शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

तुकडोजी महाराज, गाडगेबाबांचा राज्य शासनाला विसर

By admin | Updated: January 15, 2017 22:41 IST

प्रत्येक भारतीयाने त्यांना कायमच आपल्या मनमंदिरात सन्मानाचे स्थान दिले आहे.

योगेश पांडे/ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 15 - झाड झडूले शस्त्र बनेंगे,फूल बनेगी सेना...या शब्दात राष्ट्राभिमान जागवणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व देव बाजाराचा भाजीपाला नाही रे...हे सांगत अंधश्रद्धेवर प्रहार करणारे संत गाडगेबाबा हे समाजाचे वैचारिक दैवत. प्रत्येक भारतीयाने त्यांना कायमच आपल्या मनमंदिरात सन्मानाचे स्थान दिले आहे. परंतु , राज्य शासनाच्या लेखी मात्र हे दोघेही राष्ट्रपुरुष नाहीत. वाचून धक्का बसेल, पण हे खरे आहे. २०१७ मध्ये राज्यातील सर्व विद्यापीठांत राष्ट्रपुरुष व थोर व्यक्ती यांची जयंती साजरी करण्यासंदर्भातील परिपत्रकात या दोन्ही महान व्यक्तींच्या नावाचा साधा उल्लेखदेखील करण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे, शासनाने हा करंटेपणा तेव्हा केलाय जेव्हा या दोन समाजदैवतांच्या नावावर महाराष्ट्रातील दोन विद्यापीठे उद्याचे नागरिक घडविताहेत. असा उरफाटा निर्णय घेऊन या विद्यापीठातील हजारो विद्यार्थ्यांसह या दोन्ही समाजदैवतांच्या अनुयायांना शासनाला नेमका कोणता संदेश द्यायचा आहे, असा प्रश्न आता विचारला जात आहे. ुराज्यातील विविध विद्यापीठे व महाविद्यालयांत राष्ट्रीय सणांसोबतच वर्षभर राष्ट्रपुरुष व थोर व्यक्ती यांची जयंती साजरी करण्यात येते. यासंदर्भात राज्य शासनाकडून दरवर्षी परिपत्रक काढण्यात येते. २०१७ सालाबाबतदेखील राज्य शासनाने परिपत्रक काढले. त्या अनुशंगाने उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ.धनराज माने यांनी सर्व विद्यापीठे तसेच विभागीय सहसंचालकांना पत्राद्वारे निर्देश दिले. यासोबतच १५ आॅगस्ट व २६ जानेवारी वगळता २८ विविध दिवसांची यांदी जोडण्यात आली. या यादीमध्ये देशाला दिशा देणारे विविध राष्ट्रपुरुष, राजकारणी तसेच थोर व्यक्तींच्या नावाचा समावेश आहे. मात्र राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा या दोघांच्याही नावाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. या दोन्ही संतांचे कार्य लक्षात घेता विद्यार्थ्यांपर्यंत त्यांची महती पोहोचण्याची आवश्यकता आहे. असे दिवस साजरे केल्याने विद्यार्थ्यांनी राष्ट्रपुरुषांची ओळख होते. मात्र यात या दोन्ही संतांचे नावच नसल्याने त्यांचे विचार पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचतील तरी कसे, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. यासंदर्भात धनराज माने यांच्याशी वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यांचा मोबाईल ह्यस्वीच आॅफह्ण होता.कुलगुरूंनी व्यक्त केले आश्चर्ययासंदर्भात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.मुरलीधर चांदेकर या दोघांनीही आश्चर्य व्यक्त केले आहे. या दोन्ही संतांचे कार्य पाहता त्यांची जयंती सर्वच विद्यापीठांमध्ये साजरी होणे अभिप्रेत आहे. राज्यातील इतर विद्यापीठांना ज्या थोर पुरुषांची नावे आहेत, त्यांच्याबाबत यादीच्या माध्यमातून निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे सर्वच विद्यापीठांत राष्ट्रसंत तसेच गाडगेबाबा यांची जयंतीदेखील साजरी झाली पाहिजे. याबाबत राज्य शासनाला विनंती करणार असल्याचे डॉ.काणे यांनी सांगितले. संबंधित परिपत्रक राज्य शासनाचे असून निर्णय त्यांच्याच अखत्यारित येतो. मात्र तरीदेखील आम्ही शासनाला पत्र पाठवून भावना कळवून, असे डॉ.चांदेकर यांनी स्पष्ट केले.