शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
2
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
3
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
4
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
5
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
6
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
7
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
8
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
9
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
10
Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले
11
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
12
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
13
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
14
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
15
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
16
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
17
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
19
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
20
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!

इंदापूरमध्ये गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली

By admin | Updated: June 3, 2014 22:14 IST

गोपीनाथ मुंडे यांच्या आकस्मिक निधनाने पूर्ण देशात निर्माण झाली आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीसव प्रदीप गारटकर यांनी मुंडे यांना श्रद्धांजली वाहताना येथे व्यक्त केली.

इंदापूर : महाराष्ट्राचा झंझावात शमल्याची भावना लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या आकस्मिक निधनाने पूर्ण देशात निर्माण झाली आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीसव प्रदीप गारटकर यांनी मुंडे यांना श्रद्धांजली वाहताना येथे व्यक्त केली.गोपीनाथ मुुंडे यांच्या आकस्मिक निधनाने आज सर्वसामान्य इंदापूरकर हेलावून गेला होता. सन १९९०नंतर उत्तरोत्तर इंदापूरकरांशी असणारे नाते दृढ करणारे मुंडे अचानक जगाचा निरोप घेतील, याची इतरांप्रमाणे इंदापूरकरांनीदेखील कल्पना केली नव्हती. सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेचे आयोजन नगर परिषदेच्या पटांगणात करण्यात आले आहे, एवढा मोबाईलवरचा एक निरोप या सर्वांना एकत्र घेऊन आला.या वेळी गारटकर म्हणाले, 'मुंडेंनी ग्रामीण भागात भाजप रुजवला. सामान्यांच्या सुखदु:खांत सहभागी होणारा हा लोकनेता होता. १५ वर्षांच्या अथक संघर्षानंतर दिल्ली ग्रामविकास खात्याचे मंत्रिपद मिळाले. या संधीचे मुंडे सोने करतील, असा विश्वास सर्वसामान्यांना होता. मात्र, देवाला ते मंजूर नव्हते. एका क्षणात सत्काराच्या समारंभाऐवजी पार्थिव देहाचे दर्शन नशिबात आले आहे.'भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष माऊली चवरे यांनी, संघर्षमय जीवन जगणारा, इतरांना जगण्याची ताकद देणारा बुलंद आवाज हरपला, अशी श्रद्धांजली वाहिली.प्रा. कृष्णा ताटे म्हणाले, 'शतकानंतर एखादे संघर्षशील नेतृत्व, सामन्यांच्या हिताला प्राधान्य देणारे व्यक्तिमत्त्व निर्माण होते. त्यांचे कार्य पुढे चालविणे हीच आदरांजली ठरेल.'संघर्ष करणार्‍याला पाठबळ देणारे, प्रस्थापितांना आव्हान देणारे, कार्यकर्त्यांची पारख असणारे व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून गेले आहे, असे समाजवादी कार्यकर्ते सलीम शेख म्हणाले.या वेळी माजी उपनगराध्यक्ष रत्नाकर मखरे, अप्पासाहेब जगदाळे, विशाल बोंद्रे, धनंजय बाब्रस, किरण गोफणे, बाबासाहेब चवरे, अमोल मिसाळ, गोरख शिंदे, युवराज पोळ, डॉ. शशिकांत तरंगे, विठ्ठल ननवरे, नीलेश देवकर व इतरांनी श्रद्धांजलिपर भाषणे केली. शिवाजी मखरे यांनी या सभेचे प्रास्ताविक केले.आजच्या दिवसाची सुरुवात झाली तीच मुळी उदास पावसाळी वातावरणात... सकाळी सहा-साडेसहालाच आभाळ दाटून आले.... रपरप पाऊस कोसळला. तो कोसळण्याआधी व नंतरदेखील वातावरणातील उदासी, थेंबांचा चुटपुटता गहिवर तसाच होता.. वीजपुरवठा खंडित झाला होता. टीव्ही संच बंद असल्याने मिळालेल्या अशुभ बातमीची कुणाला खातरजमा करता आली नाही. अकरा वाजण्याआधी वीज आली अन् लोक टीव्हीशी जखडले गेले.