शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
3
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
4
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
5
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
6
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
7
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
8
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
9
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
10
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
11
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
12
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
13
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
14
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
15
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
16
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
17
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
18
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
19
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
20
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान

ऑनलाइन पेपर तपासणी बंद करा; अभाविपचा भाजपला घरचा आहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2019 06:42 IST

राज्यात भाजपप्रणीत सरकार सत्तेवर असताना प्रवेशप्रक्रियेचा बोजवारा उडाला होता.

ठाणे : मुंबई विद्यापीठाला ऑनलाइन पेपरतपासणी प्रक्रिया राबवणे जमत नसेल, तर त्यांनी पूर्ववत ऑफलाइन प्रक्रियेकडे वळावे. मात्र, विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळू नये, असे मत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय मंत्री अनिकेत ओव्हाळ यांनी व्यक्त केले. राज्यात भाजपप्रणीत सरकार सत्तेवर असताना प्रवेशप्रक्रियेचा बोजवारा उडाला होता. त्या पार्श्वभूमीवर आता अभाविपने आयोजित केलेल्या ५४ व्या कोकण प्रदेश अधिवेशनाच्या खुल्या अधिवेशनात ही मागणी केली. ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेच्या गोंधळाबाबत छात्रनेत्यांनी सरकारचे लक्ष वेधले.अधिवेशनाचा दुसरा दिवस शनिवारी रंगला. दुपारी आयोजित केलेली शोभायात्रा घाणेकर नाट्यगृहापासून सुरू होऊन प्रबोधनकार ठाकरे मैदानाजवळ समाप्त झाली. त्यानंतर, या मैदानात खुले अधिवेशन पार पडले. सुरुवातीला छात्रनेते अमित ढोमसे यांनी मुंबई विद्यापीठाच्या कारभारावर टीका केली. विद्यापीठाने पूर्वतयारीशिवाय केलेल्या आॅनलाइन पेपरतपासणीचा निर्णय सामान्य विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ झाला. अनेक विद्यार्थ्यांना या आॅनलाइन तपासणीचा फटका बसला असून पुढील वर्षाच्या प्रवेशासाठी नवीन समस्या उत्पन्न झाल्या. या साऱ्या प्रकाराचा निषेध करीत विद्यापीठाकडे प्रवेशप्रक्रि येत सुधारणा करण्याची मागणी केली. राज्यातील भाजप सरकारच्या काळात सुरू केलेल्या आॅनलाइन पेपरतपासणी प्रक्रियेत घोळ होऊन विद्यार्थ्यांचे हाल झाले होते. माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना तर भाजपने विधानसभेची उमेदवारी नाकारली. ती नाकारण्याच्या अन्य अनेक कारणांबरोबर शिक्षण विभागातील गोंधळ हे कारण होते.गोव्याचे छात्रनेते किसन मंगेशकर यांनी कोकणातल्या रस्त्यांची दुर्दशा व गोव्यातील कॅसिनोच्या संख्येबद्दल मत मांडले. छात्रनेते ज्ञानेश्वर पवार यांनी सीएएचे समर्थन करत विद्यार्थ्यांना याविषयी जागरूक राहण्यास सांगितले. छात्रनेते नीरज कुरकुंडे यांनी विद्यापीठाकडे उपकेंद्राची मागणी केली. प्रदेशमंत्री प्रेरणा पवार हिनेही मत मांडले. मंचावर कोकण प्रांताध्यक्ष प्रा. मंदार भानुशे आदी उपस्थित होते.वसतिगृहांची आवश्यकताछात्रनेते निखिल जाधव यांनी विद्यापीठाच्या वसतिगृहाविषयी भाष्य केले. बाहेरून येणाºया विद्यार्थ्यांना वसतिगृहाची सोय नसल्यामुळे त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. आज मुंबई विद्यापीठाची केवळ १० वसतिगृहे आहेत, त्यापैकी काही वसतिगृहांत किमान सोयीसुविधा नाहीत.विद्यापीठाने अधिक संख्येने वसतिगृह बांधण्याची मागणी त्यांनी केली. यासोबतच रागिनी कुर्मी यांनी सरकारकडे मेट्रो ट्रेन प्रोजेक्ट लवकरात लवकर अमलात आणण्याबाबत सुचवले. विद्यार्थ्यांना मेट्रो प्रवासासाठी योग्य त्या सवलती देण्याची मागणी केली.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस