शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

काँग्रेसपेक्षा भाजपाच्या काळात शेतकºयांची तिप्पट प्रगती- देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 00:35 IST

काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात शेतक-यांना प्रत्येक योजनेचा लाभ घेण्यासाठी दलालांना सामोरे जावे लागत होते. काँग्रेसने शेती व संलग्नीत योजनांवर केलेली तरतूद अपुरी होती.

खामगाव (बुलडाणा) : काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात शेतक-यांना प्रत्येक योजनेचा लाभ घेण्यासाठी दलालांना सामोरे जावे लागत होते. काँग्रेसने शेती व संलग्नीत योजनांवर केलेली तरतूद अपुरी होती. काँग्रेसची धोरणे ही त्यांच्या नेत्यांच्या लॉबींना पूरक असणारी होती, अशी घणाघाती टीका करताना, भाजपाच्या कार्यकाळात आम्ही दलालांची शृंखला नष्ट करून शेतकºयांची तिप्पट प्रगती केली, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे केला.बुलडाणा जिल्हा कृषी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. मंचावर राज्याचे कृषी व फलोत्पादनमंत्री भाऊसाहेब फुंडकर, गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, खा. प्रतापराव जाधव, खा.रक्षा खडसे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, भाजपा सरकारने शेतकºयांच्या हितासाठीच्या धोरणांवर गेल्या ३ वर्षांपासून लक्ष केंद्रित केले आहे. काँग्रेसच्या कार्यकाळात शेती व शेती संलग्नीत योजनांसाठी अंदाजपत्रकांमध्ये १६ ते २१ हजार कोटींची तरतूद असायची. आम्ही ती ६६ हजार कोटी केली.जलयुक्त शिवार पाण्याचा नियोजनबद्ध वापर, शेतीचे यांत्रिकीकरण, गटशेतीला प्रोत्साहन, अशा योजना राबविल्या. योजनांसाठी आॅनलाइन व्यवस्था कार्यान्वित केली. त्यामुळे दलालाच्या विळख्यातून शेतकरी मुक्त झाला. कृषिमंत्री फुंडकर यांनी गारपिटीमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे पूर्ण झाल्याची माहिती दिली. सुमारे १ लाख २५ हजार हेक्टरवरील क्षेत्र बाधीत असून, तसा प्रस्ताव केंद्राला पाठविला आहे. लवकरच मदतीचे वाटप सुरू होईल, असेही त्यांनी सांगितले.काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला जनतेने सत्तेबाहेर टाकले आहे. त्यांनी आता पकोडे तळण्याचे कार्यक्रम हाती घेतले आहेत. पुढील किमान १५ वर्षे या पक्षांना जनता स्वीकारणार नाही. त्यामुळे त्यांना पकोडेच तळावे लागणार आहेत.- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस