शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसपेक्षा भाजपाच्या काळात शेतकºयांची तिप्पट प्रगती- देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 00:35 IST

काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात शेतक-यांना प्रत्येक योजनेचा लाभ घेण्यासाठी दलालांना सामोरे जावे लागत होते. काँग्रेसने शेती व संलग्नीत योजनांवर केलेली तरतूद अपुरी होती.

खामगाव (बुलडाणा) : काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात शेतक-यांना प्रत्येक योजनेचा लाभ घेण्यासाठी दलालांना सामोरे जावे लागत होते. काँग्रेसने शेती व संलग्नीत योजनांवर केलेली तरतूद अपुरी होती. काँग्रेसची धोरणे ही त्यांच्या नेत्यांच्या लॉबींना पूरक असणारी होती, अशी घणाघाती टीका करताना, भाजपाच्या कार्यकाळात आम्ही दलालांची शृंखला नष्ट करून शेतकºयांची तिप्पट प्रगती केली, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे केला.बुलडाणा जिल्हा कृषी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. मंचावर राज्याचे कृषी व फलोत्पादनमंत्री भाऊसाहेब फुंडकर, गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, खा. प्रतापराव जाधव, खा.रक्षा खडसे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, भाजपा सरकारने शेतकºयांच्या हितासाठीच्या धोरणांवर गेल्या ३ वर्षांपासून लक्ष केंद्रित केले आहे. काँग्रेसच्या कार्यकाळात शेती व शेती संलग्नीत योजनांसाठी अंदाजपत्रकांमध्ये १६ ते २१ हजार कोटींची तरतूद असायची. आम्ही ती ६६ हजार कोटी केली.जलयुक्त शिवार पाण्याचा नियोजनबद्ध वापर, शेतीचे यांत्रिकीकरण, गटशेतीला प्रोत्साहन, अशा योजना राबविल्या. योजनांसाठी आॅनलाइन व्यवस्था कार्यान्वित केली. त्यामुळे दलालाच्या विळख्यातून शेतकरी मुक्त झाला. कृषिमंत्री फुंडकर यांनी गारपिटीमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे पूर्ण झाल्याची माहिती दिली. सुमारे १ लाख २५ हजार हेक्टरवरील क्षेत्र बाधीत असून, तसा प्रस्ताव केंद्राला पाठविला आहे. लवकरच मदतीचे वाटप सुरू होईल, असेही त्यांनी सांगितले.काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला जनतेने सत्तेबाहेर टाकले आहे. त्यांनी आता पकोडे तळण्याचे कार्यक्रम हाती घेतले आहेत. पुढील किमान १५ वर्षे या पक्षांना जनता स्वीकारणार नाही. त्यामुळे त्यांना पकोडेच तळावे लागणार आहेत.- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस