शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
2
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
3
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
4
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच काढला आईचा काटा; इन्स्टाग्रामने उलगडलं मृत्यूचं गूढ
5
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
6
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
7
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
8
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
9
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
10
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
11
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
12
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
13
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
14
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
15
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
16
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
17
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
18
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
19
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
20
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया

गांधी हत्येचे सत्य गुलदस्तातच

By admin | Updated: November 7, 2016 06:40 IST

भारताच्या फाळणीचा विषय अस्तित्वात नव्हता, तेव्हापासूनच महात्मा गांधींच्या हत्येचे प्रयत्न सुरू होते. त्यामुळे हत्येबाबत निव्वळ अपप्रचार केला जात आहे.

पुणे : भारताच्या फाळणीचा विषय अस्तित्वात नव्हता, तेव्हापासूनच महात्मा गांधींच्या हत्येचे प्रयत्न सुरू होते. त्यामुळे हत्येबाबत निव्वळ अपप्रचार केला जात आहे. नथुराम गोडसे हा केवळ आज्ञेचे पालन करणारा व्यक्ती होता, राष्ट्रीय संघटन पाठीशी असल्याशिवाय हे कृत्य करता येणे शक्य नाही. बापूंच्या हत्येनंतर नेमण्यात आलेल्या कपूर समितीचा अहवाल प्रसिद्धच होऊ न दिल्यामुळे, हत्येमागचे खरे रहस्य उघडकीस आले नसल्याचा दावा महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी केला. हिंदू राष्ट्राची उभारणी करणे हेच संघाचे स्वप्न होते, गांधींची हत्या हे त्याचे पहिले पाऊल होते; मात्र ६० वर्षांत त्यांच्या हिंदूराष्ट्रनिर्मितीचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही, देश वाचला, आपण वाचलो, अशी मार्मिक टिप्पणीही त्यांनी या वेळी केली. जयवंत मठकर अमृतमहोत्सव समिती, चांगले विचार समूह, सर्वोदय मंडळ यांच्या वतीने ‘गांधीहत्या सत्य आणि असत्य’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. या वेळी एमकेसीएलचे व्यवस्थापकीय संचालक विवेक सावंत, ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे उपस्थित होते. संकेत मुनोत लिखित ‘एक धैर्यशील योद्धा गांधी’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. गांधी म्हणाले की, बापूंच्या हत्येचा पहिला प्रयत्न पुण्यात झाला होता तो १९३४ साली. नंतर पुण्यातील हल्ल्यात वापरलेल्या हातगोळ्यांचा संबंध नगर येथे एका मिरवणुकीवर झालेल्या हल्ल्याशी होता आणि दोन्ही प्रकरणातील आरोपी एक होता, हा योगायोग नाही. पुण्यात गांधींना चप्पल-बुटांची भेट पाठविणारा, वर्धा येथे गांधींची गाडी नादुरुस्त करणारा आणि हत्या करणारा आरोपी एकच म्हणजे नथुराम होता. यातून त्याच्या मागे एक संघटना होती आणि हा पूर्वनियोजित कट होता हे स्पष्ट दिसते. पोलिसांनी याबाबत कधीच सतर्कता बाळगली नाही. त्यांची भूमिका संशयास्पद होती, असा आरोप गांधी यांनी केला.गांधींच्या हत्येनंतर गावा-गावांत संघाने मिठाई कशी वाटली, ही सगळी तयारी कोणी केली होती, अशी घणाघाती टीका गांधी यांनी केली. बापूंच्या हत्येनंतर नेमलेल्या कपूर समितीची सर्व कागदपत्रे उघड झाली तर ढोंगी राष्ट्रभक्तांची कुटनीती स्पष्ट होईल, असे सांगत मुस्लिमांचे राजकारण, फाळणी व ५५ कोटी याचे खापर केवळ गांधींवर फोडण्यात येते, याबद्दल त्यांनी तीव्र शब्दांत हल्ला चढवला. (प्रतिनिधी)