमेलन पुण्यात आयोजित केले होते. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे होते.

राम शिनगारे -

औरंगाबाद : उदगीर येथे होत असलेल्या ९५व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची विशेष उपस्थिती असणार आहे. यापूर्वी सांगलीच्या साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी हजेरी लावली होती. या दोन अपवादांशिवाय आजी-माजी पंतप्रधान एकवेळा साहित्य संमेलनात सहभागी झाले आहेत. 

१८७८ मध्ये पहिले साहित्य संमेलन पुण्यात आयोजित केले होते. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे होते. तेव्हापासून सुरू झालेली साहित्य संमेलनाची परंपरा कायम आहे. संमेलनात साहित्यिकांसह राज्यातील मोठमोठ्या राजकारण्यांनीही वेळोवेळी हजेरी लावलेली आहे. मात्र, देशपातळीवरील सर्वोच्च व्यक्तींनी क्वचित प्रसंगीच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला हजेरी लावली आहे. 

दिल्ली येथे १९५४ मद्ये झालेल्या साहित्य संमेलनाचे उद्घाटन तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते करण्यात आले. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी लक्ष्मणशास्त्री जोशी होते, तर स्वागताध्यक्ष केंद्रीय मंत्री काकासाहेब गाडगीळ होते. यानंतर २००३ मध्ये कऱ्हाड येथे झालेल्या ७६व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सुभाष भेंडे होते; तर उद्घाटक म्हणून माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांची उपस्थिती होती. हे दोन आजी-माजी पंतप्रधान साहित्य संमेलनाला उद्घाटक म्हणून लाभले आहेत. 

२००८ मध्ये सांगली येथे ८१वे साहित्य संमेलन मधुकर हातकणंगलेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. या साहित्य संमेलनाचे उद्घाटन पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले होते. 

२००८ नंतर आता ९५व्या साहित्य संमेलनात उदगीर येथे राष्ट्रपती रामनाथ कोविंद सहभागी होणार आहेत. याच साहित्य संमेलनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेसुद्धा सहभागी होणार आहेत.

कौतिकराव आणि दिग्गजअखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या कार्यकाळातच २००८ मध्ये राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील संमेलनाला उपस्थित होत्या. आताही ठाले पाटील यांच्याच दुसऱ्या कार्यकाळातील शेवटच्या साहित्य संमेलनात विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित राहणार आहेत. संमेलनातील दिग्गजांची मांदियाळी पाहता कौतिकराव आणि दिग्गज यांचे समीकरण आता उदगीरमध्येही पाहायला मिळणार आहे.

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनliteratureसाहित्यNarendra Modiनरेंद्र मोदीRamnath Kovindरामनाथ कोविंद