शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
3
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
4
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
5
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
6
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
7
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
10
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
11
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
12
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
13
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
14
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
15
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
16
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
17
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
18
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
19
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
20
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण

राज्यात खरी सत्ता ‘बारामती’चीच!

By admin | Updated: September 30, 2015 00:50 IST

अकोला येथील पत्रकार परिषदेत वामनराव चटप यांचा सत्तारूढ भाजप-सेनायुतीला उपरोधिक टोला.

अकोला: राज्यात भाजप-शिवसेना युतीची सत्ता असली तरी खरे सत्ताधारी ह्यबारामतीह्णकरच असल्याचा उपरोधिक टोला शेतकरी संघटना तथा विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते माजी आमदार वामनराव चटप यांनी अकोला येथे मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत लगावला. 'विदर्भ मिळवू औंदा' अशी घोषणा विदर्भ राज्य आंदोलन समितीने केली आहे. त्यानिमित्ताने विदर्भात करण्यात येणार्‍या आंदोलनाची माहिती देण्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीने येथील शासकीय विश्रामगृहात सायंकाळी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना माजी आमदार चटप यांनी राज्य शासनाच्या कामावर ताशेरे ओढतानाच विदर्भातील पुत्र राज्यातील सत्ताधारी असताना विदर्भावर सर्वच क्षेत्रात होत असलेल्या अन्यायाचा पाढा वाचला. मुख्यमंत्री, अर्थमंत्री, वीजमंत्री, आदिवासी उपाययोजना विभागाचे मंत्री विदर्भातील असताना पुरवणी अर्थसंकल्पात विदर्भातील यवतमाळ आणि चंद्रपूर या दोन आदिवासीबहुल जिल्हय़ांचा उल्लेखही नाही. विदर्भात ५५00 हजार मेगावॉट वीज निर्मिती होत असताना येथील शेतकरी वीज जोडणीसाठी आत्महत्या करतो आहे. दुसरीकडे मेट्रो सिटीच्या नावाखाली मुंबई-पुण्यात झीरो लोडशेडिंग होते. ग्रामीण भागासाठी वीज उपकेंद्र मंजूर करताना बारामतीसारख्या तालुक्यासाठी १00 उपकेंद्रांना मंजुरी मिळते तर शेतकरी आत्महत्याग्रस्त जिलतील तालुक्यांना सरासरी ५ उपकेंद्रही मिळत नाही. कोळसा खाणींचे वाटप होताना विदर्भातून राज्यसभेवर निवडून आलेला आणि मंत्री झालेला खासदार धोरणात बदल झाल्याचे सांगतो, तेव्हा विदर्भातील दोन वजनदार म्हणवून घेणारे केंद्रातील मंत्री आणि भाजप-शिवसेनेचे ८ खासदार काहीही बोलत नाही. राज्यातही हीच परिस्थिती आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधून आयात केलेले अर्धेअधिक आमदाराच भाजप-शिवसेनेच्या तिकिटांवर निवडून आले आहे. धोरणात बदल केल्यानंतर त्यांचा विरोध होणार आहे. याचाच अर्थ राज्यात सत्ता युतीची असली तरी खरे राज्यकर्ते बारामतीकरच आहेत. या पत्रकार परिषदेला अरुण केदार, अँड. नंदाताई पराते आदींची उपस्थिती होती.