शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

‘वनवासी’ला आदिवासींचा नाशिकमध्ये आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 06:35 IST

नाशिकमध्ये नोंदविला विरोध : संघाच्या कल्याण आश्रम संकल्पनेला छेद

- संजय पाठक

नाशिक : देशातील मूळ रहिवासी असलेल्यांना ‘वनवासी’ संबोधून सेवा कार्य करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणित वनवासी कल्याण आश्रमाच्या संकल्पनेला आता काही आदिवासींकडूनच आक्षेप घेतला जात आहे.

वनवासी कल्याण आश्रमाचे कार्यकर्ते दिंडोरी तालुक्यात मुलांना खाऊ वाटण्यासाठी जात असताना त्यांची गाडी आदिवासी युवक कार्यकर्त्यांनी कोशिंबे येथे अडवली आणि वनवासी शब्दावरून आक्षेप नोंदवला. बिरसा मुंडा किंवा तत्सम आदिवासी क्रांतिकारकांची नावे का वापरत नाही, असा जाब विचारला आणि गाडीवरील वनवासी हे नाव खोडून टाकले. याप्रकरणी आश्रमाने लखन पवार याच्यासह अन्य कार्यकर्त्यांविरुद्ध वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

वनवासी नाव खोडत असल्याचा एक व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाला. शासनाच्या टीआरटीआयचे अशासकीय सदस्य प्रा. अशोक बागुल यांनी वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून काम करणाºया एका वैद्यकीय व्यावसायिकाला दूरध्वनी करून वनवासी शब्द तसेच आदिवासींच्या निसर्ग देवतेपलीकडे अन्य देवांच्या सुरू असलेल्या प्रसाराविषयी आक्षेप नोंदवला आहे.

वनवासी कल्याण संस्थेचे काम वाढल्याने त्याची पुनर्रचना करण्यात येत असून पुणे, नाशिक, सातारा, सांगली या जिल्ह्यांचा समावेश असलेल्या पश्चिम महाराष्ट्र कार्यक्षेत्रासाठी वनवासी कल्याण आश्रम नाव बदलून जनजमाती कल्याण आश्रम करण्यात येणार आहे. धुळे - नंदुरबार क्षेत्राचा समावेश असलेल्या देवगिरी प्रांतासाठी देवगिरी कल्याण आश्रम असे नाव धर्मदाय आयुक्तांकडे नोंदविण्यात येणार आहे. आश्रमाला वनवासी नावात स्वारस्य नाही तर सेवा प्रकल्पात असल्याचे पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे सचिव शरद शेळके यांनी सांगितले.१९५२ पासून कामआदिवासींच्या क्षेत्रात १९५२ पासून संघाची वनवासी कल्याण आश्रम शाखा काम करते. महाराष्ट्रात १९७८ पासून या पद्धतीचे काम करण्यात येते. विदर्भासह अनेक भागात वनवासी या शब्दाला विरोध केला जात असतानाच नाशिकमध्ये मात्र त्याला कृतिशील विरोधही होऊ लागला आहे.

शहरात राहणारे शहरवासी तसेच वनात राहणारे म्हणून वनवासी असा शब्द वापरला जातो. तथापि, गैरसमज पसरविले जात असतील तर ते दूर करण्यासाठी आश्रम कधीही तयार आहे.- शरद शेळके, प्रांत सचिव, पश्चिम महाराष्ट्र प्रांतमूळ निवासींसाठी आदिवासीशब्द रूढ असताना वनवासी शब्द रूजवणे चुकीचे आहे. गिरीवासी, वनबंधूया शब्दांतून वेगळेच आशय निर्माण होतात. कामाला विरोध नाही तर शब्दाला आक्षेप आहे. मी यापूर्वीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात पत्र पाठवून आमच्या भावना कळविल्या आहेत.- प्रा. अशोक बागुल, आदिवासी बचाव समिती

टॅग्स :Nashikनाशिक