शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
3
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
4
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
5
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
6
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
7
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
8
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
9
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
10
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
11
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
12
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
13
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
14
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
15
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
16
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
17
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
18
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
19
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
20
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत

तुळशी वृंदावन कागदावरच, पंढरीत मुख्यमंत्र्यांनी केली होती घोषणा

By admin | Updated: July 11, 2016 14:54 IST

विशेष महत्त्व असलेल्या तुळशीचे जादा उत्पादन व्हावे, यासाठी पंढरपूर येथे होणा-या तुळशी वृंदावन वन उद्यानाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुळशीचे रोपण करून केले होते.

- सचिन कांबळे
ऑनलाइन लोकमत
पंढरपूर, दि. ११ -  पर्यावरणाच्या दृष्टीने तुळस महत्त्वाची आहे. तसेच पंढरपूरच्या विठ्ठलामुळे विशेष महत्त्व असलेल्या तुळशीचे जादा उत्पादन व्हावे, यासाठी पंढरपूर येथे होणा-या तुळशी वृंदावन वन उद्यानाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुळशीचे रोपण करून केले असले तरीही शासनाकडून याबाबत कोणताही ठोस निर्णय न झाल्याने ती घोषणा अद्याप कागदावरच आहे. 
सोलापूर वनविभागाने नमामि चंद्रभागा कार्यक्रमांतर्गत पंढरपूर येथील यमाई तलावाच्या परिसरातील २ हेक्टर जागेत तुळशी वृंदावन वनउद्योन होणार आहे. यात्रेत होणाºया आठ रिंगणांचे औचित्य साधून आठ संतांची मंदिरे ही तुळशी वृंदावनामध्ये तयार करण्यात येणार आहेत. त्या परिसरात तुळशीच्या झाडांसह सुगंधीत फुलांचीही झाडे लावण्यात येणार आहेत. 
कासेगाव (ता. पंढरपूर) येथील वनविभागाच्या ५ हेक्टर जागेवर तुळशीची बाग फुलवण्यात येणार आहे. जगात तुळशीच्या २४ प्रजाती आहेत. त्यातील आठ प्रजाती आपल्या देशात आहेत. त्या आठही प्रजाती कासेगाव (ता. पंढरपूर) येथे उत्पादन करणार आहेत. या प्रजाती भाविकांना पाहता येतील यासाठी व्यवस्था करण्यात येणार होती. मात्र त्याठिकाणी सध्या काहीच नाही, तर मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी रोपण केलेली तुळसही जळून गेली आहे. यामुळे मुख्यमंत्र्यांनी केलेली घोषणा फक्त कागदावरच असल्याचे दिसून आले आहे.
 
तीन मंत्र्यांची होती उपस्थिती
सोलापूर वनविभागाने नमामि चंद्रभागा कार्यक्रमांतर्गत यमाई तलाव परिसरात तुळशी वृंदावन वनउद्यान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर, पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते तुळशी वृंदावनाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला होता. मात्र हे तुळशी वृंदावन लवकर व्हावे, यासाठी कोणीही प्रयत्न करताना दिसत नाही.
 
६ महिन्यांमध्ये होणार होते काम 
तुळसी वृंदावनाचे सर्व काम केवळ ६ महिन्यांच्या कालावधीत पूर्ण होणार असल्याची ग्वाही अधिकाºयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दिली होती मात्र एक महिन्याचा कालावधी लोटला तरीही, याबाबत कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे मंदिर समितीसह प्रशासकीय पातळीवरुन वनविभागाकडे पाठपुराव्याची गरज आहे. अन्यथा ही योजना इतर योजनांप्रमाणे कागदावरच राहण्याची चिन्हे आहेत.