शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

तुळशी वृंदावन कागदावरच, पंढरीत मुख्यमंत्र्यांनी केली होती घोषणा

By admin | Updated: July 11, 2016 14:54 IST

विशेष महत्त्व असलेल्या तुळशीचे जादा उत्पादन व्हावे, यासाठी पंढरपूर येथे होणा-या तुळशी वृंदावन वन उद्यानाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुळशीचे रोपण करून केले होते.

- सचिन कांबळे
ऑनलाइन लोकमत
पंढरपूर, दि. ११ -  पर्यावरणाच्या दृष्टीने तुळस महत्त्वाची आहे. तसेच पंढरपूरच्या विठ्ठलामुळे विशेष महत्त्व असलेल्या तुळशीचे जादा उत्पादन व्हावे, यासाठी पंढरपूर येथे होणा-या तुळशी वृंदावन वन उद्यानाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुळशीचे रोपण करून केले असले तरीही शासनाकडून याबाबत कोणताही ठोस निर्णय न झाल्याने ती घोषणा अद्याप कागदावरच आहे. 
सोलापूर वनविभागाने नमामि चंद्रभागा कार्यक्रमांतर्गत पंढरपूर येथील यमाई तलावाच्या परिसरातील २ हेक्टर जागेत तुळशी वृंदावन वनउद्योन होणार आहे. यात्रेत होणाºया आठ रिंगणांचे औचित्य साधून आठ संतांची मंदिरे ही तुळशी वृंदावनामध्ये तयार करण्यात येणार आहेत. त्या परिसरात तुळशीच्या झाडांसह सुगंधीत फुलांचीही झाडे लावण्यात येणार आहेत. 
कासेगाव (ता. पंढरपूर) येथील वनविभागाच्या ५ हेक्टर जागेवर तुळशीची बाग फुलवण्यात येणार आहे. जगात तुळशीच्या २४ प्रजाती आहेत. त्यातील आठ प्रजाती आपल्या देशात आहेत. त्या आठही प्रजाती कासेगाव (ता. पंढरपूर) येथे उत्पादन करणार आहेत. या प्रजाती भाविकांना पाहता येतील यासाठी व्यवस्था करण्यात येणार होती. मात्र त्याठिकाणी सध्या काहीच नाही, तर मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी रोपण केलेली तुळसही जळून गेली आहे. यामुळे मुख्यमंत्र्यांनी केलेली घोषणा फक्त कागदावरच असल्याचे दिसून आले आहे.
 
तीन मंत्र्यांची होती उपस्थिती
सोलापूर वनविभागाने नमामि चंद्रभागा कार्यक्रमांतर्गत यमाई तलाव परिसरात तुळशी वृंदावन वनउद्यान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर, पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते तुळशी वृंदावनाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला होता. मात्र हे तुळशी वृंदावन लवकर व्हावे, यासाठी कोणीही प्रयत्न करताना दिसत नाही.
 
६ महिन्यांमध्ये होणार होते काम 
तुळसी वृंदावनाचे सर्व काम केवळ ६ महिन्यांच्या कालावधीत पूर्ण होणार असल्याची ग्वाही अधिकाºयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दिली होती मात्र एक महिन्याचा कालावधी लोटला तरीही, याबाबत कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे मंदिर समितीसह प्रशासकीय पातळीवरुन वनविभागाकडे पाठपुराव्याची गरज आहे. अन्यथा ही योजना इतर योजनांप्रमाणे कागदावरच राहण्याची चिन्हे आहेत.