शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

‘ट्रायबल’चे एक हजार कोटी अखर्चित विधिमंडळात गाजणार, आदिवासींवर अन्याय का? : कोथरूडच्या आमदार मेघा कुळकर्णी यांची लक्ष्यवेधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2017 17:10 IST

राज्याच्या आदिवासी विकास विभागाने केंद्र सरकारकडून प्राप्त एक हजार कोटींचे विशेष सहाय्य अनुदान तीन वर्षांपासून अखर्चित ठेवल्याप्रकरणी कोथरूड (पुणे) मतदारसंघाच्या आमदार मेघा कुळकर्णी यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात लक्ष्यवेधी सादर केली आहे. कुळकर्णी या भाजपच्या आमदार असताना ‘ट्रायबल’च्या कामकाजावर त्यांनी बोट ठेवले आहे, हे विशेष.

अमरावती : राज्याच्या आदिवासी विकास विभागाने केंद्र सरकारकडून प्राप्त एक हजार कोटींचे विशेष सहाय्य अनुदान तीन वर्षांपासून अखर्चित ठेवल्याप्रकरणी कोथरूड (पुणे) मतदारसंघाच्या आमदार मेघा कुळकर्णी यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात लक्ष्यवेधी सादर केली आहे. कुळकर्णी या भाजपच्या आमदार असताना ‘ट्रायबल’च्या कामकाजावर त्यांनी बोट ठेवले आहे, हे विशेष.पुणे, नाशिक व नागपूर आवृत्तीत ‘लोकमत’मध्ये ५ नोव्हेंबर २०१७ रोजी ‘आदिवासी विकासाचे एक हजार कोेटी अखर्चित’ या आशयाखाली वृत्त प्रकाशित झाले होते. एकीकडे आदिवासी समाजाचा विकास, उत्थानासाठी राज्य शासनाने आदिवासी विकास विभाग (ट्रायबल) ची निर्मिती केली. मात्र, गत तीन वर्षांपासून केंद्र सरकारचे विशेष सहाय्य अनुदान एक हजार कोटी अखर्चित असताना या खात्याचे मंत्री किंवा वरिष्ठ अधिकारी किती सजग आहेत, हे दिसून येते. आदिवासी समाजाचा विकास, शैक्षणिक प्रगती, रोजगाराचे दालन, आरोग्य, पायाभूत सोयीसुविधांसाठी केंद्र सरकारकडून दरवर्षी राज्याला विशेष सहाय्य अनुदान दिले जाते. मात्र, नाशिक, ठाणे, अमरावती व नागपूर अपर आयुक्त कार्यालय स्तरावर सन २०१२ ते २०१५ या तीन वर्षांत केंद्र सरकारचे वेळेपूर्वी अनुदान खर्च करण्यात आले नाही, असे अहवालातून स्पष्ट झाले आहे. पुणे येथे गत १५ दिवसांपूर्वी अनुदान अखर्चित असल्याप्रकरणी आदिवासी विकास विभागाचे उपसचिव सुनील पाटील यांनी लेखापालांची दोन दिवसीय कार्यशाळा घेऊन अनुदानसंदर्भात वस्तुस्थिती जाणून घेतली. आदिवासी समाजाच्या विकासासाठी निधी, अनुदान उपलब्ध असताना संबंधित अधिकारी योजना, उपक्रम का राबवित नाही, असा सवाल आमदार मेघा कुळकर्णी यांनी लक्षवेधीद्वारे उपस्थित केला आहे. आदिवासी समाजाला विकासापासून वंचित ठेवणे आणि त्यांचेवर अन्याय करण्याचा अधिकार दिला कुणी? ही बाब आ.कुळकर्णी यांनी विधिमंडळात या माध्यमातून सादर केली आहे. एक हजार कोटी अखर्चित असल्याप्रकरणी ११ डिसेंबरपासून सुरू होणाºया नागपूर हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न गाजणार आहे. आमदार मेघा कुळकर्णी यांची लक्ष्यवेधी सभागृहाने स्वीकारली असून या विषयाशी पूरक माहिती आदिवासी विकास विभागाकडून मागविण्यात आली आहे.आदिवासींवर अन्याय करण्याचा अधिकार दिला कोणी?आदिवासी समाजाच्या विकासासाठी अनेक योजना, उपक्रम राबविले जातात. मात्र, एक हजार कोटी रूपये अखर्चित ठेवणे ही बाब अतिशय गंभीर आहे. त्यामुळेच आदिवासी समाजावर अन्याय करण्याचा अधिकार कोणी दिला, हा सवाल लक्ष्यवेधीतून शासनाला विचारण्यात आल्याचे कोथरुड मतदारसंघाच्या आमदार मेधा कुळकर्णी कुळकर्णी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सागितले.