शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
3
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
4
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
5
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
6
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
7
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
8
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
9
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
10
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा
11
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
12
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
13
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
14
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
15
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
16
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
17
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
18
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
19
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
20
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 

ही दोस्ती तुटायची नाय, सहकाऱ्याच्या मृत्यूचा विरह सरड्याला सहन होईना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2017 22:13 IST

अनंत जाधव  सावंतवाडी, दि. 25 - आपल्या सहकाऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर मनुष्य ज्या प्रमाणात शोकसागरात बुडतो, तसाच शोक हा  पशु-पक्षी प्राणी ...

अनंत जाधव सावंतवाडी, दि. 25 - आपल्या सहकाऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर मनुष्य ज्या प्रमाणात शोकसागरात बुडतो, तसाच शोक हा  पशु-पक्षी प्राणी यांना होत असतो. पण प्राणीमात्रांचा शोक कुणाला दिसत नाही. तसाच काहीसा प्रकार आंबोली-फौजदारवाडीत घडला. आपल्या सहकाऱ्याच्या मृत्यूमुळे व्यथित झालेला सरडा मृत सरड्याच्या बाजूला तासन्तास पडून होता. अनेक वाहने आजूबाजूला आली, पण तो सरडा काही मृत सरड्याच्या बाजूला होता तो हलत नव्हता. त्यामुळेच प्राणीमात्र मुकी असली तरी ''ये दोस्ती तुटायची नाय" असे म्हणत असतील, हेच यातून दिसून येत आहे.महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण म्हणून आंबोलीकडे पाहिले जाते. तर चेरापुंजीनंतरचा जास्त पाऊस आंबोलीत पडत असतो. येथे अनेक वेगवेगळ््या जातीचे जिवंत प्राणी पाहण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक येत असतात. त्यातीलच एका प्राण्याची सहकाऱ्याबद्दलची भावना घेण्यासारखी आहे. आंबोली-फौजदारवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या मधोमध सोमवारी सकाळी एक सरडा मृत अवस्थेत पडला होता. तर त्याच्या बाजूला एक सरडा जिवंतपणे त्या मृृत सरड्याची राखण करीत होता. या सरड्याच्या आजूबाजूूने अनेक वाहने ये-जा करीत होती. पण जिवंत सरडा काही केल्या मृत सरड्याकडून हालत नव्हता. एकटक मृत सरड्याकडे पाहत होता. कदाचित त्याला त्याचे दु:ख कुणाला सांगता येत नव्हते आणि लपवताही येत नव्हते. त्यामुळे त्या मृत सरड्याच्या जवळून त्याला न्याहाळत आपल्या आठवणी जाग्या करीत असावा, असे वाटत होते.अनेक वेळा मनुष्य मृत झाला की त्याचे सहकारी नातेवाईक आपले दु:ख व्यक्त करीत असतात. आपले मन हलके करतात.