शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

गांधी हत्येचे सत्य गुलदस्तातच

By admin | Updated: November 7, 2016 06:40 IST

भारताच्या फाळणीचा विषय अस्तित्वात नव्हता, तेव्हापासूनच महात्मा गांधींच्या हत्येचे प्रयत्न सुरू होते. त्यामुळे हत्येबाबत निव्वळ अपप्रचार केला जात आहे.

पुणे : भारताच्या फाळणीचा विषय अस्तित्वात नव्हता, तेव्हापासूनच महात्मा गांधींच्या हत्येचे प्रयत्न सुरू होते. त्यामुळे हत्येबाबत निव्वळ अपप्रचार केला जात आहे. नथुराम गोडसे हा केवळ आज्ञेचे पालन करणारा व्यक्ती होता, राष्ट्रीय संघटन पाठीशी असल्याशिवाय हे कृत्य करता येणे शक्य नाही. बापूंच्या हत्येनंतर नेमण्यात आलेल्या कपूर समितीचा अहवाल प्रसिद्धच होऊ न दिल्यामुळे, हत्येमागचे खरे रहस्य उघडकीस आले नसल्याचा दावा महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी केला. हिंदू राष्ट्राची उभारणी करणे हेच संघाचे स्वप्न होते, गांधींची हत्या हे त्याचे पहिले पाऊल होते; मात्र ६० वर्षांत त्यांच्या हिंदूराष्ट्रनिर्मितीचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही, देश वाचला, आपण वाचलो, अशी मार्मिक टिप्पणीही त्यांनी या वेळी केली. जयवंत मठकर अमृतमहोत्सव समिती, चांगले विचार समूह, सर्वोदय मंडळ यांच्या वतीने ‘गांधीहत्या सत्य आणि असत्य’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. या वेळी एमकेसीएलचे व्यवस्थापकीय संचालक विवेक सावंत, ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे उपस्थित होते. संकेत मुनोत लिखित ‘एक धैर्यशील योद्धा गांधी’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. गांधी म्हणाले की, बापूंच्या हत्येचा पहिला प्रयत्न पुण्यात झाला होता तो १९३४ साली. नंतर पुण्यातील हल्ल्यात वापरलेल्या हातगोळ्यांचा संबंध नगर येथे एका मिरवणुकीवर झालेल्या हल्ल्याशी होता आणि दोन्ही प्रकरणातील आरोपी एक होता, हा योगायोग नाही. पुण्यात गांधींना चप्पल-बुटांची भेट पाठविणारा, वर्धा येथे गांधींची गाडी नादुरुस्त करणारा आणि हत्या करणारा आरोपी एकच म्हणजे नथुराम होता. यातून त्याच्या मागे एक संघटना होती आणि हा पूर्वनियोजित कट होता हे स्पष्ट दिसते. पोलिसांनी याबाबत कधीच सतर्कता बाळगली नाही. त्यांची भूमिका संशयास्पद होती, असा आरोप गांधी यांनी केला.गांधींच्या हत्येनंतर गावा-गावांत संघाने मिठाई कशी वाटली, ही सगळी तयारी कोणी केली होती, अशी घणाघाती टीका गांधी यांनी केली. बापूंच्या हत्येनंतर नेमलेल्या कपूर समितीची सर्व कागदपत्रे उघड झाली तर ढोंगी राष्ट्रभक्तांची कुटनीती स्पष्ट होईल, असे सांगत मुस्लिमांचे राजकारण, फाळणी व ५५ कोटी याचे खापर केवळ गांधींवर फोडण्यात येते, याबद्दल त्यांनी तीव्र शब्दांत हल्ला चढवला. (प्रतिनिधी)