शहरं
Join us  
Trending Stories
1
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशूंशी संवाद
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
3
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
4
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
5
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
6
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
9
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
10
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
11
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
12
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
13
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
14
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
15
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
19
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
20
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 

इंदापूरमध्ये गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली

By admin | Updated: June 3, 2014 22:14 IST

गोपीनाथ मुंडे यांच्या आकस्मिक निधनाने पूर्ण देशात निर्माण झाली आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीसव प्रदीप गारटकर यांनी मुंडे यांना श्रद्धांजली वाहताना येथे व्यक्त केली.

इंदापूर : महाराष्ट्राचा झंझावात शमल्याची भावना लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या आकस्मिक निधनाने पूर्ण देशात निर्माण झाली आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीसव प्रदीप गारटकर यांनी मुंडे यांना श्रद्धांजली वाहताना येथे व्यक्त केली.गोपीनाथ मुुंडे यांच्या आकस्मिक निधनाने आज सर्वसामान्य इंदापूरकर हेलावून गेला होता. सन १९९०नंतर उत्तरोत्तर इंदापूरकरांशी असणारे नाते दृढ करणारे मुंडे अचानक जगाचा निरोप घेतील, याची इतरांप्रमाणे इंदापूरकरांनीदेखील कल्पना केली नव्हती. सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेचे आयोजन नगर परिषदेच्या पटांगणात करण्यात आले आहे, एवढा मोबाईलवरचा एक निरोप या सर्वांना एकत्र घेऊन आला.या वेळी गारटकर म्हणाले, 'मुंडेंनी ग्रामीण भागात भाजप रुजवला. सामान्यांच्या सुखदु:खांत सहभागी होणारा हा लोकनेता होता. १५ वर्षांच्या अथक संघर्षानंतर दिल्ली ग्रामविकास खात्याचे मंत्रिपद मिळाले. या संधीचे मुंडे सोने करतील, असा विश्वास सर्वसामान्यांना होता. मात्र, देवाला ते मंजूर नव्हते. एका क्षणात सत्काराच्या समारंभाऐवजी पार्थिव देहाचे दर्शन नशिबात आले आहे.'भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष माऊली चवरे यांनी, संघर्षमय जीवन जगणारा, इतरांना जगण्याची ताकद देणारा बुलंद आवाज हरपला, अशी श्रद्धांजली वाहिली.प्रा. कृष्णा ताटे म्हणाले, 'शतकानंतर एखादे संघर्षशील नेतृत्व, सामन्यांच्या हिताला प्राधान्य देणारे व्यक्तिमत्त्व निर्माण होते. त्यांचे कार्य पुढे चालविणे हीच आदरांजली ठरेल.'संघर्ष करणार्‍याला पाठबळ देणारे, प्रस्थापितांना आव्हान देणारे, कार्यकर्त्यांची पारख असणारे व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून गेले आहे, असे समाजवादी कार्यकर्ते सलीम शेख म्हणाले.या वेळी माजी उपनगराध्यक्ष रत्नाकर मखरे, अप्पासाहेब जगदाळे, विशाल बोंद्रे, धनंजय बाब्रस, किरण गोफणे, बाबासाहेब चवरे, अमोल मिसाळ, गोरख शिंदे, युवराज पोळ, डॉ. शशिकांत तरंगे, विठ्ठल ननवरे, नीलेश देवकर व इतरांनी श्रद्धांजलिपर भाषणे केली. शिवाजी मखरे यांनी या सभेचे प्रास्ताविक केले.आजच्या दिवसाची सुरुवात झाली तीच मुळी उदास पावसाळी वातावरणात... सकाळी सहा-साडेसहालाच आभाळ दाटून आले.... रपरप पाऊस कोसळला. तो कोसळण्याआधी व नंतरदेखील वातावरणातील उदासी, थेंबांचा चुटपुटता गहिवर तसाच होता.. वीजपुरवठा खंडित झाला होता. टीव्ही संच बंद असल्याने मिळालेल्या अशुभ बातमीची कुणाला खातरजमा करता आली नाही. अकरा वाजण्याआधी वीज आली अन् लोक टीव्हीशी जखडले गेले.