शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

काँग्रेसपेक्षा भाजपाच्या काळात शेतकºयांची तिप्पट प्रगती- देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 00:35 IST

काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात शेतक-यांना प्रत्येक योजनेचा लाभ घेण्यासाठी दलालांना सामोरे जावे लागत होते. काँग्रेसने शेती व संलग्नीत योजनांवर केलेली तरतूद अपुरी होती.

खामगाव (बुलडाणा) : काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात शेतक-यांना प्रत्येक योजनेचा लाभ घेण्यासाठी दलालांना सामोरे जावे लागत होते. काँग्रेसने शेती व संलग्नीत योजनांवर केलेली तरतूद अपुरी होती. काँग्रेसची धोरणे ही त्यांच्या नेत्यांच्या लॉबींना पूरक असणारी होती, अशी घणाघाती टीका करताना, भाजपाच्या कार्यकाळात आम्ही दलालांची शृंखला नष्ट करून शेतकºयांची तिप्पट प्रगती केली, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे केला.बुलडाणा जिल्हा कृषी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. मंचावर राज्याचे कृषी व फलोत्पादनमंत्री भाऊसाहेब फुंडकर, गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, खा. प्रतापराव जाधव, खा.रक्षा खडसे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, भाजपा सरकारने शेतकºयांच्या हितासाठीच्या धोरणांवर गेल्या ३ वर्षांपासून लक्ष केंद्रित केले आहे. काँग्रेसच्या कार्यकाळात शेती व शेती संलग्नीत योजनांसाठी अंदाजपत्रकांमध्ये १६ ते २१ हजार कोटींची तरतूद असायची. आम्ही ती ६६ हजार कोटी केली.जलयुक्त शिवार पाण्याचा नियोजनबद्ध वापर, शेतीचे यांत्रिकीकरण, गटशेतीला प्रोत्साहन, अशा योजना राबविल्या. योजनांसाठी आॅनलाइन व्यवस्था कार्यान्वित केली. त्यामुळे दलालाच्या विळख्यातून शेतकरी मुक्त झाला. कृषिमंत्री फुंडकर यांनी गारपिटीमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे पूर्ण झाल्याची माहिती दिली. सुमारे १ लाख २५ हजार हेक्टरवरील क्षेत्र बाधीत असून, तसा प्रस्ताव केंद्राला पाठविला आहे. लवकरच मदतीचे वाटप सुरू होईल, असेही त्यांनी सांगितले.काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला जनतेने सत्तेबाहेर टाकले आहे. त्यांनी आता पकोडे तळण्याचे कार्यक्रम हाती घेतले आहेत. पुढील किमान १५ वर्षे या पक्षांना जनता स्वीकारणार नाही. त्यामुळे त्यांना पकोडेच तळावे लागणार आहेत.- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस