शहरं
Join us  
Trending Stories
1
'जे घडले, ते घडायला नको होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार
2
असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले...
3
अर्थव्यवस्थेला ५ मोठे 'बूस्टर डोस'! रेपो दर जैसे थे, पण RBI च्या 'या' निर्णयाने मार्केटमध्ये येणार पैसा
4
फिलिपाईन्स भूकंपात 69 जणांचा मृत्यू, शेकडो जखमी; पाहा धक्कादायक व्हिडिओ...
5
ICC Rankings : अभिषेकनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; T20I च्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
6
"ही भिवंडी आहे, मराठीत कशाला बोलायचं?"; अबु आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, मनसे म्हणाली, "लाज वाटते तर..."
7
गंगाखेडेतमध्ये धनगर आरक्षण आंदोलनात खळबळ; ओबीसी नेते सुरेश बंडगर यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
8
नवरात्र घट विसर्जन २०२५: पुरणाचे दिवे आणि कलशाचे पाणी कसे वापरावे? देवीच्या कृपेसाठी खास विधी!
9
सर्व्हे! नितीश कुमार, तेजस्वी यादव की PK...कुणाला मुख्यमंत्री म्हणून मिळाली पहिली पसंती?
10
"चीन अमेरिकेला मागे टाकणार, तिसरं महायुद्ध, अन्...!"; 2026 साठी बाबा वेंगाची भविष्यवाणी, भारतासह जागात काय-काय घडणार?
11
बाजारात गेलेल्या सुनेचा २ वर्षांनी विहिरीत सापडला सांगाडा; राँग नंबरवरुन सुरू झालेली लव्हस्टोरी
12
जगात पहिल्यांदा 'ड्रोन वॉल' बनणार; रशियाला घाबरुन २७ देशांनी निर्णय घेतला, जाणून घ्या कसे करणार काम
13
'अनेकदा संघाला संपवण्याचे प्रयत्न झाले, तरीही संघ वटवृक्षासारखा ठाम उभा आहे'- PM नरेंद्र मोदी
14
Pune Viral Video: केस पकडले, कमरेत लाथा मारल्या; पुण्यात भररस्त्यात तरुणीला मारहाण; घटनेचा व्हिडीओ व्हायरल
15
३० वर्षांनी शुभ दसरा २०२५: ७ राजयोगात १० राशींना भरपूर लाभ, भरघोस यश-पैसा; सुख-सुबत्ता काळ!
16
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकपूर्तीनिमित्त सरकाने प्रसिद्ध केलं विशेष नाणं आणि टपाल तिकीट, मोदी म्हणाले...
17
Viral Video: मुंबई लोकलमध्ये नवरात्रीचा जल्लोष! 'एक नंबर, तुझी कंबर' गाण्यावर महिलांचा जबरदस्त डान्स
18
'मैत्रीमुळे विचारधारा सोडली, असे होत नाही.. ' संघाच्या निमंत्रण पत्रिकेवर न्यायाधीशांच्या आईचे नाव असल्याने वाद !
19
भोजपुरी अभिनेता पवन सिंह भाजपात; "जीवे मारले तरी मराठी बोलणार नाही", या विधानावरून झाला होता वाद
20
Asia Cup 2025 : ट्रॉफी द्या, अन्यथा..; BCCI ने मोहसिन नकवींना दिला ७२ तासांचा अल्टिमेटम

इंदापूरमध्ये गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली

By admin | Updated: June 3, 2014 22:14 IST

गोपीनाथ मुंडे यांच्या आकस्मिक निधनाने पूर्ण देशात निर्माण झाली आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीसव प्रदीप गारटकर यांनी मुंडे यांना श्रद्धांजली वाहताना येथे व्यक्त केली.

इंदापूर : महाराष्ट्राचा झंझावात शमल्याची भावना लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या आकस्मिक निधनाने पूर्ण देशात निर्माण झाली आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीसव प्रदीप गारटकर यांनी मुंडे यांना श्रद्धांजली वाहताना येथे व्यक्त केली.गोपीनाथ मुुंडे यांच्या आकस्मिक निधनाने आज सर्वसामान्य इंदापूरकर हेलावून गेला होता. सन १९९०नंतर उत्तरोत्तर इंदापूरकरांशी असणारे नाते दृढ करणारे मुंडे अचानक जगाचा निरोप घेतील, याची इतरांप्रमाणे इंदापूरकरांनीदेखील कल्पना केली नव्हती. सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेचे आयोजन नगर परिषदेच्या पटांगणात करण्यात आले आहे, एवढा मोबाईलवरचा एक निरोप या सर्वांना एकत्र घेऊन आला.या वेळी गारटकर म्हणाले, 'मुंडेंनी ग्रामीण भागात भाजप रुजवला. सामान्यांच्या सुखदु:खांत सहभागी होणारा हा लोकनेता होता. १५ वर्षांच्या अथक संघर्षानंतर दिल्ली ग्रामविकास खात्याचे मंत्रिपद मिळाले. या संधीचे मुंडे सोने करतील, असा विश्वास सर्वसामान्यांना होता. मात्र, देवाला ते मंजूर नव्हते. एका क्षणात सत्काराच्या समारंभाऐवजी पार्थिव देहाचे दर्शन नशिबात आले आहे.'भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष माऊली चवरे यांनी, संघर्षमय जीवन जगणारा, इतरांना जगण्याची ताकद देणारा बुलंद आवाज हरपला, अशी श्रद्धांजली वाहिली.प्रा. कृष्णा ताटे म्हणाले, 'शतकानंतर एखादे संघर्षशील नेतृत्व, सामन्यांच्या हिताला प्राधान्य देणारे व्यक्तिमत्त्व निर्माण होते. त्यांचे कार्य पुढे चालविणे हीच आदरांजली ठरेल.'संघर्ष करणार्‍याला पाठबळ देणारे, प्रस्थापितांना आव्हान देणारे, कार्यकर्त्यांची पारख असणारे व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून गेले आहे, असे समाजवादी कार्यकर्ते सलीम शेख म्हणाले.या वेळी माजी उपनगराध्यक्ष रत्नाकर मखरे, अप्पासाहेब जगदाळे, विशाल बोंद्रे, धनंजय बाब्रस, किरण गोफणे, बाबासाहेब चवरे, अमोल मिसाळ, गोरख शिंदे, युवराज पोळ, डॉ. शशिकांत तरंगे, विठ्ठल ननवरे, नीलेश देवकर व इतरांनी श्रद्धांजलिपर भाषणे केली. शिवाजी मखरे यांनी या सभेचे प्रास्ताविक केले.आजच्या दिवसाची सुरुवात झाली तीच मुळी उदास पावसाळी वातावरणात... सकाळी सहा-साडेसहालाच आभाळ दाटून आले.... रपरप पाऊस कोसळला. तो कोसळण्याआधी व नंतरदेखील वातावरणातील उदासी, थेंबांचा चुटपुटता गहिवर तसाच होता.. वीजपुरवठा खंडित झाला होता. टीव्ही संच बंद असल्याने मिळालेल्या अशुभ बातमीची कुणाला खातरजमा करता आली नाही. अकरा वाजण्याआधी वीज आली अन् लोक टीव्हीशी जखडले गेले.