शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनामुळे तुंबले पाणी

By admin | Updated: August 3, 2016 03:19 IST

घोडबंदर परिसरात तुंबलेल्या पाण्याकरिता ठाणे महापालिका प्रशासनाने राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला जबाबदार धरले

ठाणे : मुसळधार पावसामुळे ठाण्यातील उच्चभ्रूंची वस्ती असलेल्या घोडबंदर परिसरात तुंबलेल्या पाण्याकरिता ठाणे महापालिका प्रशासनाने राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला जबाबदार धरले आहे. या परिसरात रस्त्याखालून अथवा बाजूला सार्वजनिक बांधकाम विभागाने टाकलेले कल्व्हर्ट लहान आकाराचे असल्यानेच या परिसरात पाणी साचल्याचा दावा पालिकेने केला आहे. यामुळे आता महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागात तू-तू मै-मै होण्याची चिन्हे दिसत आहेत. रविवारी दोन तासांत झालेल्या २०० हून अधिक मिमी पावसामुळे येऊरच्या डोंगरांमधून वाहत आलेल्या पाण्याच्या लोंढ्याने घोडबंदर मार्गावरील उच्चभ्रू वसाहतींना वेढले. हिरानंदानी इस्टेट, विजयनगरी, लोढा, रु स्तमजी अशा वसाहतींमध्ये भरपूर पाणी साचले होते. मोकळ्या जागांवर एकामागोमाग गगनचुंबी इमारती उभारण्याची जणू स्पर्धाच गेल्या काही वर्षांत या भागात सुरू आहे. हे करत असताना येथील पायाभूत सुविधांच्या नियोजनाचा मात्र पार बोजवारा उडाल्याचे दिसत आहे. दरम्यान, घोडबंदर परिसरात महापालिकाच्या रस्त्यांचे अथवा सर्व्हिस रोडचे काम करताना महापालिकेने मोठे कल्व्हर्ट टाकण्याचा दावा केला होता. त्याउलट, येथील मोठ्या रस्त्यांच्या खालून पाणी जाण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने टाकलेले कल्व्हर्ट मात्र लहान असल्याने वेगाने पाण्याचा निचरा होण्यास अडथळा झाल्याचा दावा करण्यात येत आहे. तसेच यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे संपर्क साधून संबंधित कल्व्हर्ट मोठे करण्याविषयी चर्चा करण्यात आल्याची माहिती महापालिका उपायुक्त संदीप माळवी यांनी दिली.सध्या देशभरातील रिअल इस्टेट क्षेत्रात मंदीचे वारे वाहत असले तरी ठाण्याच्या घोडबंदर मार्गावरील वसाहतींमध्ये घरांचे दर चढेच राहिले आहेत. >घोडबंदर येथील नागरी सुविधांची पोलखोलमुंबईतील पश्चिम उपनगरांशी असलेली जवळीक आणि मुंबई-अहमदाबाद महामार्गास असलेल्या जोडरस्त्यामुळे घोडबंदर मार्गाला दळणवळणाच्या दृष्टीनेही मोठे महत्त्व आहे. हे महत्त्व लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने काही वर्षांपूवी या रस्त्याचे रु ंदीकरण केले. रुंदीकरण पूर्ण झाल्यानंतरही येथील वाहतूककोंडी कमी झालेली नाही. घोडबंदरला लागूनच गेल्या काही वर्षांत मोठ्या बिल्डरांचे टॉवर्स उभे राहत आहेत. परंतु, रविवारच्या पावसाने येथील लब्धप्रतिष्ठितांना घराबाहेर साठलेल्या गुडघाभर पाण्यामुळे दिवसभर घरात अडकवून ठेवल्याने येथील नागरी सुविधांची पोलखोल झाली आहे.