शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
3
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
4
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
5
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
6
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
7
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
8
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
9
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
10
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
11
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
12
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
13
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
14
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
15
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
16
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
17
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
18
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
19
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
20
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?

प्रशासनामुळे तुंबले पाणी

By admin | Updated: August 3, 2016 03:19 IST

घोडबंदर परिसरात तुंबलेल्या पाण्याकरिता ठाणे महापालिका प्रशासनाने राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला जबाबदार धरले

ठाणे : मुसळधार पावसामुळे ठाण्यातील उच्चभ्रूंची वस्ती असलेल्या घोडबंदर परिसरात तुंबलेल्या पाण्याकरिता ठाणे महापालिका प्रशासनाने राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला जबाबदार धरले आहे. या परिसरात रस्त्याखालून अथवा बाजूला सार्वजनिक बांधकाम विभागाने टाकलेले कल्व्हर्ट लहान आकाराचे असल्यानेच या परिसरात पाणी साचल्याचा दावा पालिकेने केला आहे. यामुळे आता महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागात तू-तू मै-मै होण्याची चिन्हे दिसत आहेत. रविवारी दोन तासांत झालेल्या २०० हून अधिक मिमी पावसामुळे येऊरच्या डोंगरांमधून वाहत आलेल्या पाण्याच्या लोंढ्याने घोडबंदर मार्गावरील उच्चभ्रू वसाहतींना वेढले. हिरानंदानी इस्टेट, विजयनगरी, लोढा, रु स्तमजी अशा वसाहतींमध्ये भरपूर पाणी साचले होते. मोकळ्या जागांवर एकामागोमाग गगनचुंबी इमारती उभारण्याची जणू स्पर्धाच गेल्या काही वर्षांत या भागात सुरू आहे. हे करत असताना येथील पायाभूत सुविधांच्या नियोजनाचा मात्र पार बोजवारा उडाल्याचे दिसत आहे. दरम्यान, घोडबंदर परिसरात महापालिकाच्या रस्त्यांचे अथवा सर्व्हिस रोडचे काम करताना महापालिकेने मोठे कल्व्हर्ट टाकण्याचा दावा केला होता. त्याउलट, येथील मोठ्या रस्त्यांच्या खालून पाणी जाण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने टाकलेले कल्व्हर्ट मात्र लहान असल्याने वेगाने पाण्याचा निचरा होण्यास अडथळा झाल्याचा दावा करण्यात येत आहे. तसेच यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे संपर्क साधून संबंधित कल्व्हर्ट मोठे करण्याविषयी चर्चा करण्यात आल्याची माहिती महापालिका उपायुक्त संदीप माळवी यांनी दिली.सध्या देशभरातील रिअल इस्टेट क्षेत्रात मंदीचे वारे वाहत असले तरी ठाण्याच्या घोडबंदर मार्गावरील वसाहतींमध्ये घरांचे दर चढेच राहिले आहेत. >घोडबंदर येथील नागरी सुविधांची पोलखोलमुंबईतील पश्चिम उपनगरांशी असलेली जवळीक आणि मुंबई-अहमदाबाद महामार्गास असलेल्या जोडरस्त्यामुळे घोडबंदर मार्गाला दळणवळणाच्या दृष्टीनेही मोठे महत्त्व आहे. हे महत्त्व लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने काही वर्षांपूवी या रस्त्याचे रु ंदीकरण केले. रुंदीकरण पूर्ण झाल्यानंतरही येथील वाहतूककोंडी कमी झालेली नाही. घोडबंदरला लागूनच गेल्या काही वर्षांत मोठ्या बिल्डरांचे टॉवर्स उभे राहत आहेत. परंतु, रविवारच्या पावसाने येथील लब्धप्रतिष्ठितांना घराबाहेर साठलेल्या गुडघाभर पाण्यामुळे दिवसभर घरात अडकवून ठेवल्याने येथील नागरी सुविधांची पोलखोल झाली आहे.