शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
2
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
3
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
4
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
5
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
6
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
7
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
8
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
9
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
11
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
12
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
13
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
14
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
15
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
16
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
17
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
18
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
19
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी

राष्ट्रवादीची राष्ट्रीय मान्यता अडचणीत

By admin | Updated: June 20, 2014 02:22 IST

राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन समाज पार्टी (बसपा) व भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकपा) यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रीय मान्यता गोठविण्यासंदर्भात नोटिसा बजावल्या आहेत.

निवडणूक आयोगाने बजावली नोटीस; ‘लोकमत’च्या वृत्तावर शिक्कामोर्तब 
सुधीर लंके - अहमदनगर
लोकसभा तसेच विविध राज्यांच्या विधानसभांमध्ये आवश्यक असणारी मते व जागा मिळालेल्या नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन समाज पार्टी (बसपा) व भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकपा) यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रीय मान्यता गोठविण्यासंदर्भात नोटिसा बजावल्या आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी या तीन पक्षांचा राष्ट्रीय दर्जा जाणार हे जवळपास निश्चित आहे. 
 राष्ट्रीय दर्जा टिकविण्यासाठी असलेल्या विविध अटींची पूर्तता होत नसल्याने या पक्षांचा हा दर्जा धोक्यात आला असल्याचे वृत्त केवळ ‘लोकमत’ने 21 मे रोजी आकडेवारीसह प्रकाशित केले होते. ‘लोकमत’चा हा अंदाज बरोबर ठरला आहे. निवडणूक आयोगाचे प्रधान सचिव के.एफ. विलफर्ड यांनी पक्षांना नोटिसा बजावण्यात आल्याच्या वृत्तास दुजोरा दिला. राष्ट्रीय मान्यता गोठविण्यात का येऊ नये, यासंदर्भात या पक्षांचे म्हणणो मागविण्यात आले असून, ते सादर झाल्यानंतर पुढील कार्यवाही होईल, असे ते म्हणाले. या सुनावणीच्या प्रक्रियेला साधारण तीन महिन्यांचा कालावधी लागेल. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी याबाबतचा निर्णय होईल. 
राष्ट्रीय मान्यता गोठल्यास राष्ट्रवादी हा राज्यात शिवसेना, मनसे या पक्षांसारखाच केवळ राज्यस्तरीय पक्ष म्हणून ओळखला जाईल. राष्ट्रवादीचे ‘घडय़ाळ’ चिन्ह राज्यात कायम राहील, परंतु राष्ट्रीय पक्ष म्हणून मतपत्रिकेवर असणारे वरचे स्थान त्यांना मिळणार नाही. 
बसपा व भाकपा या पक्षांना महाराष्ट्रात राज्य पक्ष म्हणूनही दर्जा नाही. त्यामुळे या पक्षांना येत्या विधानसभा निवडणुकीत आपले ‘हत्ती’ व ‘विळा-कणीस’ हे चिन्ह गमवावे लागणार आहे. चिन्ह हवे असेल तर त्यांना निवडणूक आयोगाकडे तसा अर्ज करावा लागेल. तरच ते त्यांना मिळू शकेल. 
लोकसभा निवडणुकीत बसपाला एकही जागा मिळाली नसून राष्ट्रवादीला सहा तर भाकपाला अवघी एक जागा मिळाली आहे. बसपाचा केवळ मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश व उत्तराखंडमध्ये तर भाकपाला केवळ केरळ व तामिळनाडूत राज्य पक्षांचा दर्जा उरला आहे. 
 
राष्ट्रवादी नागालँडमध्येही अडचणीत 
च्राष्ट्रीय मान्यता धोक्यात आलेल्या राष्ट्रवादीला सध्या महाराष्ट्र व नागालँड या दोन ठिकाणीच राज्य पक्षाचा दर्जा उरला आहे. नागालँड विधानसभेच्या 2क्13च्या निवडणुकीत या पक्षाला चार जागा व सहा टक्के मते मिळाली होती. परंतु नुकतेच यातील तीन आमदार भाजपात गेल्याने येथील राज्य पक्ष म्हणून असलेला दर्जाही अडचणीत येऊ शकतो. त्यामुळे ‘नॅशनॅलिस्ट’ म्हणविणारा हा पक्ष केवळ महाराष्ट्रापुरता उरण्याचा धोका आहे.
मान्यतेला धोका नाही 
च्पक्षाची चार वर्षाची सरासरी कामगिरी पाहून मान्यता ठरत असते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय मान्यतेला 2क्18र्पयत काहीही धक्का लागणार नाही, याबद्दल आम्हाला विश्वास आहे. 
च्निवडणूक आयोगाची नोटीस मिळालेली नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी सांगितले.