शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

अजून दोन दिवस त्रास सहन करा - मध्य रेल्वे, तीन दिवसांत ३९ एक्स्प्रेस रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 05:03 IST

मंगळवारच्या मुसळधार पावसाने मुंबई पाण्याखाली गेली. बुधवारी दुपारनंतरही रेल्वे अडखळतच धावत आहे. उपनगरीय रेल्वेचे मध्य आणि हार्बर मार्गावरील वाहतुक वेळपत्रकानुसार सुरु होण्यास आणखी दोन दिवस लागणार आहेत

मुंबई : मंगळवारच्या मुसळधार पावसाने मुंबई पाण्याखाली गेली. बुधवारी दुपारनंतरही रेल्वे अडखळतच धावत आहे. उपनगरीय रेल्वेचे मध्य आणि हार्बर मार्गावरील वाहतुक वेळपत्रकानुसार सुरु होण्यास आणखी दोन दिवस लागणार आहेत. रेल्वे ट्रॅकवर पाण्याची पातळी जास्त असल्याने या पाण्यामुळे मरेवरील ३५ लोकलच्या एक्सल मोटरमध्ये तांत्रिक बिघाड झाले आहेत, परिणामी रविवारच्या वेळापत्रकानुसार गुरुवारी गाड्या चालविण्यात आल्या असून आणखी दोन दिवस त्रास सहन करा, असे आवाहन मध्य रेल्वतर्फे प्रवाशांना करण्यात आले आहे.मंगळवारच्या पावसामुळे कुर्ला, सायन, माटुंगा आणि परेल स्थानकातील रेल्वे रुळांवर खुप पाणी साचले होते. सुमारे १२ ते १५ इंचापर्यत पाणी या रुळांवर होते, पाण्यातच लोकल तासनतास उभ्या राहिल्यामुळे मरेच्या ताफ्यातील ३५ लोकलच्या एक्सल मोटरमध्ये पाणी गेले आहे. नादुरुस्त लोकल दुरुस्तीचे काम रेल्वेप्रशासन युद्ध पातळीवर करीत आहे. मरेच्या ताफ्यात एकुण १४५ रेक आहेत, त्यापैकी १२२ रेकच्या सहाय्याने रोज सुमारे १६०० फेºया चालवल्या जातात. पावसामुळे १०० रेकच्या मदतीने फेºया होत आहे. शनिवारपर्यंत या सर्व लोकल दुरुस्त करुन त्या सेवेत आणल्या जातील, असे मध्य रेल्वेचे डीआरएम रविंद्र गोयल म्हणाले.दुरांतो एक्सप्रेसचा अपघात होवून आता अडीच दिवस उलटले तरिही अद्याप रेल्व मार्ग पुर्ववत करण्याचे काम सुरूच आहे. या कामामुळे शुक्रवारी आणि शनिवारी धावणाºया तब्बल २५ एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. ३१ आॅगस्ट, १ सप्टेंबर आणि २ सप्टेंबर या तीन दिवसातील तब्बल ३९ एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. यापैकी गुरूवारी १४ एक्सपे्रस रद्द करण्यात आल्या असून, १ सप्टेंबरच्या २० आणि २ सप्टेंबरच्या ५ एक्सप्रेस रद्द केल्या आहेत.बुधवारी रात्री १० वाजून १० मिनिटांनी मरेचा डाउन मार्ग वाहतुकीसााठी खुला झाला असला तरी अप मार्गावर चिखल येत असल्यामुळे वाहतुक सुरु करण्यासाठी आणखी वेळ लागणारआहे, असे डीआरएम रविंद्र गोयल यांनी गुरूवारी सांगितले.

टॅग्स :central railwayमध्ये रेल्वेRailway Passengerरेल्वे प्रवासी