शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

‘वनवासी’ला आदिवासींचा नाशिकमध्ये आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 06:35 IST

नाशिकमध्ये नोंदविला विरोध : संघाच्या कल्याण आश्रम संकल्पनेला छेद

- संजय पाठक

नाशिक : देशातील मूळ रहिवासी असलेल्यांना ‘वनवासी’ संबोधून सेवा कार्य करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणित वनवासी कल्याण आश्रमाच्या संकल्पनेला आता काही आदिवासींकडूनच आक्षेप घेतला जात आहे.

वनवासी कल्याण आश्रमाचे कार्यकर्ते दिंडोरी तालुक्यात मुलांना खाऊ वाटण्यासाठी जात असताना त्यांची गाडी आदिवासी युवक कार्यकर्त्यांनी कोशिंबे येथे अडवली आणि वनवासी शब्दावरून आक्षेप नोंदवला. बिरसा मुंडा किंवा तत्सम आदिवासी क्रांतिकारकांची नावे का वापरत नाही, असा जाब विचारला आणि गाडीवरील वनवासी हे नाव खोडून टाकले. याप्रकरणी आश्रमाने लखन पवार याच्यासह अन्य कार्यकर्त्यांविरुद्ध वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

वनवासी नाव खोडत असल्याचा एक व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाला. शासनाच्या टीआरटीआयचे अशासकीय सदस्य प्रा. अशोक बागुल यांनी वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून काम करणाºया एका वैद्यकीय व्यावसायिकाला दूरध्वनी करून वनवासी शब्द तसेच आदिवासींच्या निसर्ग देवतेपलीकडे अन्य देवांच्या सुरू असलेल्या प्रसाराविषयी आक्षेप नोंदवला आहे.

वनवासी कल्याण संस्थेचे काम वाढल्याने त्याची पुनर्रचना करण्यात येत असून पुणे, नाशिक, सातारा, सांगली या जिल्ह्यांचा समावेश असलेल्या पश्चिम महाराष्ट्र कार्यक्षेत्रासाठी वनवासी कल्याण आश्रम नाव बदलून जनजमाती कल्याण आश्रम करण्यात येणार आहे. धुळे - नंदुरबार क्षेत्राचा समावेश असलेल्या देवगिरी प्रांतासाठी देवगिरी कल्याण आश्रम असे नाव धर्मदाय आयुक्तांकडे नोंदविण्यात येणार आहे. आश्रमाला वनवासी नावात स्वारस्य नाही तर सेवा प्रकल्पात असल्याचे पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे सचिव शरद शेळके यांनी सांगितले.१९५२ पासून कामआदिवासींच्या क्षेत्रात १९५२ पासून संघाची वनवासी कल्याण आश्रम शाखा काम करते. महाराष्ट्रात १९७८ पासून या पद्धतीचे काम करण्यात येते. विदर्भासह अनेक भागात वनवासी या शब्दाला विरोध केला जात असतानाच नाशिकमध्ये मात्र त्याला कृतिशील विरोधही होऊ लागला आहे.

शहरात राहणारे शहरवासी तसेच वनात राहणारे म्हणून वनवासी असा शब्द वापरला जातो. तथापि, गैरसमज पसरविले जात असतील तर ते दूर करण्यासाठी आश्रम कधीही तयार आहे.- शरद शेळके, प्रांत सचिव, पश्चिम महाराष्ट्र प्रांतमूळ निवासींसाठी आदिवासीशब्द रूढ असताना वनवासी शब्द रूजवणे चुकीचे आहे. गिरीवासी, वनबंधूया शब्दांतून वेगळेच आशय निर्माण होतात. कामाला विरोध नाही तर शब्दाला आक्षेप आहे. मी यापूर्वीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात पत्र पाठवून आमच्या भावना कळविल्या आहेत.- प्रा. अशोक बागुल, आदिवासी बचाव समिती

टॅग्स :Nashikनाशिक