शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाइन पेपर तपासणी बंद करा; अभाविपचा भाजपला घरचा आहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2019 06:42 IST

राज्यात भाजपप्रणीत सरकार सत्तेवर असताना प्रवेशप्रक्रियेचा बोजवारा उडाला होता.

ठाणे : मुंबई विद्यापीठाला ऑनलाइन पेपरतपासणी प्रक्रिया राबवणे जमत नसेल, तर त्यांनी पूर्ववत ऑफलाइन प्रक्रियेकडे वळावे. मात्र, विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळू नये, असे मत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय मंत्री अनिकेत ओव्हाळ यांनी व्यक्त केले. राज्यात भाजपप्रणीत सरकार सत्तेवर असताना प्रवेशप्रक्रियेचा बोजवारा उडाला होता. त्या पार्श्वभूमीवर आता अभाविपने आयोजित केलेल्या ५४ व्या कोकण प्रदेश अधिवेशनाच्या खुल्या अधिवेशनात ही मागणी केली. ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेच्या गोंधळाबाबत छात्रनेत्यांनी सरकारचे लक्ष वेधले.अधिवेशनाचा दुसरा दिवस शनिवारी रंगला. दुपारी आयोजित केलेली शोभायात्रा घाणेकर नाट्यगृहापासून सुरू होऊन प्रबोधनकार ठाकरे मैदानाजवळ समाप्त झाली. त्यानंतर, या मैदानात खुले अधिवेशन पार पडले. सुरुवातीला छात्रनेते अमित ढोमसे यांनी मुंबई विद्यापीठाच्या कारभारावर टीका केली. विद्यापीठाने पूर्वतयारीशिवाय केलेल्या आॅनलाइन पेपरतपासणीचा निर्णय सामान्य विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ झाला. अनेक विद्यार्थ्यांना या आॅनलाइन तपासणीचा फटका बसला असून पुढील वर्षाच्या प्रवेशासाठी नवीन समस्या उत्पन्न झाल्या. या साऱ्या प्रकाराचा निषेध करीत विद्यापीठाकडे प्रवेशप्रक्रि येत सुधारणा करण्याची मागणी केली. राज्यातील भाजप सरकारच्या काळात सुरू केलेल्या आॅनलाइन पेपरतपासणी प्रक्रियेत घोळ होऊन विद्यार्थ्यांचे हाल झाले होते. माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना तर भाजपने विधानसभेची उमेदवारी नाकारली. ती नाकारण्याच्या अन्य अनेक कारणांबरोबर शिक्षण विभागातील गोंधळ हे कारण होते.गोव्याचे छात्रनेते किसन मंगेशकर यांनी कोकणातल्या रस्त्यांची दुर्दशा व गोव्यातील कॅसिनोच्या संख्येबद्दल मत मांडले. छात्रनेते ज्ञानेश्वर पवार यांनी सीएएचे समर्थन करत विद्यार्थ्यांना याविषयी जागरूक राहण्यास सांगितले. छात्रनेते नीरज कुरकुंडे यांनी विद्यापीठाकडे उपकेंद्राची मागणी केली. प्रदेशमंत्री प्रेरणा पवार हिनेही मत मांडले. मंचावर कोकण प्रांताध्यक्ष प्रा. मंदार भानुशे आदी उपस्थित होते.वसतिगृहांची आवश्यकताछात्रनेते निखिल जाधव यांनी विद्यापीठाच्या वसतिगृहाविषयी भाष्य केले. बाहेरून येणाºया विद्यार्थ्यांना वसतिगृहाची सोय नसल्यामुळे त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. आज मुंबई विद्यापीठाची केवळ १० वसतिगृहे आहेत, त्यापैकी काही वसतिगृहांत किमान सोयीसुविधा नाहीत.विद्यापीठाने अधिक संख्येने वसतिगृह बांधण्याची मागणी त्यांनी केली. यासोबतच रागिनी कुर्मी यांनी सरकारकडे मेट्रो ट्रेन प्रोजेक्ट लवकरात लवकर अमलात आणण्याबाबत सुचवले. विद्यार्थ्यांना मेट्रो प्रवासासाठी योग्य त्या सवलती देण्याची मागणी केली.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस