शहरं
Join us  
Trending Stories
1
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
2
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
3
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
4
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
6
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
7
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
8
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
9
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
10
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
11
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
12
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
13
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण
14
₹450 कोटींचा बंगला अन् ₹639 कोटींचा डुप्लेक्स..; धनकुबेरांना आकर्षित करतेय वरळी 'सी फेस'
15
फक्त १० वर्षांत १ कोटीचा फंड कसा तयार करायचा? SIP मध्ये दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल?
16
कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; गेल्या महिन्यातच बाजारात उतरली, दिला बंपर परतावा
17
"मी सर्वात पहिले पलायन करणाऱ्या बॅचमधील...!"; मैथिली ठाकूरच्या निवडणूक लढण्यासंदर्भात वडिलांची पहिली प्रतिक्रिया, तुम्हीही भावूक व्हाल
18
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
19
माझी पत्नी रात्रीच्या वेळी बनते नागीण आणि..., भयभीत पतीने थेट DM यांनां केली अशी विनंती, प्रकरण काय  
20
"सगळेच लोक अत्यंत...!"; विरोधकांच्या 'मत चोरी'च्या आरोपांवर मैथिली ठाकुरचं मोठं विधान, स्पष्टच बोलली

त्र्यंबक पर्वणी कुशावर्तातच

By admin | Updated: September 23, 2015 01:07 IST

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या शाही पर्वणीसाठी गंगापूर धरणातून पाणी सोडण्याचा वाद थेट उच्च न्यायालयात पोहोचून न्यायालयाने पाणी काटकसरीने वापरण्याचे निर्देश दिले आहेत.

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या शाही पर्वणीसाठी गंगापूर धरणातून पाणी सोडण्याचा वाद थेट उच्च न्यायालयात पोहोचून न्यायालयाने पाणी काटकसरीने वापरण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे २५ सप्टेंबरला त्र्यंबकेश्वरमधील अंतिम पर्वणीसाठी भाविकांना थेट कुशावर्तात स्नानाची संधी प्रशासनाकडून दिली जाणार आहे.अहिल्या धरणावर बांधलेल्या तिन्ही घाटांंवर स्नानासाठी पाणी सोडण्यास त्र्यंबक नगरपालिका अनुत्सुक असल्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे. मागील दोन्ही पर्वणीच्या काळात कुशावर्तात स्नानासाठी होणारी भाविकांची गर्दी पाहून अहिल्या धरणाचे काही दरवाजे उघडून प्रशासनाने घाटांवर स्नानासाठी पाणी खेळते ठेवले होते, परंतु भाविकांनी घाटांकडे पाठ फिरवित कुशवर्तातच स्नानासाठी गर्दी केली होती. दोन्ही पर्वणींचा अनुभव पाहता तिसऱ्या पर्वणीला मुळातच भाविक कमी येतील, अशी आशा प्रशासनाला असून त्याचाच आधार घेऊन अहिल्या धरणातून तिसऱ्या पर्वणीला पाणी न सोडण्याचे नगरपालिकेच्या विचाराधीन आहे.गंगापूर धरणातून पाणी सोडण्यास निर्बंध घालण्याच्या मागणीवर पाटबंधारे खात्याला विचारणा केली. नाशिकच्या तिन्ही पर्वण्या आटोपल्यामुळे आता गंगापूर धरणातून कुंभमेळ्यासाठी पाणी सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.