शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
4
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
5
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
6
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
7
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
8
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
9
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
11
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
12
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
13
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
14
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
15
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
16
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
17
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
18
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
19
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
20
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
Daily Top 2Weekly Top 5

खोपोलीतील झेनिथ स्कूल अडचणीत

By admin | Updated: June 10, 2016 03:02 IST

रायगड जिल्ह्यातील पहिली औद्योगिक नगरी असा इतिहास असलेल्या खोपोलीतील ४५ वर्षांची जुनी ‘झेनिथ स्कूल’ सध्या अडचणीत सापडली

जयंत धुळप,

अलिबाग- रायगड जिल्ह्यातील पहिली औद्योगिक नगरी असा इतिहास असलेल्या खोपोलीतील ४५ वर्षांची जुनी ‘झेनिथ स्कूल’ सध्या अडचणीत सापडली आहे. यामुळे ५८ मुलांचे भवितव्य अंधारमय होवून पालकवर्ग चिंताग्रस्त झाला आहे. झेनिथ पाइप कंपनीने कारखान्यातील कामगारांच्या पाल्यांकरिता ही शाळा १९७१ मध्ये सुरू केली. केजी ते दहावीपर्यंतच्या या शाळेत प्रारंभीच्या ३५ वर्षांच्या काळात सुमारे ३०० ते ३५० विद्यार्थी शिक्षण घेत होते. २००९ पासून शाळेच्या संचालकांनी केजीचा पहिला वर्ग बंद केला. हळूहळू एक एक वर्ग बंद करत २०१५-१६ पर्यंत इयत्ता ५ वीपर्यंतचे वर्ग बंद केले. शाळेचे सध्याचे मुख्याध्यापक अजित देशपांडे यांनी वेळोवेळी संचालक मंडळ व शिक्षण विभागाकडे शाळेच्या अडचणी, विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या गैरसोयीबाबत कळवले आहे. परंतु संचालक मंडळाने या अडचणी व गैरसोयीकडे लक्ष दिले नाही. ही सारी परिस्थिती रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागास कळवण्यात आल्यावर, पालक, शिक्षक प्रतिनिधी मुख्याध्यापक यांच्याबरोबर रायगड जिल्हा माध्यमिक शिक्षक विभागाने एक चौकशी समिती नेमून या समस्येतून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. शाळेच्या संचालक मंडळास देखील चौकशी समितीने बोलावले, परंतु एकाही बैठकीस संचालक मंडळ उपस्थित राहिले नाही.शाळेत तीन शिक्षक व एक सेवक कायम आहेत. तर प्रतिवर्षी हंगामी स्वरूपात इतर शिक्षकांची नेमणूक करून शाळा चालवली जात आहे. मात्र शिक्षकांचे वेतनही वेळेत दिले जात नाहीत. शाळेची इमारत गळते, शाळेत कित्येकदा लाइट नाही, तर भिंती ओल्या झाल्यास कित्येक वेळा भिंतीला हात लागताच शॉक बसतो. आर्थिक कोणतीही मदत नसल्यामुळे स्वच्छतागृहाची व्यवस्था नीट नाही, पाण्याची सोय करणे शक्य नाही. शाळेचे मैदान म्हणजे गुरे चरण्यासाठी ठेवलेले गुरचरण म्हणावे लागेल. या सर्व गोष्टींची कल्पना मुख्याध्यापक देशपांडे यांनी शाळा चालविणाऱ्या झेनिथ कंपनीच्या शिक्षण समिती संचालकांना पत्राव्दारे, ई-मेलव्दारे, पोस्टाने, फोनवर देवूनही कोणताही प्रतिसाद संचालकांकडून दिला जात नाही. >आमदार व शिक्षण मंत्र्यांना पालक भेटणारसंस्थेला शाळा चालवण्याची इच्छा असेल तर शिक्षकांची नियुक्ती करून त्याच कंपनीच्या परिसरातील इतर योग्य इमारतीत शाळा चालणे व्यवस्थापनाला शक्यही आहे, ते त्यांनी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगून स्थानिक आमदार सुरेश लाड व राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे आता आम्ही तक्रार निवेदन देवून आमच्या पाल्याचे यंदा नुकसान करू नये अशी विनंती करीत असल्याचे सोनावणे यांनी सांगितले.>संचालक मंडळ गैरहजरविद्यार्थ्यांच्या भवितव्याचा व जीविताचा विचार करण्यास संचालक मंडळ तयार नाही. गेली दोन वर्षे मुख्याध्यापक याच अडचणी संचालकांना सांगत असताना, त्यांनी काहीही हालचाल केलेली नाही. १५ जूनला शाळा सुरू होणार आहे, अशावेळी विद्यार्थ्यांच्या जीविताचा प्रश्न, आर्थिक प्रश्न कसे सोडवणार, असा प्रश्न मुख्याध्यापक अजित देशपांडे यांनी उपस्थित केला आहे. गेल्या ३ जून २०१६ रोजी शिक्षण विभागाचे संयुक्त पथक शाळेत पाहणी व चौकशीकरिता आले असता संचालक मंडळाचे कोणीही प्रतिनिधी उपस्थित राहिले नसल्याने पुढील निर्णय घेता येत नसल्याचे देशपांडे यांनी सांगितले. याबाबत झेनिथच्या शाळा समिती संचालक मंडळाचे अध्यक्ष पुष्कर नातू यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी प्रतिसाद दिला नाही.संचालक मंडळाचे पत्र : संचालक मंडळाने गेल्या ३० मे २०१६ रोजी शिक्षणाधिकारी (माध्य.) रायगड यांना पत्र पाठवून शाळा दुरुस्तीसाठी एक ते दोन वर्षे वेळ हवा आहे. विद्यार्थ्यांची इतर शाळेत शिक्षणाधिकाऱ्यांनी सोय करावी असे कळवले आहे. शाळा सुरु झाल्यावर आमच्या पाल्याची सोय कशी, कुठे करणार हा प्रश्न सर्व पालकांसमोर असल्याची माहिती पालक संघाचे प्रतिनिधी गोपीनाथ सोनावणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे. शाळेच्या इमारतीची पाहणी करून अहवाल देण्याकरिता दोन अधिकाऱ्यांची समिती शाळेत पाठविली होती. त्यावेळी शाळा समिती संचालक मंडळाचे अध्यक्ष पुष्कर नातू व संचालक मंडळास देखील उपस्थित राहाण्याबाबत कळवले होते. परंतु ते उपस्थित राहिले नाही. संचालक मंडळानेच शाळेची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. त्यांना शाळा बंदच करायची असेल तर त्यांनी एक वर्ष आधी पालकांना व शिक्षकांना सूचना देणे आवश्यक आहे. आयत्यावेळी शाळा बंद करण्याचा निर्णय घेता येणार नाही. अहवालाची पाहणी करून संचालक मंडळास योग्य ते आदेश देवून संबंधित अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात येईल .- एस.एन.बढे, शिक्षणाधिकारी, रायगड जिल्हा परिषद