शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

तुळशी वृंदावन कागदावरच, पंढरीत मुख्यमंत्र्यांनी केली होती घोषणा

By admin | Updated: July 11, 2016 14:54 IST

विशेष महत्त्व असलेल्या तुळशीचे जादा उत्पादन व्हावे, यासाठी पंढरपूर येथे होणा-या तुळशी वृंदावन वन उद्यानाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुळशीचे रोपण करून केले होते.

- सचिन कांबळे
ऑनलाइन लोकमत
पंढरपूर, दि. ११ -  पर्यावरणाच्या दृष्टीने तुळस महत्त्वाची आहे. तसेच पंढरपूरच्या विठ्ठलामुळे विशेष महत्त्व असलेल्या तुळशीचे जादा उत्पादन व्हावे, यासाठी पंढरपूर येथे होणा-या तुळशी वृंदावन वन उद्यानाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुळशीचे रोपण करून केले असले तरीही शासनाकडून याबाबत कोणताही ठोस निर्णय न झाल्याने ती घोषणा अद्याप कागदावरच आहे. 
सोलापूर वनविभागाने नमामि चंद्रभागा कार्यक्रमांतर्गत पंढरपूर येथील यमाई तलावाच्या परिसरातील २ हेक्टर जागेत तुळशी वृंदावन वनउद्योन होणार आहे. यात्रेत होणाºया आठ रिंगणांचे औचित्य साधून आठ संतांची मंदिरे ही तुळशी वृंदावनामध्ये तयार करण्यात येणार आहेत. त्या परिसरात तुळशीच्या झाडांसह सुगंधीत फुलांचीही झाडे लावण्यात येणार आहेत. 
कासेगाव (ता. पंढरपूर) येथील वनविभागाच्या ५ हेक्टर जागेवर तुळशीची बाग फुलवण्यात येणार आहे. जगात तुळशीच्या २४ प्रजाती आहेत. त्यातील आठ प्रजाती आपल्या देशात आहेत. त्या आठही प्रजाती कासेगाव (ता. पंढरपूर) येथे उत्पादन करणार आहेत. या प्रजाती भाविकांना पाहता येतील यासाठी व्यवस्था करण्यात येणार होती. मात्र त्याठिकाणी सध्या काहीच नाही, तर मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी रोपण केलेली तुळसही जळून गेली आहे. यामुळे मुख्यमंत्र्यांनी केलेली घोषणा फक्त कागदावरच असल्याचे दिसून आले आहे.
 
तीन मंत्र्यांची होती उपस्थिती
सोलापूर वनविभागाने नमामि चंद्रभागा कार्यक्रमांतर्गत यमाई तलाव परिसरात तुळशी वृंदावन वनउद्यान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर, पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते तुळशी वृंदावनाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला होता. मात्र हे तुळशी वृंदावन लवकर व्हावे, यासाठी कोणीही प्रयत्न करताना दिसत नाही.
 
६ महिन्यांमध्ये होणार होते काम 
तुळसी वृंदावनाचे सर्व काम केवळ ६ महिन्यांच्या कालावधीत पूर्ण होणार असल्याची ग्वाही अधिकाºयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दिली होती मात्र एक महिन्याचा कालावधी लोटला तरीही, याबाबत कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे मंदिर समितीसह प्रशासकीय पातळीवरुन वनविभागाकडे पाठपुराव्याची गरज आहे. अन्यथा ही योजना इतर योजनांप्रमाणे कागदावरच राहण्याची चिन्हे आहेत.