अकोला: राज्यात भाजप-शिवसेना युतीची सत्ता असली तरी खरे सत्ताधारी ह्यबारामतीह्णकरच असल्याचा उपरोधिक टोला शेतकरी संघटना तथा विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते माजी आमदार वामनराव चटप यांनी अकोला येथे मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत लगावला. 'विदर्भ मिळवू औंदा' अशी घोषणा विदर्भ राज्य आंदोलन समितीने केली आहे. त्यानिमित्ताने विदर्भात करण्यात येणार्या आंदोलनाची माहिती देण्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीने येथील शासकीय विश्रामगृहात सायंकाळी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना माजी आमदार चटप यांनी राज्य शासनाच्या कामावर ताशेरे ओढतानाच विदर्भातील पुत्र राज्यातील सत्ताधारी असताना विदर्भावर सर्वच क्षेत्रात होत असलेल्या अन्यायाचा पाढा वाचला. मुख्यमंत्री, अर्थमंत्री, वीजमंत्री, आदिवासी उपाययोजना विभागाचे मंत्री विदर्भातील असताना पुरवणी अर्थसंकल्पात विदर्भातील यवतमाळ आणि चंद्रपूर या दोन आदिवासीबहुल जिल्हय़ांचा उल्लेखही नाही. विदर्भात ५५00 हजार मेगावॉट वीज निर्मिती होत असताना येथील शेतकरी वीज जोडणीसाठी आत्महत्या करतो आहे. दुसरीकडे मेट्रो सिटीच्या नावाखाली मुंबई-पुण्यात झीरो लोडशेडिंग होते. ग्रामीण भागासाठी वीज उपकेंद्र मंजूर करताना बारामतीसारख्या तालुक्यासाठी १00 उपकेंद्रांना मंजुरी मिळते तर शेतकरी आत्महत्याग्रस्त जिलतील तालुक्यांना सरासरी ५ उपकेंद्रही मिळत नाही. कोळसा खाणींचे वाटप होताना विदर्भातून राज्यसभेवर निवडून आलेला आणि मंत्री झालेला खासदार धोरणात बदल झाल्याचे सांगतो, तेव्हा विदर्भातील दोन वजनदार म्हणवून घेणारे केंद्रातील मंत्री आणि भाजप-शिवसेनेचे ८ खासदार काहीही बोलत नाही. राज्यातही हीच परिस्थिती आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधून आयात केलेले अर्धेअधिक आमदाराच भाजप-शिवसेनेच्या तिकिटांवर निवडून आले आहे. धोरणात बदल केल्यानंतर त्यांचा विरोध होणार आहे. याचाच अर्थ राज्यात सत्ता युतीची असली तरी खरे राज्यकर्ते बारामतीकरच आहेत. या पत्रकार परिषदेला अरुण केदार, अँड. नंदाताई पराते आदींची उपस्थिती होती.
राज्यात खरी सत्ता ‘बारामती’चीच!
By admin | Updated: September 30, 2015 00:50 IST