शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
4
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
5
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
6
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
7
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
8
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
9
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
10
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
11
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
12
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
13
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
14
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
15
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
16
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
17
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
18
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
19
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
20
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...

तिहेरी तलाक पद्धतीने महिलांचे शोषण!

By admin | Updated: May 3, 2017 04:00 IST

मुस्लीम समाजातील तिहेरी तलाक पद्धतीमुळे महिलांचे आर्थिक, मानसिक आणि शारीरिक शोषण होत असल्याचा गंभीर आरोप

मुंबई : मुस्लीम समाजातील तिहेरी तलाक पद्धतीमुळे महिलांचे आर्थिक, मानसिक आणि शारीरिक शोषण होत असल्याचा गंभीर आरोप भारतीय मुस्लीम महिला आंदोलन संघटनेने मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. या वेळी पीडित महिलांनी आपली व्यथाही मांडली. दरम्यान, हिंदू आणि इतर धर्मीयांच्या धर्तीवर मुस्लीम महिलांनाही न्याय मिळावा, म्हणून केंद्र सरकारने संसदेमध्ये मुस्लीम कौटुंबिक कायदा पारित करण्याची मागणी संघटनेने केली.गेल्या तीन वर्षांपासून आपण विवाहित आहोत की, घटस्फोटीत हेच माहीत नसल्याचे नालासोपारा येथे राहणारी पीडित सोफिया खान सांगत होती. लग्न झाल्यापासून शारीरिक आणि आर्थिक शोषण होत आहे. गेल्या तीन वर्षांपासून पोटगी तर दूरच, घरखर्चासाठी कोणतीही मदत मिळत नाही आहे. अशा परिस्थितीत जगायचे तरी कसे?’ असा सवाल सोफियाने उपस्थित केला आहे.कलिना येथील शास्त्रीनगरमध्ये राहणारी पीडित शबनम खाननेही आपली व्यथा मांडली. लग्नानंतर पहिल्याच आठवड्यात कळाले की, पतीचे आधीच लग्न झाले असून, त्याला दोन मुलेही आहेत. पतीला दारूचे व्यसन असल्याचेही समजले. शारीरिक शोषणाचे व्हिडीओ पतीने काढला. याबाबत वाच्यता केल्यास व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल करण्याची धमकी दिली. त्याने जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याने अखेर नाईलाजास्तव अन्यायाला वाचा फोडत असल्याचे शबनमने सांगितले. (प्रतिनिधी)हक्काचे काय?महिला म्हणून संविधानाने आम्हाला काही हक्क दिले आहेत की नाहीत? असा सवाल मुंब्रा येथील पीडित नासिरा शेखने उपस्थित केला. पतीने तलाकची भीती दाखवून अनेक अत्याचार केले. अखेर बाळंतपणासाठी माहेरी पाठवले. त्यानंतर दुसरे लग्न केले. आता माझ्या मुलीचे संगोपन आणि माझे काय होणार? संविधानाने आम्हाला काही अधिकार दिले आहेत की नाही? असे अनेक सवाल नासिराने सरकारसमोर उपस्थित केले.